शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

प्रदुषणाच्या विळख्यात आरोग्य समस्या होऊ शकतात गंभीर, त्वरित 'हे' उपाय करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 17:16 IST

प्रदूषित वातावरणामुळे फुफ्फुसांचे विकार, डोळ्यांचे आजार, श्वासविकार इत्यादी आजारांचा धोका संभवतो. यापासून रक्षण होण्याकरिता पाहूया आहारात कोणत्या घटकांचा समावेश कराल ?

सध्याच्या वाढत्या प्रदूषणाला तोंड देण्याकरिता शरीर सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. डेंग्यु, मलेरिया यासारख्या आजारांना तोंड देण्याकरिता पौष्टिक आणि समतोल आहार गरजेचा आहे. प्रदूषित वातावरणामुळे फुफ्फुसांचे विकार, डोळ्यांचे आजार, श्वासविकार इत्यादी आजारांचा धोका संभवतो. यापासून रक्षण होण्याकरिता पाहूया आहारात कोणत्या घटकांचा समावेश कराल ?

संत्र्यामध्ये 'सी' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढायला मदत होते. संत्र्यातील अँण्टीऑक्सिडंट तत्त्वे जी शरीराचे विविध आजारांपासून रक्षण करतात. विशेषत: ऋतुमानानुसार होणाऱ्या आजारांशी लढण्याकरिता आवश्यक असलेली शक्ती जीवनसत्त्व 'सी'मुळे मिळते. याकरिता रोजच्या आहारात संत्र्याचा समावेश करा.

हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहारात केल्याने पोषक तत्त्वे, जीवनसत्त्वे आणि प्रथिने शरीराला मुबलक प्रमाणात मिळतात. यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते आणि प्रदूषणापासून रक्षण होते.

प्रदूषणापासून वाचण्याकरिता आहारात आल्याचा समावेश करावा. आल्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. यामुळे प्रदूषणापासून रक्षण होते. आल्याचा काढा किंवा आल्याचा चहा घेतल्याने कफ, सर्दी अशा समस्या दूर होतात.

गूळ खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. गुळात आयर्नचे प्रमाण जास्त असते. गूळ खाल्ल्याने आयर्न रक्तात मिसळते. यामुळे रक्तातील ऑक्सीजनची पातळी वाढते. यामुळे प्रदूषणापासून लढण्यासाठी मदत होते. फुफ्फुसातला कफ, सर्दी यावर गूळ गुणकारी आहे. याकरिता चहात गूळ घालून घेतल्याने जास्त फायदा होतो.

आवळ्याला 'अमृतफळ' असे म्हणतात. शरीरासाठी आवळा हे वरदान आहे. आवळा हा जीवनसत्त्व 'सी'चा समृद्ध स्त्रोत आहे. यामध्ये अँण्टीऑक्सीडंटही असतात. यामुळे फ्री रेडिकल (विषारी द्रव्ये) शरीराबाहेर टाकली जातात. वातावरणातील प्रदूषणाचा परिणाम होऊ नये याकरिता आवळा खावा. आवळ्याच्या नियमित सेवनाने बरेचसे आजार दूर व्हायला मदत होते.

काळीमिरीमध्ये जीवनसत्त्व आणि मिनरल्स असतात. काळीमिरी घातलेला चहा किंवा काढा घेतल्याने जुनाट कफ लवकर निघतो. काळीमिरी उष्ण असल्याने सर्दी, खोकल्यासारख्या विकारात आराम मिळतो. याकरिता काहीजण दररोज मधात काळीमिरी पावडर घालून त्याचे चाटण घेतल्याने प्रदूषणापासून रक्षण होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सpollutionप्रदूषण