शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

कधीही झोपा, कधीही उठा असं करता? मग तुमचा दिवस वाईटच जाणारच

By admin | Updated: June 8, 2017 18:23 IST

वाट्टेल तेव्हा झोपून वाट्टेल तेव्हा उठत असाल तर तुम्हाला मूडबदल नावाचा आजार छळतोच.

- निशांत महाजनआपण तरुण असतो, बिन्धास्त असतो. रात्री जागरणं करतो, सिनेमे पाहतो, पार्ट्या करतो, गप्पा मारत बसतो, जमलं तर अभ्यास करतो. आणि पहाटे कधीतरी झोपतो, दुपारी उठतो. कधी तर संध्याकाळीही उठतो. काहीजण तर बारा वाजून गेल्याशिवाय उठतच नाहीत. हे सारं करणं अनेकांना ‘कूल’ वाटतं. भल्या पहाटे उठून खूडबूड करणारे आईबाबा तर महाबोअर वाटतात. लवकर उठणं आवडत नाही. आणि उठलेच कधी तर उठून करणार काय असा प्रश्न पडतो. पण आता जीवनशैलीचा अभ्यास असं म्हणतो की, जर तुम्ही लवकर झोपेतून उठत नसाल किंवा रोजच तुमच्या झोपेच्या वेळा बदलत असतील तर तुमचे जबरदस्त मूडस्विंग्ज होतात. आणि तुमचे दिवसच्या दिवस वाईट जातात. आणि त्यानं तुमच्या करिअरवर कायमचा वाईट परिणाम होतो.

मेसेच्युसेट्ेस इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगने केलेल्या एका अभ्यासानुसार हे निरीक्षण पुढं आले आहे. त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्याच मुलांचं एक सर्व्हेक्षण केलं. या मुलांना फक्त त्यांच्या झोपेच्या वेळेच्या नोंदी सलग ३६ दिवस ठेवायला सांगण्यात आल्या. त्यातून एक रेकॉर्ड तयार झालं जे असं दाखवतं की रोज एकाच वेळी झोपणारे आणि एका ठराविक वेळीच उठणारे तरुण मुलं अत्यंत कमी आहेत. बाकीचे सारे रोज वाट्टेल तेव्हा झोपतात, वाट्टेल तेव्हा उठतात. अनेकांचं झोपेचं ठरलेलं असं काही शेड्युल नाहीत. त्यातून या मुलांचं झोपेचं चक्र बिघडतं.त्यातून पचनाचं तंत्रही बिघडतं. त्याहून वाईट म्हणजे ज्यांचं झोपेचं चक्र बिघडतं, त्यांचा मूड अनेकदा दिवसभर चांगला नसतो. ते चिडचिडतात. उदास असतात.कधी आक्रमक असतात. त्यांचे प्रचंड मूड स्विंग्ज ोतात. आणि त्यांचं कामावरचं लक्षही उडालेलं असतं. परिणाम म्हणून त्यांच्या दिवसभराच्या कामाचा दर्जा बिघडतो. आणि एकूण प्रगतीवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून हा अभ्यास सांगतोय की तुम्हाला आरोग्य, आनंद आणि मानसिक शांतता हवी असेल तर निदान झोपेच्या वेळा तरी पाळा.