शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मासिक पाळी 'मानवी हक्क' म्हणून घोषित करणे ही काळाची गरज; चर्चासत्रात तज्ज्ञांनी मांडले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 18:32 IST

संस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' हा उपक्रम राबवला जातो.

ठळक मुद्देसंस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' हा उपक्रम राबवला जातो.

ठाणे : म्युस फाउंडेशन या युवा संस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमांतर्गत 'मासिका महोत्सव' या संकल्पनेत स्त्रिया आणि तृतीयपंथीयांना जगावर ओढवलेल्या महामारीचा मासिक पाळी हाताळण्यावर झालेला परिणाम यावर एका चर्चासत्रात स्वाती सिंग-मुहीम, अंजली दालमिया, पॅट्रीशिया एम्बोया, स्टीफन एनझुसा आणि डियान डी मेनेझेस यांनी आपले विचार मांडले.शहरात आणि गावात स्थायिक असलेल्यांना महामारीमुळे आर्थिक चणचण जाणवली ज्याचा परिणाम त्यांच्या पौष्टिकतेवर झाला. आर्थिक बंधनामुळे सॅनिटरी पॅड्स आणि इतर संबंधीत गोष्टींना महत्व दिले गेले नाही. मासिक पाळी अनुभवणाऱ्यांना शहरातून गावाला येताना पुरेशा पायाभूत सुविधा आणि शौचालय न मिळाल्याने  शारीरिक आणि मानसिक त्रास झाला. महामारी पसरल्यावर सॅनिटरी पॅड्स आणि मासिक पाळी संबंधी गोष्टींचा पुरवठा न झाल्यामुळे तरुण मुलींना व स्त्रियांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. केनियातील मासिक पाळी प्रश्न  हाताळणाऱ्या समितीने काही प्रकरणे हाताळली ज्यात तरुण मुलींना मासिक पाळीसाठी लागणारे पॅड्स परवडत नाही म्हणून त्यांनी गर्भवती राहण्याचा निर्णयही घेतला. अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरा यांनाही महामारीमुळे बळ आले.स्त्रीरोगतज्ञ आणि इतर वैद्यकीय सेवांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आणि महामारीच्या काळात मासिक पाळीकडे दुर्लक्षिले गेले.या चोघांनीही आपल्या शहरांमधल्या व्यथा सांगत योग्य ते उपाय सुद्धा सुचवले. प्रथमतः देशासाठीच्या धोरण  बनवण्याच्या प्रक्रियेत स्त्रियांना जास्तीत जास्ती समाविष्ट करणे गरजेचे आहे. सॅनिटरी पॅड्स, स्त्रियांची अंतर्वस्त्रे आणि मासिक पाळीच्या उपयोगी वस्तूंना कर मुक्त करून त्या मोफत देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या जास्तीत जास्त स्त्रिया आणि तृतीयपंथी लोकांपर्यंत पोहोचतील. अत्यावश्यक सेवेतील मासिक पाळीला सामोरे जाणाऱ्यांना मोठेपणाचा दर्जा देऊन त्यांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष द्यायला हवे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मासिक पाळी हा एक 'मानवी हक्क' म्हणून घोषित करणे ही काळाची गरज आहे असेही या चर्चासत्रात मांडले गेले.

टॅग्स :Healthआरोग्यthaneठाणेIndiaभारतkenyaकेनिया