शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

प्रदुषणाच्या विळख्यात आरोग्य समस्या होऊ शकतात गंभीर, त्वरित 'हे' उपाय करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 17:16 IST

प्रदूषित वातावरणामुळे फुफ्फुसांचे विकार, डोळ्यांचे आजार, श्वासविकार इत्यादी आजारांचा धोका संभवतो. यापासून रक्षण होण्याकरिता पाहूया आहारात कोणत्या घटकांचा समावेश कराल ?

सध्याच्या वाढत्या प्रदूषणाला तोंड देण्याकरिता शरीर सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. डेंग्यु, मलेरिया यासारख्या आजारांना तोंड देण्याकरिता पौष्टिक आणि समतोल आहार गरजेचा आहे. प्रदूषित वातावरणामुळे फुफ्फुसांचे विकार, डोळ्यांचे आजार, श्वासविकार इत्यादी आजारांचा धोका संभवतो. यापासून रक्षण होण्याकरिता पाहूया आहारात कोणत्या घटकांचा समावेश कराल ?

संत्र्यामध्ये 'सी' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढायला मदत होते. संत्र्यातील अँण्टीऑक्सिडंट तत्त्वे जी शरीराचे विविध आजारांपासून रक्षण करतात. विशेषत: ऋतुमानानुसार होणाऱ्या आजारांशी लढण्याकरिता आवश्यक असलेली शक्ती जीवनसत्त्व 'सी'मुळे मिळते. याकरिता रोजच्या आहारात संत्र्याचा समावेश करा.

हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहारात केल्याने पोषक तत्त्वे, जीवनसत्त्वे आणि प्रथिने शरीराला मुबलक प्रमाणात मिळतात. यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते आणि प्रदूषणापासून रक्षण होते.

प्रदूषणापासून वाचण्याकरिता आहारात आल्याचा समावेश करावा. आल्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. यामुळे प्रदूषणापासून रक्षण होते. आल्याचा काढा किंवा आल्याचा चहा घेतल्याने कफ, सर्दी अशा समस्या दूर होतात.

गूळ खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. गुळात आयर्नचे प्रमाण जास्त असते. गूळ खाल्ल्याने आयर्न रक्तात मिसळते. यामुळे रक्तातील ऑक्सीजनची पातळी वाढते. यामुळे प्रदूषणापासून लढण्यासाठी मदत होते. फुफ्फुसातला कफ, सर्दी यावर गूळ गुणकारी आहे. याकरिता चहात गूळ घालून घेतल्याने जास्त फायदा होतो.

आवळ्याला 'अमृतफळ' असे म्हणतात. शरीरासाठी आवळा हे वरदान आहे. आवळा हा जीवनसत्त्व 'सी'चा समृद्ध स्त्रोत आहे. यामध्ये अँण्टीऑक्सीडंटही असतात. यामुळे फ्री रेडिकल (विषारी द्रव्ये) शरीराबाहेर टाकली जातात. वातावरणातील प्रदूषणाचा परिणाम होऊ नये याकरिता आवळा खावा. आवळ्याच्या नियमित सेवनाने बरेचसे आजार दूर व्हायला मदत होते.

काळीमिरीमध्ये जीवनसत्त्व आणि मिनरल्स असतात. काळीमिरी घातलेला चहा किंवा काढा घेतल्याने जुनाट कफ लवकर निघतो. काळीमिरी उष्ण असल्याने सर्दी, खोकल्यासारख्या विकारात आराम मिळतो. याकरिता काहीजण दररोज मधात काळीमिरी पावडर घालून त्याचे चाटण घेतल्याने प्रदूषणापासून रक्षण होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सpollutionप्रदूषण