शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
3
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
4
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
5
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
6
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
7
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
8
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
9
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
10
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
11
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
12
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
13
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
14
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
15
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!
16
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
17
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
18
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
19
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
20
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे

डॉक्टरला न विचारता पेन किलर घेताय?-सावधान

By admin | Updated: May 22, 2017 17:40 IST

स्वत:च्याच मनानं स्वत:वर उपचार करणं का घातक आहे? -हे वाचा..

- निशांत महाजनडोकं दुखलं का घ्या औषध, सर्दी झालीये जा मेडिकलमध्ये घ्या औषध, असं करत छोट्यामोठ्या आजारात काहीजण स्वत:वरच औषधोपचार करत सुटतात. मेडिकलमध्ये जातात आणि पाठदुखी, डोकेदुखी, सर्दी-खोकला, तोंड येणं ते अंगदुखी ते अ‍ॅसिडीटी यासाऱ्यावर सर्रास स्वत:च्या मनानं वाट्टेल ती औषधं घेतात. किंवा मेडिकल स्टोअरम्ये जावून मेडिकलवाला जे देईल ते घेतात. किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेली जुनीच औषधं पुन्हा घेतात कारण डॉक्टरकडे जायचा कंटाळा. मात्र हे असं सेल्फ मेडिकेशन केल्यानं अनेकांच्या मागे अ‍ॅसिडीटी नावाचा मोठा आजार लागतो आहे. गेल्या वर्षभरात साधारण ११ टक्क्यांनी अ‍ॅण्टासिड गोळ्यांचा सेल वाढला आहे. आधी स्वत:च्या मनानं औषधं घेणं आणि मग अ‍ॅसिडीटी झाली म्हणून पुन्हा स्वत:च्या मनानंच अ‍ॅण्टासिड अर्थात अ‍ॅसिडीटी कमी करणाऱ्या गोळ्या घेणं असं एक दृष्टचक्र अनेकांच्या आयुष्यात सुरु झालं आहे.अ‍ॅसिडीटी होण्याचा आजार तसा कॉमन असला तरी तो लाइफस्टाईल डिसीज आहे. म्हणजे आपल्या चूकीच्या जीवनपद्धतीतून तो बळावतो. जीवनशैली आणि आहारविहारात नियमितता आणली तर अ‍ॅसिडीटी आटोक्यात राहू शकते. मात्र ते न करता सतत अ‍ॅण्टासिड घेत राहण्याची अत्यंत घातक सवय अनेकांना लागली आहे. तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यात अलिकडेच करण्यात आलेल्या एका क्लिनिकल सर्व्हेक्षणानुसार २७% रुग्ण हे स्वत:च्या आजाराचं स्वत:च निदान करतात. त्यासाठी पेनकिलर किंवा अन्य औषध स्वत:च्या मनानं डॉक्टरकडे न जाताच घेतात. आणि मग तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत त्या आजारापलिकडे एक दुसरा गंभीर आजार त्यांना बळावतो. तो म्हणजे वारंवार तीव्र पित्त होणं. अ‍ॅसिडीटी होतेय त्यावरही इतर इलाज न करता हे लोक पुन्हा मेडिकलमध्ये ओव्हर द काऊण्टर मिळणाऱ्या, जाहिरातीत दिसणाऱ्या अ‍ॅण्टासिड गोळ्या घेऊ लागतात. त्यानं ती बरी होत नाही. तात्पुरता आराम काहीजणांना मिळतो. आणि वारंवार अ‍ॅण्टासिड घेण्याची सवय लागते.अशी औषधं घेण्यात २० ते ३० वयोगटातील मुलांचं प्रमाण जास्त असल्याचंही डॉक्टरांचं निरीक्षण आहे. त्यामुळे स्वत:चं डोकं न चालवता, गुगल करुन आजाराचं निदान न करता डॉक्टरकडे जावं आणि औषधं घ्यावीत. तसं न केल्यास, मनानं औषधं घेत राहिल्यास अन्य आजारासह वारंवार पित्त होण्याचा आजार होतो. बळावतो. आणि बरा होणं अवघड असतं.