शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीला तोंड लावून पाणी प्यायल्याने आरोग्यावर होतो वाईट परिणाम?; जाणून घ्या, योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 14:06 IST

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाणी पिण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया...

पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीरात ६५-७० टक्के पाणी असतं. आपल्याला ऊर्जा देण्यासोबतच पाणी आपल्याला हायड्रेट ठेवतं. तसेच अनेक आजारांपासून संरक्षण करण्याचं काम करतं. पाण्याचे असंख्य फायदे आहेत. पण पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असणारे फार कमी लोक आहेत.

पाणी नीट प्यायलं नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, काही लोक बोलत असताना पाणी पितात तर काही लोक उभं राहून पाणी पितात, जे चुकीचं आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाणी पिण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया...

बाटलीला तोंड लावून पाणी पिण्याचे तोटे

बहुतेक लोकांना बाटलीला तोंड लावून पाणी प्यायला आवडतं. यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं. बाटलीला तोंड लावून पाणी प्यायल्याने त्यात लाळ मिसळते, त्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात आणि आजारांचं ते कारण ठरू शकतं. एका श्वासात पाणी पिणं देखील धोकादायक आहे. त्यामुळे पोट फुगण्याची भीती असते.

एकाच ग्लासातून पाणी पिणं हानिकारक 

एकच ग्लास न धुता आठवडाभर पाणी पिण्यासाठी कधीही वापरू नये. यामुळे, काचेच्या पृष्ठभागावर बॅक्टेरिया वाढतात, जे त्वरीत आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे पाण्याचा ग्लास नेहमी साबणाने पूर्णपणे स्वच्छ करावा.

पाणी नेमकं कधी प्यावं?

- रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि पोटाचा त्रास होत नाही.

- वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जेवण करण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावं.

- जिममध्ये किंवा घरी व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर एक ग्लास पाणी पिणे फायदेशीर आहे.

- दिवसभरात दर तासाला थोडं थोडं पाणी प्यावं. सिप्समध्ये पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.

- उभं राहून कधीही पाणी पिऊ नये. आरामात बसून प्यावं. यामुळे किडनी आणि गुडघे निरोगी राहतात.

- कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते.

- गरम दूध, चहा प्यायल्यानंतर किंवा उन्हातून आल्यावर किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

 

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स