शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! एमएमआर लसीने कोरोनाच्या संक्रमणापासून राहता येईल दूर; वाचा तज्ज्ञांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 16:31 IST

CoronaVirus News Update : ही लस दिल्याने कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे होणारी सेप्टिक सुज कमी करता येऊ शकतं. 

कोरोनाचा हाहाकार भारतासह संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. कोरोनाच्या माहामारीवर नियंत्रण मिळवण्याासाठी जगभरातील विविध देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. एका संशोधनानुसार कोरोना व्हायरसच्या लक्षणांपासून बचाव करण्यासाठी एमएमआर लस प्रभावी ठरू शकते.  ही लस दिल्याने कोरोना व्हायरसच्या  संक्रमणामुळे होणारी सेप्टिक सुज कमी करता येऊ शकतं. 

अमेरिकन सोसायटी फॉर मायकोबायोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे. त्यांच्याबद्दल काळजीचे कारण नाही. पण आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या लोकांसाठी एमएमआर  (Corona & MMR Vaccine) फायदेशीर ठरू शकते. कारण कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे आरोग्य सेवेतील लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. 

लुइसियाना स्टेट हेल्थ स्कूलचे रिसर्च एसोसिएट डीन डॉ. पॉल फिडेल, यांनी दिलेल्या माहितीनुसार माहामारीच्या काळात जोखिम  जास्त असलेल्या ठिकाणी  लोकांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी ही लस उपयोगी ठरू शकते. असे परिक्षणातून दिसून आले हे. एमएमआर लसीमुळे कोणत्याही समस्या उद्भवतील असं मला वाटत नाही; त्यामुळे कोरोनाच्या संक्रमणाशी सामना करता येईल, असंही फिडेल म्हणाले. 

यूएसएस रूजवेल्टवर ९५५ नाविकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली  होती. कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांची टेस्ट पॉजिटिव्ह आली. त्यातील फक्त एका व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासली, कारण एमएमआर लसी ही सगळ्या सैनिकांना देण्यात आली होती. याशिवाय ज्या लोकांनी एमएमआर लस  घेतली आहे. त्यांच्यातील मृत्यूदर कमी दिसून आला. 

संशोधकांनी वैद्यकीय परिक्षणाचा प्रस्ताव मांडला आहे. जेणेकरून एमएमआर लस कोरोनापासून कितपत बचाव करू शकते हे निदर्शनास येईल. त्यानुसार आरोग्य विभागात कार्यरत असलेला कर्मचारी वर्ग, सांभाळ करणारे कामगार, नर्स, वयस्कर लोक यांना लस देता येईल. 

दरम्यान देशातील कोरोनाबाधितांचा आकडा बुधवारी ४ लाख ५६ हजारांवर गेला असताना, त्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ४२ हजार ९०० रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५१.६४ टक्के आहे. हे प्रमाण समाधानकारक वाटत असले तरी देशाच्या तुलनेत ते कमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७१ टक्के आहे. मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील अर्थचक्र पुन्हा सुरू करण्यातही सरकारला अडचणी येत आहेत.

सावधान! जास्त वेळ एकाच जागी बसल्याने वाढत आहे कॅन्सरचा धोका; जाणून घ्या रिसर्च

चपला, बुटांसोबत तुम्ही कोरोना विषाणूही घरी आणताय का? 'अशी' घ्या काळजी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स