शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वजन कमी करण्यासाठी 'हे' पेय आहे फारच फायदेशीर, पण करा 'अशाप्रकारे' सेवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 17:38 IST

लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात. पण यामुळे देखील वजनात लगेच फरक दिसतोच असं नाही. वजन कमी करण्यासाठी काही खास उपाय करणंही गरजेचं असतं.

बदलती जीवनशैली, बैठं काम, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, अनुवंशिकता आणि काही आजारांमुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत आहे. सध्याच्या काळात अनेक तरुण वाढत्या वजनाच्या (Weight Gain) समस्येमुळे त्रस्त आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार (Heart Disease), डायबेटिस (Diabetes) सारखे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. परंतु, पोट आणि कमरेच्या भागात चरबी वाढू लागली तर ती कमी करणं मोठं अवघड काम असतं. अशावेळी लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात. पण यामुळे देखील वजनात लगेच फरक दिसतोच असं नाही. वजन कमी करण्यासाठी काही खास उपाय करणंही गरजेचं असतं.

नारळाचं अर्थात शहाळ्याचं पाणी (Coconut Water) हा वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे. ``लठ्ठपणा ही आजच्या काळातली सर्वात गंभीर समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी आहारमध्ये काही बदल करणं आवश्यक असतं. रोज पोषक आहारासोबत नारळाचं पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते,`` असं ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस रुग्णालयातील प्रसिद्ध डाएटिशियन डॉ. आयुषी यादव यांनी सांगितलं.

नारळाच्या पाण्यात कॅलरीज (Calories) कमी असतात. तसंच पोटॅशियम आणि नैसर्गिक एंझाइम्स (Natural Enzyme) मुबलक असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा नारळ पाणी पिऊ शकता. परंतु, वजन कमी करण्याच्या उद्देशानं तुम्ही हे नैसर्गिक पेय (Natural Drink) सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी पिणं अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे मॉर्निंग सीकनेस आणि हार्टबर्नसारख्या समस्या दूर होतात. नारळाच्या पाण्यात लॉरिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

नारळ पाणी रोजच्या आहारात समाविष्ट करणं आवश्यक आहे. पोटाच्या आरोग्यासाठी हे पेय फायदेशीर ठरतं. यातील बायोअ‍ॅक्टिव्ह एंजाइम्समुळं पचन आणि मेटाबॉलिझम (Metabolism) उत्तम राहतं. नारळ पाणी प्यायल्यानं लवकर भूक लागत नाही. त्यामुळे जेवण कमी जातं आणि हळूहळू वजन कमी होतं.

``रोज नारळ पाणी प्यायल्यानं तुम्हाला ऊर्जादायी वाटेल. खरंतर दिवसभरात कोणत्याही वेळी हे पाणी तुम्ही पिऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळ पाण्यामुळं त्वचेचं आरोग्य सुधारतं. वजन कमी करण्यासाठी योग्य वेळी हे पाणी प्यायल्यास उत्तम परिणाम दिसून येतात,`` असं डॉ. यादव यांनी सांगितलं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स