शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

'हे' आयुर्वेदातील नियम फॉलो केले तर डॉक्टरकडे जाण्याची गरजच पडणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 09:52 IST

आयुर्वेद केवळ एक चिकित्सा किंवा मेडिकल सायन्स नाहीये. ही एक निरोगी जीवन जगण्याची कला आहे. ही कला जर तुम्ही अवगत केली तर जीवन निरोगी जगणंही शक्य आहे.

(Image Credit : thedoctorweighsin.com)

आयुर्वेद केवळ एक चिकित्सा किंवा मेडिकल सायन्स नाहीये. ही एक निरोगी जीवन जगण्याची कला आहे. ही कला जर तुम्ही अवगत केली तर जीवन निरोगी जगणंही शक्य आहे. आणि तुम्हाला कधी डॉक्टरकडे जाण्याचीही गरज पडण्याची शक्यता कमी राहते. यात सांगण्यात आलेले खाण्या-पिण्याचे नियम फॉलो करून तुम्ही एक निरोगी आणि ऊर्जापूर्ण आयुष्य जगू शकता. चला जाणून घेऊ काय आहेत हे नियम...

काय आणि कधी खावं?

आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हाच जेवण केलं पाहिजे. कोणतेही पदार्थ एकत्र करून खाणे किंवा ओव्हरइटिंग टाळलं पाहिजे. तिन्ही वेळचं जेवण नियमितपणे आणि योग्य वेळेवर केलं पाहिजे. तुम्हाला जेवण झाल्यावर अवेळी भूक लागली तर फळं खाऊ शकता. फळं आणि हिरव्या भाज्यांचं अधिकाधिक सेवन करावं. 

याचा होतो अधिक फायदा

भूक लागल्यावरच जेवण केल्याने अधिक फायदे होतात. आयुर्वेदानुसार, जेव्हा आपण भूक लागल्यावरच जेवण करतो, तेव्हा आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्सचं प्रमाण वाढतं आणि आपला मूड चांगला राहतो. भूक लागल्यावरच जेवण केल्याने अन्न पचन चांगलं होतं आणि आपलं शरीर मजबूत राहतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आयुर्वेदानुसार, खाण्या-पिण्याचे नियम फॉलो केल्यास आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याने नुकसानकारक बॅक्टेरिया आणि कीटाणू आपल्या शरीराला नुकसान पोहोचवू शकत नाही. आणि आपण कमी आजारी पडतो.

सौंदर्य वाढतं

आपण सर्वच आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय आणि ट्रिटमेंट करत असतो. पण जर केवळ आयुर्वेदानुसार खाणं-पिणं सुरू कराल तर सुंदर त्वचा आणि आकर्षक शरीर कोणत्याही मेहनतीशिवाय मिळवता येऊ शकतं.

मानसिक आरोग्य राहतं चांगलं

जर आपण दिवसातील तिन्ही वेळी योग्य वेळेवर ताजं जेवणं अन्न खाल्लं तर आपल्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. आपली स्मरणशक्ती चांगली होते आणि रागावरही कंट्रोल ठेवता येतो. अस्वस्थता, चिंता आणि घाबरणं यांसारख्या समस्या आपल्यापासून दोन हात दूर राहतात.

यावेळी अधिक खावं

आयुर्वेदानुसार, आपण भूकेपेक्षा जास्त अन्न खाऊ नये. जेवढी भूक आहे, त्यापेक्षा थोडं कमीच खावं. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित व्हावी. पण जर तुम्हाला कधी जास्त खाण्याचं मन झालं तर दुपारच्या वेळी खावं. सकाळी आणि सायंकाळी हलकं खावं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स