शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

एकदा वजन कमी केल्यानंतरही पुन्हा का वाढतं वजन? 'ही' असू शकतात कारणं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 11:23 IST

हेल्दी वेट लॉस म्हणजे कोणतीही समस्या न होता किंवा शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होता वजन कमी होणं. हे एक मोठं यश मानलं जातं.

(Image Credit : leaf.nutrisystem.com)

हेल्दी वेट लॉस म्हणजे कोणतीही समस्या न होता किंवा शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होता वजन कमी होणं. हे एक मोठं यश मानलं जातं. वजन कमी करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते आणि वेळही फार लागतो. पण वजन कमी केल्यानंतर काही दिवसांमध्येच पुन्हा वजन वाढणं सुरू होतं. अनेकांसोबत असं होतं. पण याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? कदाचित या प्रश्नाचं उत्तर अनेकांना माहीत नसेल. चला जाणून घेऊ याचं उत्तर...

कार्बोहायड्रेटचं चुकीचं प्रमाण

(Image Credit : heart.org)

वजन कमी करण्यादरम्यान कार्ब्स आणि प्रोटीनचं प्रमाण फार गरजेचं आहे. पण जंक फूड खाल्ल्याने किंवा ओव्हरइटिंगसारख्या चुका अनेकजण वजन कमी करण्यादरम्यान करत असतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे जास्तीत जास्त लोक एक योग्य डाएट फॉलो करत नाहीत. त्यामुळे वजन कमी केल्यानंतरही अचानक वजन वाढू लागतं.

जास्त ग्रीन टी पिणे

फार जास्त प्रमाणात ग्रीन टी चं सेवन करणं सुद्धा चुकीचच आहे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते. पण दिवसातून केवळ दोन कप ग्रीन टी चं सेवन करणं योग्य ठरतं. जास्त ग्रीन टी किंवा कॉपी प्यायल्याने शरीरात वॉटर रिटेंशन होतं आणि याने शरीर फुगलेलं दिसू लागतं.

स्टार्चयुक्त पदार्थ खाणं

नेहमीच ऑफिसमध्ये भूक लागल्यावर लोक स्टार्ट असलेल्या पदार्थांचं सेवन करतात. बर्गर, पिझ्झा किंवा डोनट यांसारख्या पदार्थांमध्ये स्टार्चचं प्रमाण अधिक असतं. यामुळेही तुमचं वजन वाढू लागतं.

जास्त वेळ उपाशी राहणं

अनेकांचा असा समज आहे की, जास्त वेळ काहीच न खाल्ल्याने किंवा उपाशी राहिल्याने वजन कमी होतं. पण सत्य हे आहे की, जास्त वेळ उपाशी राहिल्याने आपली भूक अधिक जास्त वाढते. ज्यामुळे आपण जास्त खातो, यामाध्यमातून कॅलरीज जास्त प्रमाणात आपल्या शरीरात पोहोचतात.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स