शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

डॉक्टरला न विचारता पेन किलर घेताय?-सावधान

By admin | Updated: May 22, 2017 17:40 IST

स्वत:च्याच मनानं स्वत:वर उपचार करणं का घातक आहे? -हे वाचा..

- निशांत महाजनडोकं दुखलं का घ्या औषध, सर्दी झालीये जा मेडिकलमध्ये घ्या औषध, असं करत छोट्यामोठ्या आजारात काहीजण स्वत:वरच औषधोपचार करत सुटतात. मेडिकलमध्ये जातात आणि पाठदुखी, डोकेदुखी, सर्दी-खोकला, तोंड येणं ते अंगदुखी ते अ‍ॅसिडीटी यासाऱ्यावर सर्रास स्वत:च्या मनानं वाट्टेल ती औषधं घेतात. किंवा मेडिकल स्टोअरम्ये जावून मेडिकलवाला जे देईल ते घेतात. किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेली जुनीच औषधं पुन्हा घेतात कारण डॉक्टरकडे जायचा कंटाळा. मात्र हे असं सेल्फ मेडिकेशन केल्यानं अनेकांच्या मागे अ‍ॅसिडीटी नावाचा मोठा आजार लागतो आहे. गेल्या वर्षभरात साधारण ११ टक्क्यांनी अ‍ॅण्टासिड गोळ्यांचा सेल वाढला आहे. आधी स्वत:च्या मनानं औषधं घेणं आणि मग अ‍ॅसिडीटी झाली म्हणून पुन्हा स्वत:च्या मनानंच अ‍ॅण्टासिड अर्थात अ‍ॅसिडीटी कमी करणाऱ्या गोळ्या घेणं असं एक दृष्टचक्र अनेकांच्या आयुष्यात सुरु झालं आहे.अ‍ॅसिडीटी होण्याचा आजार तसा कॉमन असला तरी तो लाइफस्टाईल डिसीज आहे. म्हणजे आपल्या चूकीच्या जीवनपद्धतीतून तो बळावतो. जीवनशैली आणि आहारविहारात नियमितता आणली तर अ‍ॅसिडीटी आटोक्यात राहू शकते. मात्र ते न करता सतत अ‍ॅण्टासिड घेत राहण्याची अत्यंत घातक सवय अनेकांना लागली आहे. तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यात अलिकडेच करण्यात आलेल्या एका क्लिनिकल सर्व्हेक्षणानुसार २७% रुग्ण हे स्वत:च्या आजाराचं स्वत:च निदान करतात. त्यासाठी पेनकिलर किंवा अन्य औषध स्वत:च्या मनानं डॉक्टरकडे न जाताच घेतात. आणि मग तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत त्या आजारापलिकडे एक दुसरा गंभीर आजार त्यांना बळावतो. तो म्हणजे वारंवार तीव्र पित्त होणं. अ‍ॅसिडीटी होतेय त्यावरही इतर इलाज न करता हे लोक पुन्हा मेडिकलमध्ये ओव्हर द काऊण्टर मिळणाऱ्या, जाहिरातीत दिसणाऱ्या अ‍ॅण्टासिड गोळ्या घेऊ लागतात. त्यानं ती बरी होत नाही. तात्पुरता आराम काहीजणांना मिळतो. आणि वारंवार अ‍ॅण्टासिड घेण्याची सवय लागते.अशी औषधं घेण्यात २० ते ३० वयोगटातील मुलांचं प्रमाण जास्त असल्याचंही डॉक्टरांचं निरीक्षण आहे. त्यामुळे स्वत:चं डोकं न चालवता, गुगल करुन आजाराचं निदान न करता डॉक्टरकडे जावं आणि औषधं घ्यावीत. तसं न केल्यास, मनानं औषधं घेत राहिल्यास अन्य आजारासह वारंवार पित्त होण्याचा आजार होतो. बळावतो. आणि बरा होणं अवघड असतं.