शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

जेवणाआधीच्या 'या' एका सवयीमुळे तुमचं वजन होईल कमी, जाणून घ्या ट्रिक...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:03 IST

Weight Loss Tips : केवळ एक्सरसाईज करून किंवा धावल्याने वजन कमी होत नसतं. आज आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. 

Weight Loss Tips : आजकाल कमी वयातच वजन वाढणं, पोट बाहेर येणं अशा अनेक समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहेत. अशात वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. यातून काहींना फायदा होतो तर काहींना नाही. कारण अनेकांना वजन कमी करण्यासाठीच्या काही खास गोष्टी माहीत नसतात. केवळ एक्सरसाईज करून किंवा धावल्याने वजन कमी होत नसतं. आज आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. 

जेवणाआधीची तुमची एक छोटीशी सवय तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे याने आपल्या शरीराला कोणतंही नुकसान होणार नाही. चला जाणून घेऊ काय आहे ट्रिक...

काय आहे उपाय?

अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट इलाना मुरस्टाइननुसार, जेवणाआधी साधारण एक ग्लास पाणी प्यायल्याने तुम्ही फिट राहू शकता. इलानानुसार काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जेवणाआधी पाणी प्यायल्याने प्रमाणापेक्षा जास्त पदार्थ खाल्ले जात नाहीत. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

खरंतर अनेकजण तहान लागण्याला भूकेच्या दृष्टीकोनातून बघतात. अशावेळी जेवण करताना पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं, जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. त्यामुळे जेवणाआधी एक ग्लास पाणी पिणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं. 

आयुर्वेदातही याचा उल्लेख

आयुर्वेदात जेवणाआधी आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे शरीरासाठी चांगलं नसल्याचं सांगितलं गेलं आहे. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, असे केल्याने व्यक्तीची पचनक्रिया कमजोर होऊ शकते. पण याजागी जेवण करताना मधे पाणी पिणे योग्य सांगण्यात आलं आहे. 

आयुर्वेदानुसार, जेवण करताना मधून मधून एक-एक घोट पाणी प्यायला हवं. याने पदार्थ आणकी मुलायम होतो आणि ते पोटात पचन्यासाठीही सोपं जातं. सोबतच या पद्धतीने व्यक्ती जास्त जेवण करण्यापासूनही बचावतो. इतकेच नाही तर जास्त तेलकट किंवा मसालेदार भाज्या खाल्ल्या असतील तर यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांनाही रोखता येऊ शकतं. 

कसं पाणी प्यावं?

फार जास्त थंड किंवा फार जास्त गरम पाणी पिणे टाळावे, शरीरासाठी सामान्य तापमान असलेलं पाणी पिणे अधिक फायद्याचं असतं. याने तेल कमी केलं जातं आणि पदार्थ पचन्यासही मदत होते. इतकेच नाही तर याने फॅट बर्न होण्यासही मदत होते. जेवण केल्यावर लगेच ढसाढसा पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर साधारण अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स