शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

CoronaVirus : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो? तज्ज्ञ सांगतात की...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 11:48 AM

डॉक्टरांच्या वापरात असलेला सर्जिकल मास्क सामान्य लोकांनी वापरल्यास त्रासाचा सामना करावा लागू शकतो. 

कोरोना व्हायरसचा कहर देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे.  कोरोनापासून बचाव करणारी लस अजूनही उपलब्ध झालेली नाही. गंभीर आजारावर वापरात असेलल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णाचे जीव वाचवण्यासाठी केला जात आहे. अशा स्थितीत कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासासाठी आणि निरोगी राहण्यासाठी  मास्कचा वापर महत्वाचा आहे. लेडी हार्डींग  मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक डॉ. अर्पणा  अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार मास्क लावण्याच्या सवयीवर अनेक रिसर्च करण्यात आले आहेत. कॉटनचा मास्क वापरल्यानं कोणतीही समस्या उद्भवत नाही. डॉक्टरांच्या वापरात असलेला सर्जिकल मास्क सामान्य लोकांनी वापरल्यास त्रासाचा सामना करावा लागू शकतो. 

सुरूवातीला लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसचा धोका कमी असल्याचं दिसून आलं होतं.  त्यानंतरच्या संशोधनात लहान मुलांनाही व्हायरसच्या संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो हे दिसून आलं म्हणूनच  12 वर्षावरिल लहान मुलांना मास्क वापरणं गरजेचं आहे. त्याखालील वयोगटातील मुलांकडे विशेष लक्ष  देणं गरजेचं आहे. दिल्लीच्या रुग्णालयातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो तेव्हा मास्क लावूनच निघायला हवं. 

एकदा मास्क वापरल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी त्याच मास्कचा वापर करू नका.  कापडाचा मास्क वापरत असाल तर तुम्ही धुवून त्याच मास्कचा वापर करू शकता.  खबरदारी म्हणून आपल्यासोबत नेहमी दोन मास्क ठेवा.  अर्धवट सुकलेला मास्क वापरू नका कारण त्यामुळे एलर्जी, खोकला, गुदमरण्याची समस्या उद्भवू शकते. सर्जिकल मास्क असल्यास वापरल्यानंतर फेकून द्या. लक्षणं असल्यावरच होम क्वारंटाईन करायला हवं असं नाही. चुकून एखाद्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यास तुम्ही स्वतःला क्वारंटाईन करायला हवं. संक्रमित व्यक्तीचे कपडे वेगळे धुवायला हवेत. किंवा संक्रमित रुग्णानं स्वतःच साफसफाई करून खबरदारी बाळगल्यास उत्तम ठरेल. 

देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक

देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी उपाय केले जात असतानाच कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून नवा उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 44 लाखांवर पोहोचली असून पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 44,65,864 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 75062 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (10 सप्टेंबर) देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 95,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 44 लाख 65 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 75 हजारांवर पोहोचला आहे. 

हे पण वाचा-

काळजी वाढली! व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे झपाट्यानं वाढतोय कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा दावा

मक्याच्या चमकदार धाग्याचे 'हे' फायदे वाचाल तर फेकण्याआधी १० वेळा विचार कराल

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या