शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवून उष्माघाताचा धोका टाळता येतो? जाणून घ्या सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 17:01 IST

Heat stroke : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आजही काही लोक खिशात कांदा ठेवतात. पण खरंच खिशात कांदा ठेवण्याने उष्माघातापासून बचाव होतो का? 

Heat stroke : उन्हाळ्यात अनेकदा उन्ह लागण्याचा म्हणजे उष्माघाताचा धोका अधिक असतो. बाहेर जाताना योग्य ती काळजी घेतली नाही तर तुम्हाला उन्हाचा तडाखा बसू शकतो. आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. अनेकदा तर व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आजही काही लोक खिशात कांदा ठेवतात. पण खरंच खिशात कांदा ठेवण्याने उष्माघातापासून बचाव होतो का? 

काय आहे सत्य?

जुन्या काळात वाहनांची जास्त सोय नव्हती, ज्यामुळे लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात पायी चालत जावं लागत होतं. यामुळे उन्हाळ्यात लोक खिशात कांदा ठेवत होते. कारण यात वॉलटाईल ऑइल असतं, ज्यामुळे शरीराचं तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. पण केवळ कांदा खिसात ठेवून उष्माघाताचा धोका कमी करणं शक्य नाही.

जेवतानाही खावा कांदा

एक्सपर्ट्सनुसार, उन्हाळ्यात कांदा आपल्या रोजच्या आहाराचा भाग असला पाहिजे. याने बाहेरच्या तापमानाच्या प्रभावापासून बचाव करण्यास मदत मिळते. या असलेलं वॉलटाईल ऑइल एकीकडे शरीराला थंड ठेवतं तर सोबतच पोटॅशिअम आणि सोडिअमही शरीराला देतं. कच्चा कांदा अन्न पचवण्यासही मदत करतो. ज्यामुळे पोटासंबंधी समस्या होत नाहीत. एक्सपर्ट रोज एक मीडिअम साइजचा कच्चा कांदा खाण्याचा सल्ला देतात.

उष्माघातापासून वाचण्यासाठी आहार

एक्सपर्ट्सनुसार, जर रोजचा आहार योग्य असला तर उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो. नॅशनल हेल्थ पोर्टलवर असलेल्या एका माहितीनुसार, लोकांनी उन्हाळ्यात ताजी फळं, भाज्या आणि ज्यूसचं सेवन केलं पाहिजे. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण बरोबर राहतं. ज्यामुळे शरीराला डिहायड्रैशनपासून बचाव करण्यास मदत मिळते. शरीरात पाणी कमी झालं तर उष्माघाताचा धोका जास्त राहतो.

उन्हाळ्यात काय खावं?

उन्हाळ्यात रोज संत्री, अननस, कलिंगड, द्राक्ष खावेत.

कांदे, मिंट आणि खरबुजाचं सॅलडही शरीर थंड ठेवतं.

रोज एक किंवा दोन ग्लास फळांचा ज्यूस प्यावा.

दही, छास किंवा लस्सीचं सेवन करावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य