शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

'हे' आयुर्वेदातील नियम फॉलो केले तर डॉक्टरकडे जाण्याची गरजच पडणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 09:52 IST

आयुर्वेद केवळ एक चिकित्सा किंवा मेडिकल सायन्स नाहीये. ही एक निरोगी जीवन जगण्याची कला आहे. ही कला जर तुम्ही अवगत केली तर जीवन निरोगी जगणंही शक्य आहे.

(Image Credit : thedoctorweighsin.com)

आयुर्वेद केवळ एक चिकित्सा किंवा मेडिकल सायन्स नाहीये. ही एक निरोगी जीवन जगण्याची कला आहे. ही कला जर तुम्ही अवगत केली तर जीवन निरोगी जगणंही शक्य आहे. आणि तुम्हाला कधी डॉक्टरकडे जाण्याचीही गरज पडण्याची शक्यता कमी राहते. यात सांगण्यात आलेले खाण्या-पिण्याचे नियम फॉलो करून तुम्ही एक निरोगी आणि ऊर्जापूर्ण आयुष्य जगू शकता. चला जाणून घेऊ काय आहेत हे नियम...

काय आणि कधी खावं?

आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हाच जेवण केलं पाहिजे. कोणतेही पदार्थ एकत्र करून खाणे किंवा ओव्हरइटिंग टाळलं पाहिजे. तिन्ही वेळचं जेवण नियमितपणे आणि योग्य वेळेवर केलं पाहिजे. तुम्हाला जेवण झाल्यावर अवेळी भूक लागली तर फळं खाऊ शकता. फळं आणि हिरव्या भाज्यांचं अधिकाधिक सेवन करावं. 

याचा होतो अधिक फायदा

भूक लागल्यावरच जेवण केल्याने अधिक फायदे होतात. आयुर्वेदानुसार, जेव्हा आपण भूक लागल्यावरच जेवण करतो, तेव्हा आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्सचं प्रमाण वाढतं आणि आपला मूड चांगला राहतो. भूक लागल्यावरच जेवण केल्याने अन्न पचन चांगलं होतं आणि आपलं शरीर मजबूत राहतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आयुर्वेदानुसार, खाण्या-पिण्याचे नियम फॉलो केल्यास आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याने नुकसानकारक बॅक्टेरिया आणि कीटाणू आपल्या शरीराला नुकसान पोहोचवू शकत नाही. आणि आपण कमी आजारी पडतो.

सौंदर्य वाढतं

आपण सर्वच आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय आणि ट्रिटमेंट करत असतो. पण जर केवळ आयुर्वेदानुसार खाणं-पिणं सुरू कराल तर सुंदर त्वचा आणि आकर्षक शरीर कोणत्याही मेहनतीशिवाय मिळवता येऊ शकतं.

मानसिक आरोग्य राहतं चांगलं

जर आपण दिवसातील तिन्ही वेळी योग्य वेळेवर ताजं जेवणं अन्न खाल्लं तर आपल्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. आपली स्मरणशक्ती चांगली होते आणि रागावरही कंट्रोल ठेवता येतो. अस्वस्थता, चिंता आणि घाबरणं यांसारख्या समस्या आपल्यापासून दोन हात दूर राहतात.

यावेळी अधिक खावं

आयुर्वेदानुसार, आपण भूकेपेक्षा जास्त अन्न खाऊ नये. जेवढी भूक आहे, त्यापेक्षा थोडं कमीच खावं. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित व्हावी. पण जर तुम्हाला कधी जास्त खाण्याचं मन झालं तर दुपारच्या वेळी खावं. सकाळी आणि सायंकाळी हलकं खावं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स