शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एकदा वजन कमी केल्यानंतरही पुन्हा का वाढतं वजन? 'ही' असू शकतात कारणं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 11:23 IST

हेल्दी वेट लॉस म्हणजे कोणतीही समस्या न होता किंवा शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होता वजन कमी होणं. हे एक मोठं यश मानलं जातं.

(Image Credit : leaf.nutrisystem.com)

हेल्दी वेट लॉस म्हणजे कोणतीही समस्या न होता किंवा शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होता वजन कमी होणं. हे एक मोठं यश मानलं जातं. वजन कमी करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते आणि वेळही फार लागतो. पण वजन कमी केल्यानंतर काही दिवसांमध्येच पुन्हा वजन वाढणं सुरू होतं. अनेकांसोबत असं होतं. पण याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? कदाचित या प्रश्नाचं उत्तर अनेकांना माहीत नसेल. चला जाणून घेऊ याचं उत्तर...

कार्बोहायड्रेटचं चुकीचं प्रमाण

(Image Credit : heart.org)

वजन कमी करण्यादरम्यान कार्ब्स आणि प्रोटीनचं प्रमाण फार गरजेचं आहे. पण जंक फूड खाल्ल्याने किंवा ओव्हरइटिंगसारख्या चुका अनेकजण वजन कमी करण्यादरम्यान करत असतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे जास्तीत जास्त लोक एक योग्य डाएट फॉलो करत नाहीत. त्यामुळे वजन कमी केल्यानंतरही अचानक वजन वाढू लागतं.

जास्त ग्रीन टी पिणे

फार जास्त प्रमाणात ग्रीन टी चं सेवन करणं सुद्धा चुकीचच आहे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते. पण दिवसातून केवळ दोन कप ग्रीन टी चं सेवन करणं योग्य ठरतं. जास्त ग्रीन टी किंवा कॉपी प्यायल्याने शरीरात वॉटर रिटेंशन होतं आणि याने शरीर फुगलेलं दिसू लागतं.

स्टार्चयुक्त पदार्थ खाणं

नेहमीच ऑफिसमध्ये भूक लागल्यावर लोक स्टार्ट असलेल्या पदार्थांचं सेवन करतात. बर्गर, पिझ्झा किंवा डोनट यांसारख्या पदार्थांमध्ये स्टार्चचं प्रमाण अधिक असतं. यामुळेही तुमचं वजन वाढू लागतं.

जास्त वेळ उपाशी राहणं

अनेकांचा असा समज आहे की, जास्त वेळ काहीच न खाल्ल्याने किंवा उपाशी राहिल्याने वजन कमी होतं. पण सत्य हे आहे की, जास्त वेळ उपाशी राहिल्याने आपली भूक अधिक जास्त वाढते. ज्यामुळे आपण जास्त खातो, यामाध्यमातून कॅलरीज जास्त प्रमाणात आपल्या शरीरात पोहोचतात.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स