शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

दिलासादायक! कोरोना रुग्णांना प्राण्यांच्या अँटीबॉडी दिल्या जाणार, लवकरच चाचणीला सुरूवात होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 19:57 IST

CoronaVirus News & Latest News : तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या शरीरात प्राण्यांच्या एंटीबॉडीज टाकल्या जाणार आहेत. ही पद्धत कितपत परिणामकारक ठरते हे पाहण्यासाठी लवकरच चाचणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

कोरोना व्हायरसचं संक्रमण आटोक्यात येण्यासाठी आणि लस औषधं तयार करण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी गंभीर आजारांसाठी वापरात असलेल्या औषधांचा, प्लाज्मा थेरेपीचा वापर अनेक देशांमध्ये करण्यात येत आहे. दरम्यान कोरोना रुग्णांच्या उपचारांबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या शरीरात प्राण्यांच्या एंटीबॉडीज टाकल्या जाणार आहेत. ही पद्धत कितपत परिणामकारक ठरते हे पाहण्यासाठी लवकरच चाचणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीने मिळून एक अँटिसेरा विकसित केलं आहे. ज्याच्या मानवी चाचणीला आता मंजुरी मिळाली आहे. लवरकरच या उपचारपद्धतीचे क्लिनिकल ट्रायल सुरू होणार आहे. अँटिसेरा हे एक ब्लड सीरम आहे. म्हणजेच ज्यामध्ये आजाराविरोधात लढण्याची क्षमता असणाऱ्या अँटिबॉडीजचं पेशींचे प्रमाण अधिक असते. कोणत्याही  व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती लगेच वाढवण्यासाठी माणसांना हे सीरम इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं.

या माध्यमातून शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडी तयार केल्या आहेत. याआधी वॅक्सिनिया व्हायरस, टिटॅनस, डिप्थिरिया, रेबीज, हेपेटायटिस, या  आजारांच्या रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले होते. अशी माहिती आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी दिली आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार घोड्याचा सेरा तयार केला असून याबाबत अभ्यासही पूर्ण  केला आहे. तसंच या उपचार पद्धतीच्या चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. हे अँटीसेरा कोरोना व्हायरसवर उपचारासाठी फायद्याचं तर ठरेलच शिवाय कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठीही याचा वापर करता येईल. 

हिवाळ्यात कोरोना अधिक धोकादायक होणार का?

हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनेच याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली होती. तापमानाचा कोरोनावर काय परिणाम होतो याबाबत जगभरातील तज्ज्ञ आपलं मत मांडत आहेत. प्रामुख्याने हंगामी व्हायरस हे (Seasonal Virus) हिवाळ्याम्ध्ये सक्रिय होतात. जगभरातील अनेक भागांमध्ये हिवाळ्यामध्ये इन्फ्युएंझाचा प्रकोप वाढताना दिसतो. आतापर्यंत कोरोनाच्या ट्रेंडमध्ये काही विशेष फरक झालेला दिसत नाही. आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होतात? इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारकडून मागितला पुरावा

फ्लू व्हायरसमुळे हिवाळ्यात सर्वाधिक मृत्यू

व्हायरसमुळे होणारे श्वसनयंत्रणेशी संबंधित आजार हे थंड तापमानात वाढतात. याच कारणामुळे फ्लू व्हायरसमुळे हिवाळ्यात सर्वाधिक मृत्यू होत असतात. त्यामुळेच कोरोनामुळे हिवाळ्यात अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती अनेकांनी वर्तवली होती. आतापर्यंत तापमानामुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गात वाढ झाल्याचं स्पष्ट झालेलं नाही. भारतात एकूण सहा ऋतू असून हिवाळ्यात इन्फ्लुएंझाचा प्रकोप वाढताना दिसत नसून तो जून ते सप्टेंबर या काळात वाढतो असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. खुशखबर! कॅन्सरच्या उपचारांसाठी भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं अनोखं 'बँडेज', तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या