शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

CoronaVirus News : 'कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा दोष नाही; तर 'या' कारणामुळे आली दुसरी लाट'; डॉक्टरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 13:09 IST

CoronaVirus News & Latest Updates : दुसऱ्या लाटेपेक्षा शिक्षित आणि मध्यमवर्गीय लोक वाढत्या उद्रेकाला जबाबदार असल्याचे सांगितले आहे. 

भारतात कोरोना व्हायरसच्या लाटेला लोक जबाबदार आहेत. कोरोना इन्फेक्शनपासून बचावासाठी मागच्या वर्षापासून ज्या उपयायोजना राबवल्या जात होत्या. ज्यापद्धतीनं काळजी घेतली जात होती. त्यात निष्काळजीपणा होताना दिसून आला. इंडियन  काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR) चे माजी संचालक डॉ. वी एम कटोच यांनी दैनिक भास्करशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा शिक्षित आणि मध्यमवर्गीय लोक वाढत्या उद्रेकाला जबाबदार असल्याचे सांगितले आहे. 

१ मे पासून १८ वर्षांवरील सगळ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार थांबेल का?

यावर त्यांनी सांगितले की, ''लस म्हणजे काही जादूची छडी नाही. लसीमुळे फक्त एक सुरक्षा कवच मिळते. त्यामुळे  कोरोना संक्रमणाची तीव्रता कमी होते. हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन कामगार नेहमीच सामान्यांच्या संपर्कात राहतात. म्हणूनच सरकारनं त्यांना सगळ्यात आधी लस त्यांना लस दिली. कोरोनाची लस घेतल्यानंतर लोकांनी नियमांचे पालन केले तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो.'' 

 कोरोना संक्रमणाचा धोका ३१ टक्क्यांनी कमी करणार हा सोपा उपाय; संशोधनातून खुलासा

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दुसरी लाट अधिक तीव्र झाली?

डॉ. कटोच म्हणाले  की, ''लोक आपल्या निष्काळजीपणाचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडत आहेत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची संक्रामता जास्त आहे. पण कोरोनाशी निगडीत इतर गोष्टींशी सावधगिरी बाळगल्यास संक्रमणाचा धोक कमी होतो. मागच्या वर्षी ज्या उपायांचे पालन केले जात होते. त्याचप्रकारे आताही सातत्यानं नियम पाळायला हवेत.''

दुसऱ्या लाटेच्या संक्रमणाची तीव्रता  कधी कमी होणार?

या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ''जर आज कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लोकांनी आवश्यक उपाययोजना केल्या तर 20-25 दिवसात नवीन संक्रमितांची संख्या कमी होईल. परंतु त्यासाठी कोरोनाशी संबंधित उपायांचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे. गेल्या वर्षी सरकारने निर्बंध लादले होते.

 कौतुकास्पद! १३ महिन्यात एकही पॉझिटिव्ह केस नाही, कोरोनाच्या लाटेपासून भारतातल्या गावानं 'असा' केला बचाव

यामागील एकमेव कारण म्हणजे लोकांचा संपर्क कमी असावा जेणेकरून व्हायरस जास्त पसरू नये. गेल्या वर्षीही लाट सुशिक्षित मध्यमवर्गामुळे पसरली होती. परदेशातून आलेल्या लोकांनी निष्काळजीपणाने लोकांमध्ये संसर्ग पसरविला. तेव्हा आपण लस न देता देखील कोरोना संसर्गाला कमी  केले होते.''

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाHealthआरोग्य