शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

भारतात लसीकरणाला सुरूवात होणार?; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं सगळ्यात आधी कोणाला मिळणार लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 16:28 IST

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरस विरुदध लढाईचा हा ११ वा महिला सुरू आहे. संपूर्ण जगभरात २५० पेक्षा जास्त कंपन्या कोरोनाची लस तयार करत आहेत. यातील ३० कंपन्यांचे भारताकडे  लक्ष आहे.

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिल्लीत मागच्या सहा दिवसात ६२८ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याबाबत आजतकशी बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. यांनी सांगितले की, '' कोरोना व्हायरस विरुदध लढाईचा हा ११ वा महिला सुरू आहे. संपूर्ण जगभरात २५० पेक्षा जास्त कंपन्या कोरोनाची लस तयार करत आहेत. यातील ३० कंपन्यांचे भारताकडे  लक्ष आहे. देशात पाच लसींच्या चाचण्या सुरू आहेत. २०२१ च्या सुरूवातीच्या तीन महिन्यात आपल्याला लस मिळू शकते. सप्टेंबरपर्यंत २५ ते ३० कोटी भारतीयांना लस दिली  जाईल.''

पुढे त्यांनी सांगितले की, ''सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.  त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचारी, पोलीस पॅरामिलिट्री फोर्स या क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला लस दिली जाणार आहे. त्यानंतर ६५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आणि ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.''

दिलासादायक! भारतीय अमेरिकन डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे संभाव्य उपचार; उंदरांवरील चाचणी ठरली यशस्वी

''कोरोनाला रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती पसरवली जात आहे.  नियमांचे पालन अनेक ठिकाणी सक्तीने केले जात आहे. आतापर्यंत ९० लाखांवर  रुग्णांची संख्या गेली असून  ८५ लाख रुग्ण बरे झाले आहेत. सगळ्यात चांगला रिकव्हरी रेट भारताचा आहे.'' काही शहरांमध्ये कोरोना प्रसाराची स्थिती ही खूप चिंताजनक आहे. आम्ही लोकांना कोरोनापासून बचावासाठी बेसिक प्रोटोकॉल्सचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. ३० जानेवारीला पहिला रुग्ण सापडल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून आमची टीम इतर ठिकाणी पोहोचली. '' असं ही त्यांनी यावेळी सांगितलं.

आपातकालीन स्थितीत कोरोना लसीचा वापर सुरू होणार? कोरोनाच्या वाढत्या प्रसारानं वाढली चिंता

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितले की, ''राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी केंद्राने दखल  घेतली आहे. आता पुन्हा कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय मोबाईल टेस्टिंग वॅनची सुद्धा व्यवस्था केली जात आहे. टेस्ट आणि ट्रेसिगद्वारे कोरोनाला रोखता येऊ शकतं. त्यासाठी त्वरित ट्रेसिंग करण्याची आवश्यकता आहे.  दिल्लीतील प्रदूषण ही सगळ्यात मोठी समस्या आहे. लवकरच पंतप्रधान मोदी कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठकीत चर्चा करणार आहेत.''

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य