शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रात्री उशीरा जेवण करता? या गंभीर समस्यांसाठी रहा तयार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 10:04 IST

आजकालच्या बिझी शेड्यूलमुळे लोकांच्या लाइफस्टाइलमध्ये फार जास्त बदल बघायला मिळत आहेत.

आजकालच्या बिझी शेड्यूलमुळे लोकांच्या लाइफस्टाइलमध्ये फार जास्त बदल बघायला मिळत आहेत. रात्री उशीरापर्यंत जागणं, तासंतास लॅपटॉपवर काम करत बसणं आणि मग रात्री उशीरा जेवण करणं. या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे इच्छा असूनही अनेकांना हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करता येत नाही. याचा परिणाम म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आधी लोक सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर किंवा वेळेवर झोपणे, ठेरलेल्या वेळेवर जेवण करणे हे नियम पाळत होते. त्यामुळे त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य मिळत होतं. पण आजकाल लोक फार उशीरा जेवण करतात. याने त्यांना झोप येण्यासही अडचण होते आणि त्यांचं आरोग्यही बिघडतं. रात्री उशीरा जेवण करण्याचे दुष्परिणाम काय आहे हे खालीलप्रमाणे सांगता येतील....

निरोगी आणि फिट राहण्यासाठी वेळेवर झोपणे, सकाळी वेळेवर उठणे याबाबत आयुर्वेदातही लिहिलं गेलं आहे. जर तुम्हीही रात्री उशीरा जेवण करत असाल तर तुम्हाला खालील आजारांचा सामना करावा लागू शकतो. 

वजन वाढतं - रात्री फार उशीरा जेवण केलं तर ते पचवण्यास फार अडचण निर्माण होते. याने कोलेस्ट्रॉल वाढणे आणि हृदयासंबंधी आजार होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यासोबतच जाडेपणा येण्याचही एक कारण रात्री उशीरा जेवण करणे हेच आहे. 

तणाव - रात्री उशीरा जेवण केल्यावर अर्थातच झोप येण्यासही समस्या निर्माण होते. मग झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी दिवसभर तुम्हाला थकवा आणि तणाव जाणवू लागतो. तुम्हाला तणावमुक्त जीवन हवं असेल तर रात्री लवकर किंवा वेळेवर जेवण करा.

हाय ब्लड प्रेशर - जेवण केल्यावर लगेच झोपल्याने किंवा एकाच जागेवर बसल्याने शरीर जेवण पचवू शकत नाही. याने तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जेवण केल्यावर थोडं चालणेही गरजेचे आहे.

डायबिटीज - जेवण केल्यावर अनेकांना काहीतरी गोड पदार्थ खाण्याची सवय असते. सतत असे केल्याने याने ब्लड शुगर स्तर वाढणं सुरु होतं. त्यातून वेगळ्याही काही समस्या वाढू शकतात. 

अपचन - ज्या लोकांना नेहमीच अपचनाची समस्या असते त्यांनीही रात्री उशीरा जेवण करु नये. याने त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो.

चिडचिडपणा - जर तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नसाल, तर याचा थेट प्रभाव तुमच्या मानसिक आरोग्यावर पडतो. मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही, मग यामुळे तुमची चिडचिड होऊ लागते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य