शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

प्रदुषणाच्या विळख्यात आरोग्य समस्या होऊ शकतात गंभीर, त्वरित 'हे' उपाय करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 17:16 IST

प्रदूषित वातावरणामुळे फुफ्फुसांचे विकार, डोळ्यांचे आजार, श्वासविकार इत्यादी आजारांचा धोका संभवतो. यापासून रक्षण होण्याकरिता पाहूया आहारात कोणत्या घटकांचा समावेश कराल ?

सध्याच्या वाढत्या प्रदूषणाला तोंड देण्याकरिता शरीर सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. डेंग्यु, मलेरिया यासारख्या आजारांना तोंड देण्याकरिता पौष्टिक आणि समतोल आहार गरजेचा आहे. प्रदूषित वातावरणामुळे फुफ्फुसांचे विकार, डोळ्यांचे आजार, श्वासविकार इत्यादी आजारांचा धोका संभवतो. यापासून रक्षण होण्याकरिता पाहूया आहारात कोणत्या घटकांचा समावेश कराल ?

संत्र्यामध्ये 'सी' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढायला मदत होते. संत्र्यातील अँण्टीऑक्सिडंट तत्त्वे जी शरीराचे विविध आजारांपासून रक्षण करतात. विशेषत: ऋतुमानानुसार होणाऱ्या आजारांशी लढण्याकरिता आवश्यक असलेली शक्ती जीवनसत्त्व 'सी'मुळे मिळते. याकरिता रोजच्या आहारात संत्र्याचा समावेश करा.

हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहारात केल्याने पोषक तत्त्वे, जीवनसत्त्वे आणि प्रथिने शरीराला मुबलक प्रमाणात मिळतात. यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते आणि प्रदूषणापासून रक्षण होते.

प्रदूषणापासून वाचण्याकरिता आहारात आल्याचा समावेश करावा. आल्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. यामुळे प्रदूषणापासून रक्षण होते. आल्याचा काढा किंवा आल्याचा चहा घेतल्याने कफ, सर्दी अशा समस्या दूर होतात.

गूळ खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. गुळात आयर्नचे प्रमाण जास्त असते. गूळ खाल्ल्याने आयर्न रक्तात मिसळते. यामुळे रक्तातील ऑक्सीजनची पातळी वाढते. यामुळे प्रदूषणापासून लढण्यासाठी मदत होते. फुफ्फुसातला कफ, सर्दी यावर गूळ गुणकारी आहे. याकरिता चहात गूळ घालून घेतल्याने जास्त फायदा होतो.

आवळ्याला 'अमृतफळ' असे म्हणतात. शरीरासाठी आवळा हे वरदान आहे. आवळा हा जीवनसत्त्व 'सी'चा समृद्ध स्त्रोत आहे. यामध्ये अँण्टीऑक्सीडंटही असतात. यामुळे फ्री रेडिकल (विषारी द्रव्ये) शरीराबाहेर टाकली जातात. वातावरणातील प्रदूषणाचा परिणाम होऊ नये याकरिता आवळा खावा. आवळ्याच्या नियमित सेवनाने बरेचसे आजार दूर व्हायला मदत होते.

काळीमिरीमध्ये जीवनसत्त्व आणि मिनरल्स असतात. काळीमिरी घातलेला चहा किंवा काढा घेतल्याने जुनाट कफ लवकर निघतो. काळीमिरी उष्ण असल्याने सर्दी, खोकल्यासारख्या विकारात आराम मिळतो. याकरिता काहीजण दररोज मधात काळीमिरी पावडर घालून त्याचे चाटण घेतल्याने प्रदूषणापासून रक्षण होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सpollutionप्रदूषण