शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वजन कमी करण्यासाठी 'हे' पेय आहे फारच फायदेशीर, पण करा 'अशाप्रकारे' सेवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 17:38 IST

लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात. पण यामुळे देखील वजनात लगेच फरक दिसतोच असं नाही. वजन कमी करण्यासाठी काही खास उपाय करणंही गरजेचं असतं.

बदलती जीवनशैली, बैठं काम, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, अनुवंशिकता आणि काही आजारांमुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत आहे. सध्याच्या काळात अनेक तरुण वाढत्या वजनाच्या (Weight Gain) समस्येमुळे त्रस्त आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार (Heart Disease), डायबेटिस (Diabetes) सारखे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. परंतु, पोट आणि कमरेच्या भागात चरबी वाढू लागली तर ती कमी करणं मोठं अवघड काम असतं. अशावेळी लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात. पण यामुळे देखील वजनात लगेच फरक दिसतोच असं नाही. वजन कमी करण्यासाठी काही खास उपाय करणंही गरजेचं असतं.

नारळाचं अर्थात शहाळ्याचं पाणी (Coconut Water) हा वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे. ``लठ्ठपणा ही आजच्या काळातली सर्वात गंभीर समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी आहारमध्ये काही बदल करणं आवश्यक असतं. रोज पोषक आहारासोबत नारळाचं पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते,`` असं ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस रुग्णालयातील प्रसिद्ध डाएटिशियन डॉ. आयुषी यादव यांनी सांगितलं.

नारळाच्या पाण्यात कॅलरीज (Calories) कमी असतात. तसंच पोटॅशियम आणि नैसर्गिक एंझाइम्स (Natural Enzyme) मुबलक असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा नारळ पाणी पिऊ शकता. परंतु, वजन कमी करण्याच्या उद्देशानं तुम्ही हे नैसर्गिक पेय (Natural Drink) सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी पिणं अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे मॉर्निंग सीकनेस आणि हार्टबर्नसारख्या समस्या दूर होतात. नारळाच्या पाण्यात लॉरिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

नारळ पाणी रोजच्या आहारात समाविष्ट करणं आवश्यक आहे. पोटाच्या आरोग्यासाठी हे पेय फायदेशीर ठरतं. यातील बायोअ‍ॅक्टिव्ह एंजाइम्समुळं पचन आणि मेटाबॉलिझम (Metabolism) उत्तम राहतं. नारळ पाणी प्यायल्यानं लवकर भूक लागत नाही. त्यामुळे जेवण कमी जातं आणि हळूहळू वजन कमी होतं.

``रोज नारळ पाणी प्यायल्यानं तुम्हाला ऊर्जादायी वाटेल. खरंतर दिवसभरात कोणत्याही वेळी हे पाणी तुम्ही पिऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळ पाण्यामुळं त्वचेचं आरोग्य सुधारतं. वजन कमी करण्यासाठी योग्य वेळी हे पाणी प्यायल्यास उत्तम परिणाम दिसून येतात,`` असं डॉ. यादव यांनी सांगितलं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स