शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सावधान! कोरोना कमी झाला, पण 'मेंटल ट्रॉमा' वाढला; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 16:00 IST

Corona Virus : कोरोना संपल्यानंतर लॉकडाऊन हटवला जाईल आणि सर्व काही पूर्वीसारखे होईल, परंतु या महामारीनंतरही, त्यामुळे लोकांचे मानसिक आरोग्य सुधारलेले नाही.

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या महामारीने जगातील लाखो लोकांचा मृत्यू झाला. या आजारामुळे भारतासह इतर देशांतील लोकांना अनेक महिने घरातच थांबावं लागलं. मात्र अद्यापही कोरोनाने पाठ सोडलेली नाही. संकट फक्त सध्या थोडं कमी झालं आहे. अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाँग कोविडच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाला आहे.

Sapien लॅबद्वारे प्रकाशित Tara Thiagarajan आणि Jennifer Newson यांचा 2023 च्या ग्लोबल मेंटल स्टेट रिपोर्टमध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, लोकांना वाटलं होतं की कोरोना संपल्यानंतर लॉकडाऊन हटवला जाईल आणि सर्व काही पूर्वीसारखे होईल, परंतु या महामारीनंतरही लोकांचे मानसिक आरोग्य सुधारलेले नाही.

71 देशांमधील (46,982 भारतातील) चार लाखांहून अधिक लोकांसह केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की 30.4 टक्के भारतीय मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत आणि ते खराब मानसिक आरोग्याशी संघर्ष करत आहेत, तर जागतिक स्तरावर ही संख्या 27.1 टक्के आहे. भारताच्या तुलनेत युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियामध्ये जास्त लोक मानसिक समस्यांनी ग्रस्त आहेत. याउलट कॅनडा, अमेरिका, सिंगापूर, फ्रान्स, इस्रायल, इटली आणि श्रीलंका येथे लोकांचे मानसिक आरोग्य चांगलं आहे.

प्लास्टिकचा वापर धोकादायक

या रिपोर्टमध्ये असा युक्तिवाद करण्यात आला आहे की साथीच्या रोगाने आणलेले अनेक बदल अजूनही सुरू आहेत. कोरोनानंतर प्लास्टिकचा वापर वाढला आहे. Surfrider फाउंडेशनच्या रिपोर्टनुसार, प्लास्टिकमध्ये आढळणाऱ्या Phthalates आणि इतर केमिकल्समुळे माणूस नैराश्य, चिंता, ADD किंवा स्किझोफ्रेनिया सारख्या मानसिक आजारांना बळी पडू शकतात.

सर्वाधिक फटका 35 वर्षांच्या लोकांना

तरुण वयात स्मार्टफोन वापरणं आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्याचे या रिपोर्टमध्ये आढळून आले आहे. त्याचा सर्वाधिक फटका 35 वर्षांच्या लोकांना बसला आहे. तर 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या मानसिक आरोग्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

मानसिक आरोग्याच्या समस्या

भारतात, 18-24 वयोगटातील निम्म्याहून अधिक लोक (50.7 टक्के) मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. तर 25-34 वयोगटातील ही संख्या 42.9 टक्के, 35-44 वयोगटातील लोकांसाठी 28.7 टक्के आणि 45-54 वयोगटातील 17.6 टक्के होती. याशिवाय 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे.

शिक्षण आणि मानसिक आरोग्य यांचा खोलवर संबंध असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. शिक्षण जितके जास्त तितका ताण कमी किंवा याच्या उलट देखील असू शकतं. भारतात, प्राथमिक शिक्षण घेतलेले सुमारे 48 टक्के लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत, तर पीएचडी पदवी घेतलेले 14.4 टक्के लोक अशा मानसिक स्थितीत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य