शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

रोज सकाळी अनाशापोटी खा 'हा' सुकामेवा...अपचन, वेट लॉस आणि आणखीही बरेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 4:29 PM

सुके अंजीर (Dry Fig) हा असाच बहुगुणी सुका मेवा (Dry Fruit) आहे. अंजिराची ताजी फळं सुकवून तयार केलेले सुके अंजीर अत्यंत गुणकारी असतात.

जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम शरीरावर आणि मनावरही होतो. भारतीय आहारात प्रत्येक पदार्थाचं खास वैशिष्ट्य आहे. त्याचे गुणधर्म आणि ऋतुमानानुसार त्याचे तब्येतीवर होणारे परिणाम यानुसार आपल्याकडे आहार ठरवला जातो. सुके अंजीर (Dry Fig) हा असाच बहुगुणी सुका मेवा (Dry Fruit) आहे. अंजिराची ताजी फळं सुकवून तयार केलेले सुके अंजीर अत्यंत गुणकारी असतात. त्याविषयीची सविस्तर माहिती देणारं वृत्त 'टाइम्स बुल'ने प्रसिद्ध केलं आहे. सुक्या अंजिरांचे शरीराला काय फायदे होतात, हे आपण जाणून घेऊया.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीरसकाळी रिकाम्या पोटी सुके अंजीर खाल्ले, तर ते फायदेशीर ठरतं. त्यात ए आणि बी व्हिटॅमिन, प्रथिनं, फायबर्स, तसंच भरपूर अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. डाएट, योग, व्यायाम यांच्या जोडीला सुके अंजीर आहारात नियमितपणे ठेवले, तर लठ्ठपणा नक्कीच कमी होऊ शकतो.

पोट साफ होण्यावर रामबाण उपायजीवनशैली बदलाचा एक ठळकपणे जाणवणारा परिणाम म्हणजे पोट साफ न होण्याच्या वाढत्या तक्रारी. त्याचंच रूपांतर पुढे मूळव्याध (Constipation), फिशर, फिस्तुला अशा अवघड जागेच्या दुखण्यांमध्ये होतं. सुकं अंजीर हा त्यावरचा एक रामबाण उपाय ठरू शकेल. त्यातल्या फायबर्समुळे (Fibers) पोट साफ होण्यास मदत होते व अ‍ॅसिडिटीची समस्याही कमी होते. भरपूर फायबर्स असलेल्या फळांचं सेवन पोट साफ न होण्याच्या तक्रारीवर गुणकारी ठरतं.

रिकाम्या पोटी करा सेवनसुक्या अंजिराचं सेवन रिकाम्यापोटी केल्यामुळे त्यातले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं शरीरात व्यवस्थित शोषली जातात. त्यामुळे शरीराला त्याचा अधिक फायदा मिळतो. अंजिरातले अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशिअममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. हृदयाचं कार्य सुरळीत राखण्यासाठीही अंजीर फायदेशीर असतात. हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असणारं कॅल्शिअम (Calcium) सुक्या अंजिरांत असतं. त्यामुळे सुके अंजीर खाल्ल्यानं हाडं मजबूत बनतात.

पोषणमूल्यांनी युक्त असलेला सुका मेवा आहारात असावा, असं डॉक्टर सांगतात. काजू, बदाम, बेदाणे, काळ्या मनुका आपण नेहमी खातो. त्यासोबत सुके अंजीरही आवर्जून खायला हवेत. सुके अंजीर वर सांगितल्याप्रमाणे सकाळी रिकाम्यापोटी खाता येतात. एरव्हीही खाऊ शकता. कोणाला नुसते सुके अंजीर खायला आवडत नसतील, तर सुक्या अंजिरापासून खीर, बर्फी असे काही पदार्थ तयार करता येऊ शकतात. मुलांना आवडतील असे मिल्कशेक, हलवा, अंजीर स्प्रेड आदी पदार्थही तयार करता येऊ शकतात. जीवनशैलीतले बदल काही वेळा अनिवार्य असतात; मात्र अशा वेळी आहार-विहारात ठरवून केलेले योग्य बदल शरीराचं नुकसान होऊ देणार नाहीत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स