शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

CoronaVirus : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो? तज्ज्ञ सांगतात की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 11:58 IST

डॉक्टरांच्या वापरात असलेला सर्जिकल मास्क सामान्य लोकांनी वापरल्यास त्रासाचा सामना करावा लागू शकतो. 

कोरोना व्हायरसचा कहर देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे.  कोरोनापासून बचाव करणारी लस अजूनही उपलब्ध झालेली नाही. गंभीर आजारावर वापरात असेलल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णाचे जीव वाचवण्यासाठी केला जात आहे. अशा स्थितीत कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासासाठी आणि निरोगी राहण्यासाठी  मास्कचा वापर महत्वाचा आहे. लेडी हार्डींग  मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक डॉ. अर्पणा  अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार मास्क लावण्याच्या सवयीवर अनेक रिसर्च करण्यात आले आहेत. कॉटनचा मास्क वापरल्यानं कोणतीही समस्या उद्भवत नाही. डॉक्टरांच्या वापरात असलेला सर्जिकल मास्क सामान्य लोकांनी वापरल्यास त्रासाचा सामना करावा लागू शकतो. 

सुरूवातीला लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसचा धोका कमी असल्याचं दिसून आलं होतं.  त्यानंतरच्या संशोधनात लहान मुलांनाही व्हायरसच्या संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो हे दिसून आलं म्हणूनच  12 वर्षावरिल लहान मुलांना मास्क वापरणं गरजेचं आहे. त्याखालील वयोगटातील मुलांकडे विशेष लक्ष  देणं गरजेचं आहे. दिल्लीच्या रुग्णालयातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो तेव्हा मास्क लावूनच निघायला हवं. 

एकदा मास्क वापरल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी त्याच मास्कचा वापर करू नका.  कापडाचा मास्क वापरत असाल तर तुम्ही धुवून त्याच मास्कचा वापर करू शकता.  खबरदारी म्हणून आपल्यासोबत नेहमी दोन मास्क ठेवा.  अर्धवट सुकलेला मास्क वापरू नका कारण त्यामुळे एलर्जी, खोकला, गुदमरण्याची समस्या उद्भवू शकते. सर्जिकल मास्क असल्यास वापरल्यानंतर फेकून द्या. लक्षणं असल्यावरच होम क्वारंटाईन करायला हवं असं नाही. चुकून एखाद्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यास तुम्ही स्वतःला क्वारंटाईन करायला हवं. संक्रमित व्यक्तीचे कपडे वेगळे धुवायला हवेत. किंवा संक्रमित रुग्णानं स्वतःच साफसफाई करून खबरदारी बाळगल्यास उत्तम ठरेल. 

देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक

देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी उपाय केले जात असतानाच कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून नवा उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 44 लाखांवर पोहोचली असून पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 44,65,864 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 75062 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (10 सप्टेंबर) देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 95,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 44 लाख 65 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 75 हजारांवर पोहोचला आहे. 

हे पण वाचा-

काळजी वाढली! व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे झपाट्यानं वाढतोय कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा दावा

मक्याच्या चमकदार धाग्याचे 'हे' फायदे वाचाल तर फेकण्याआधी १० वेळा विचार कराल

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या