शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कारल्याची भाजी खाल्ल्यावर हे पदार्थ खाणं पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 16:03 IST

Foods To Avoid After Having Bitter Gourd : कारलं हे डायबिटीसच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर असतं. तसेच कारल्याचं सेवन केल्याने पोटासंबंधी अनेक समस्या लगेच दूर होतात.

Foods To Avoid After Having Bitter Gourd : कारल्याची भाजी म्हटलं की, अनेक लोक नाकं मुरडतात. कडू चव लागल्याने अनेक लोक ही भाजी खाणं टाळतात. पण ज्यांना आवडते ते लोक आवडीने ही भाजी खातात. अनेकांना माहीत असेल की, कारल्याच्या भाजीचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. कारलं हे डायबिटीसच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर असतं. तसेच कारल्याचं सेवन केल्याने पोटासंबंधी अनेक समस्या लगेच दूर होतात.

मात्र, कारलं खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हे अनेकांना माहीत नसतं. कारलं खाल्ल्यावर काही पदार्थ खाल्ले तर तुम्हाला समस्या होऊ शकतात. चला जाणून घेऊ कारलं खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये...

दूध - कारल्याचं सेवन केल्यानंतर तुम्ही दुधाचं सेवन चुकूनही करू नका. असं केलं तर तुम्हाला पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारले खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता, पोटात वेदना आणि जळजळ अशा समस्या होता. जर तुम्हाला आधीच पोटासंबंधी समस्या असेल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

मूळा - कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर मूळा किंवा मूळ्यापासून तयार कोणत्याही पदार्थाचं सेवन करू नये.  असं केल्याने तुम्हाला शरीरासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याचं कारण मूळा आणि कारल्याचे गुण वेगवेगळे असतात. ज्यामुळे तुम्हाला अॅसिडीटी आणि घशात कफ अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे कारलं खाल्ल्यानंतर मूळा अजिबात खाऊ नये.

दही - अनेक लोकांना जेवताना दही खाण्याची सवय असते. पण जर तुम्ही कारल्याच्या भाजीसोबत दह्याचं सेवन केलं तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर दह्याचं सेवन केलं तर तुम्ही त्वचेसंबंधी समस्येचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य