शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोनाने होणारे मृत्यू आणि डायबिटीस, कॅन्सर, हायपरटेंशन या आजारांचा संबंध कसा?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 13:00 IST

CoronaVirus News & Latest Updates : डायबिटिस, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार,  हृदयासंबंधी आजार असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असतो. 

भारतात कोरोनामुळे होत असलेल्या मृतांचे आकडे पाहिल्यास दिसून येईल की, मंगळवारी मगील  दीड महिन्यांपासून सगळ्यात कमी मृत्यूंची नोंद झाली होती. मंगळवारी देशभरात ७०६  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर १.५ टक्क्यांनी कमी झाला आहे. डायबिटिस, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार,  हृदयासंबंधी आजार असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असतो. 

समोर आलेल्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरसने संक्रंमित झाल्यास या आजारांनी ग्रासलेल्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. या आजारातील  १७.९ टक्के रुग्णांनी कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर आपले प्राण गमावले आहेत. ज्यांना कोरोनाशिवाय इतर  कोणतेही आजार नव्हते अशा लोकांपैकी १.२ टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांवरून दिसून येत की भारतात दोन्ही प्रकारच्या आजारांनी मिळून एकूण १.५ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. 

४५ ते ६० वर्ष वयोगटातील मृतांची संख्या १३.९ टक्के आहे या वयोगटातील अनेक लोक हे गंभीर आजारांनी पीडित होते. तर १.५ टक्के लोकांना कोणताही दुसरा आजार नव्हता. ६० वर्षावरील मृतांमध्ये  २४.६ टक्के लोक कोरोनासह गंभीर आजारांनी पीडित होते. तर ४.८ टक्के लोकांना कोणतेही आजार नव्हते. ४५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मृतांमध्ये ८.८ टक्के लोकांना कोरोनासह इतर आजार उद्भवले होते. तर  ०.२ टक्के लोकांना कोणतेही आजार उद्भवले नव्हते. हर्ड इम्यूनिटीबाबत WHO ने दिली धोक्याची सुचना, कोरोनाबाबत गैरसमज ठेवल्यास पडेल महागात

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येतं की, जास्त प्रमाणात तरूण कोरोना संक्रमित होत आहेत. कोरोनामुळे मृत्यू होत असलेले ५३ टक्के लोक ६० वर्षांवरील वयोगटातील आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांमध्ये ७० टक्के पुरूष असून ३० टक्के महिलांचा समावेश आहे. मोठा दिलासा! कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लसीकरण कधी सुरू होणार? सरकारने दिले संकेत

दरम्यान देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 72,39,390 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 63,509 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 730 जणांचा मृत्यू झाला आहे.  कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,10,586 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोनाची पुन्हा लागण होत असल्याची माहिती मिळत आहे. रोज कापडाचा मास्क वापरता? जाणून घ्या मास्कच्या वापराबाबत समोर आलेलं नवीन संशोधन 

देशात कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याची माहिती मिळत आहे. तसेच देशात दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी 100 दिवस निश्चित करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला एखादा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला 100 दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे अशी माहिती आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. हाँगकाँगमध्ये याआधी अशा केसेस समोर आल्या होत्या. त्यानंतर आता भारतात आल्या आहेत.  'या' कारणामुळे कोरोनाला रोखण्यात चीनने मारली बाजी; लोक आता बिनधास्त करतायेत पार्ट्या

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू