शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

कंट्रोल न होणा-या रागाला असे करा कंट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 11:40 IST

आज आपण आपल्या रागाला ओळखण्याचे संकेत आणि त्यापासून सुटका कशी मिळवता येईल याविषयी जाणून घेऊया.

ट्रॅफिकमधून तुम्हाला कुणी कट मारला तर राग येतो का? तुमची लहान मुलं तुमचं ऐकत नसतील तर राग येतो का? राग हा मानवी स्वभावाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. पण यासोबत सकारात्मकपणे डील करणे फायद्याचे ठरेल. कंट्रोल न होणारा राग हा तुमच्या आरोग्यासाठी आणि रिलेशनशिपसाठीही धोक्याचा आहे. आज आपण आपल्या रागाला ओळखण्याचे संकेत आणि त्यापासून सुटका कशी मिळवता येईल याविषयी जाणून घेऊया.

रागाला ओळखण्याचे संकेत

जीवन केवळ सुखाचे नाव नाही, यामध्ये सुखासोबत संकटेसुद्धा येत-जात राहतात. अशावेळी कठिण परिस्थितीचा बाऊ करण्यामध्ये शहाणपण नाही. रागाचे काही स्पष्ट संकेत असतात, ज्यावरुन कळतं की, तुम्ही रागात आहात.

धैर्याची कमतरताशिव्या देणेसमोरच्यास कमी लेखनेचिडचिड करणेप्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला दोषी ठरविणेराग आल्यावर काम बंद करणे किंवा मागे हटून जाणेलोकांचे तुमच्यापासून दूर जाणेपत्नी, मुले आणि नातेवाइकांचे तुमच्याशी भीतीने बोलणे

हे तुम्ही रागीट असण्याचे काही संकेत आहेत. आपल्या आजूबाजूचे लोक,  मित्र, नातेवाईक किंवा स्वतःमध्येही या प्रकारची लक्षणं असू शकतात. परंतु याबाबत कोणत्याही प्रकारची लाज बाळगायला नको. या समस्येचे समाधान शोधायला पाहिजे. आता प्रश्न हा आहे की रागावर कसे नियंत्रण करावे त्यासाठी पुढील उपाय आहेत.

10 पर्यंत नंबर मोजा

जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही रागात आहात, तेव्हा सर्वात आधी काहीही प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांत व्हा आणि लांब श्वास घ्या, यामुळे आपल्याला रागावर कंट्रोल करण्यासाठी मदत होईल. आणि मनातल्या मनात 1 ते 10 पर्यंत नंबर मोजा. यामुळे आपल्याला विचार करायला आणि समजायला थोड़ा वेळ मिळेल. हे जरा तुम्हाला फिल्मी वाटेल पण याचा फायदा होतो.

एक ब्रेक घ्या

जर तुम्हाला वाटतं की, तुम्हाला खूप जास्त राग येतो. तर अशावेळी आपण कोणत्याही वादात पडू नये. कारण आपण आपला कंट्रोल हरवण्याची भीती असते. त्यामुळे बरं हेच होईल की, तुम्ही त्या जागेवरून दूर जावं. त्यासाठी एक छोटा ब्रेक घ्या. थंड पाणी प्या आणि थोडे फार चालू लागा. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही आणि दूसरा व्यक्ति शांत होईल, तेव्हा आपली चर्चा पुन्हा सुरु करू शकता.

रागाचे कारण ओळखा

रागासोबत डील करण्यासाठी सर्वात आवश्यक आहे की, रागाचं कारण शोधा. परिस्थिती आणि कारणांना व्यवस्थित समजून घ्यावे, त्यापासून झालेल्या त्रासाला दूर करावे.

चांगली झोप घ्या

कधी कधी कामाच्या लोडमुळे व्यवस्थित झोप येत नाही. ज्यामुळे डोकेदुखी, तणाव आणि चिडचिड होते. यातून विनाकारण दुस-यांवर राग निघतो. अशात काहीही झाले तरी, तुम्ही कितीही बिझी असाल तरी निदान 7 तासांची झोप घ्या.

मोकळे व्हा

अनेकदा दुस-यांचा विचार करुन काही लोक आपल्या मनातील गोष्टी तशात दाबून ठेवतात. त्यांना जे वाटतं ते दुस-यांना सांगत नाहीत. त्यामुळे राग येण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी तुमच्या मनात काय आहे ते बोलून टाका. यामुळे तुमच्या मनात काही दडून राहणार नाही आणि तुमची चिडचिड कमी होईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य