शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

मासिक पाळी 'मानवी हक्क' म्हणून घोषित करणे ही काळाची गरज; चर्चासत्रात तज्ज्ञांनी मांडले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 18:32 IST

संस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' हा उपक्रम राबवला जातो.

ठळक मुद्देसंस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' हा उपक्रम राबवला जातो.

ठाणे : म्युस फाउंडेशन या युवा संस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमांतर्गत 'मासिका महोत्सव' या संकल्पनेत स्त्रिया आणि तृतीयपंथीयांना जगावर ओढवलेल्या महामारीचा मासिक पाळी हाताळण्यावर झालेला परिणाम यावर एका चर्चासत्रात स्वाती सिंग-मुहीम, अंजली दालमिया, पॅट्रीशिया एम्बोया, स्टीफन एनझुसा आणि डियान डी मेनेझेस यांनी आपले विचार मांडले.शहरात आणि गावात स्थायिक असलेल्यांना महामारीमुळे आर्थिक चणचण जाणवली ज्याचा परिणाम त्यांच्या पौष्टिकतेवर झाला. आर्थिक बंधनामुळे सॅनिटरी पॅड्स आणि इतर संबंधीत गोष्टींना महत्व दिले गेले नाही. मासिक पाळी अनुभवणाऱ्यांना शहरातून गावाला येताना पुरेशा पायाभूत सुविधा आणि शौचालय न मिळाल्याने  शारीरिक आणि मानसिक त्रास झाला. महामारी पसरल्यावर सॅनिटरी पॅड्स आणि मासिक पाळी संबंधी गोष्टींचा पुरवठा न झाल्यामुळे तरुण मुलींना व स्त्रियांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. केनियातील मासिक पाळी प्रश्न  हाताळणाऱ्या समितीने काही प्रकरणे हाताळली ज्यात तरुण मुलींना मासिक पाळीसाठी लागणारे पॅड्स परवडत नाही म्हणून त्यांनी गर्भवती राहण्याचा निर्णयही घेतला. अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरा यांनाही महामारीमुळे बळ आले.स्त्रीरोगतज्ञ आणि इतर वैद्यकीय सेवांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आणि महामारीच्या काळात मासिक पाळीकडे दुर्लक्षिले गेले.या चोघांनीही आपल्या शहरांमधल्या व्यथा सांगत योग्य ते उपाय सुद्धा सुचवले. प्रथमतः देशासाठीच्या धोरण  बनवण्याच्या प्रक्रियेत स्त्रियांना जास्तीत जास्ती समाविष्ट करणे गरजेचे आहे. सॅनिटरी पॅड्स, स्त्रियांची अंतर्वस्त्रे आणि मासिक पाळीच्या उपयोगी वस्तूंना कर मुक्त करून त्या मोफत देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या जास्तीत जास्त स्त्रिया आणि तृतीयपंथी लोकांपर्यंत पोहोचतील. अत्यावश्यक सेवेतील मासिक पाळीला सामोरे जाणाऱ्यांना मोठेपणाचा दर्जा देऊन त्यांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष द्यायला हवे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मासिक पाळी हा एक 'मानवी हक्क' म्हणून घोषित करणे ही काळाची गरज आहे असेही या चर्चासत्रात मांडले गेले.

टॅग्स :Healthआरोग्यthaneठाणेIndiaभारतkenyaकेनिया