शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

'या' चुकांमुळे पोटात जमा होतात घातक विषारी तत्व, आतड्यांची सफाई करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 10:44 IST

Healthy Tips: नैसर्गिकपणे आतड्यांची रचना अशी केली आहे की, आपण जे काही खातो ते दुसऱ्या दिवशी बाहेर काढलं पाहिजे. ज्यांच्या शरीरात ही क्रिया व्यवस्थित होते ते निरोगी राहतात.

Healthy Tips: बरेच लोक जेवणासंबंधी अनेक चुका करतात. ज्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडतं, इतकंच नाही तर वेगवेगळ्या गंभीर समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. यातील एक मोठी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. बऱ्याच लोकांनी ही समस्या असते. लोक तासंतास टॉयलेटमध्ये बसून राहतात तरीही त्यांचं पोट साफ होत नाही. पोट साफ न झाल्याने आरोग्यावर प्रभाव पडतो. जास्त काळ बद्धकोष्ठतेची समस्या राहिल्याने आतड्यांमध्ये विषारी पदार्थ आणि न पचलेलं अन्न चिकटून राहतं. ही स्थिती गंभीर होऊ शकते. नैसर्गिकपणे आतड्यांची रचना अशी केली आहे की, आपण जे काही खातो ते दुसऱ्या दिवशी बाहेर काढलं पाहिजे. ज्यांच्या शरीरात ही क्रिया व्यवस्थित होते ते निरोगी राहतात. पण ज्यांचं पचन तंत्र योग्यपणे काम करत नाही, त्यांच्या आतड्यांमध्ये विषारी तत्व जमा होतात.

काही लोकांना पुन्हा पुन्हा खाण्याची सवय असते. या सवयीमुळेही आतड्यांमध्ये विषारी तत्व किंवा अपशिष्ट अन्न जमा होतं. एक्सपर्टनुसार, जर रोज पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर आतड्यांच्या सिस्टीमध्ये समस्या होते. पुन्हा पुन्हा खाण्याच्या सवयीमुळे डायजेशनवर दबाव पडतो. त्यामुळे जेवणामध्ये तीन तासांचा गॅप असणं गरजेचं असतं. अशात आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये जमा विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.

आतड्या साफ करण्याच्या टिप्स

आठवड्यातून एक दिवस उपवास

आयुर्वेदात उपवासाला फार महत्व आहे. याने शरीरासोबतच मनालाही आराम मिळतो. आयुर्वेदानुसार, आठवड्यातून एकदा उपवास केल्याने आतड्यांची स्वच्छता होते आणि त्यात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतात. याने पचनासाठीची अग्नि वाढते. उपवासादरम्यान पाणी, फळांचा ताजा ज्यूस, हर्बल टी यांच्या सेवनाने ही क्रिया आणखी प्रभावी होते.

महिन्यातून एकदा एरंडी तेल

आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी महिन्यातून एकदा एरंडीच्या तेलाचं सेवन केलं पाहिजे. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची अधिक समस्या असते, त्यांनी महिन्यातून एकदा थोड्या एरंडी तेलाचं सेवन केलं पाहिजे. याने ब्लोटिंग, अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो. एरंडीच्या तेलाच्या सेवनाने आतड्यांची सफाई होते. हे लक्षात ठेवा की, या तेलाचं खूप जास्त प्रमाणात सेवन करू नये.

कडूलिंब

आयुर्वेदात कडूलिंबाही खूप महत्व आहे. कडूलिंबाच्या सेवनाने आतड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-वायरल आणि अ‍ॅंटी-फंगल गुण असतात जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. याने आतड्यांची सूज कमी होते. तसेच गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्याही दूर होतात. बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. कडूलिंबाची पाने तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा यांचा ज्यूस पिऊ शकता. 

महिन्यातून एकदा आतड्यांची सफाई

डायजेशनसंबंधी समस्यांसाठी वाचण्यासाठी महिन्यातून एकदा आतड्यांची सफाई करणं गरजेचं आहे. त्यासाठी वर सांगण्यात आलेले उपाय तुम्ही नियमित फॉलो करू शकता. या उपायांच्या मदतीने तुम्ही आतड्यांमधील विषारी तत्व, चिकटून बसलेले पदार्थ बाहेर काढू शकता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य