शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

भात आणि बटाटे पुन्हा गरम करून खाल्याने शरीराचं होतंय मोठं नुकसान; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 12:45 IST

Health Tips in Marathi : मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला याची कारणं सांगणार आहोत. 

 

अनेकदा घरी रात्रीचं किंवा दुपारचं जेवण उरलं असेल तर आपण ते अन्न गरम करून पुन्हा खातो. अन्न वाया जाऊ नये असं प्रत्येकालाच वाटतं असते. याशिवाय  काही उरलेलं असेल तर जास्तीचे बनवावे लागत नाही. यासाठी उरलेले अन्न मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. खासकरून चपाती, भात असे पदार्थ गरम करून वारंवार खाल्ले  जातात. माय उपचारशी बोलताना आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्यपदार्थही मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला याची कारणं सांगणार आहोत. 

मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम केल्यानं धोका वाढतो? 

मायक्रोवेव्हमध्ये गरम करून भात खाण्याने फूड पॉईजनिंग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे बॅसिलस सेरियस नावाचे जिवाणू भातामध्ये निर्माण होऊ लागतात. हे जीवाणू गरम झाल्यामुळे नष्ट होतात, परंतु यामुळे बीजाणू तयार होतात, जे विषारी असू शकतात.

तज्ज्ञांच्या मते एकदा भात मायक्रोवेव्हमध्ये गरम करून सामान्य तपमानावर बाहेर ठेवला गेला, तर त्यात उपस्थित  अन्नातून फूड पॉईजनिंग होण्याचा धोका वाढवू शकतात. म्हणून, मायक्रोवेव्हमध्ये भात गरम करून खाऊ नये.  त्यापेक्षा ताजा शिजवून ठेवलेला भात खाणं जास्त फायदेशीर ठरेल. मातीच्या भांड्यात शिजवलेला भात खाणे अधिक फायदेशीर आहे, कारण त्याने शरीरात जास्त कर्बोदक जात नाही.

शिजलेला बटाटा पुन्हा गरम केल्यावर त्यातील जीवाणू गरम झाल्यावरही मरत नाहीत. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बटाट्यात आढळणारे जीवनसत्व बी 6, पोटॅशियम आणि जीवनसत्व सी शरीरासाठी फायदेशीर असतात, परंतु बटाटा गरम केल्यामुळे त्यातील हे आवश्यक घटक नष्ट होतात. याशिवाय बटाटा वारंवार गरम केल्याने हे बोटुलिनम तयार करू शकते, जे जीवाणूंना प्रोत्साहन देते. अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये बटाटे गरम करून खाणे अधिक हानिकारक असते.

रोज सार्वजनिक वाहनांचा वापर करत असाल; तर कोरोनापासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी

चिकन पुन्हा मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्यानं आरोग्याला उद्भवणारा धोका वाढतो. शिजवलेल्या कोंबडीचे मटण पुन्हा-पुन्हा गरम करून खाल्ल्यास त्यातील पोषक द्रव्य निघून जातात. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या सुरू होते. याशिवाय त्यामुळे गॅस, पित्त,  पोट साफ न होणं इत्यादी समस्या उद्भवू शकतात. हिरव्या पालेभाज्यांना पुन्हा गरम केल्यावर त्यातील नायट्रेट घटक नष्ट होतो.

अरे व्वा! अंगठीद्वारे कोरोना संक्रमणाबाबत माहिती मिळवता येणार; शास्त्रज्ञांचा दावा

हिरव्या पालेभाज्या वारंवार गरम केल्याने प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे त्वचेवर पुरळ आणि डाग येऊ शकतात. अंडी पुन्हा गरम करून खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचू शकते. अंडी पुन्हा गरम केल्यावर नायट्रोजनचे ऑक्सिडेशन होते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. अंड्याची भाजी देखील पुन्हा गरम करू नका. यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचतं.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स