शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी 'हे' पेय आहे फारच फायदेशीर, पण करा 'अशाप्रकारे' सेवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 17:38 IST

लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात. पण यामुळे देखील वजनात लगेच फरक दिसतोच असं नाही. वजन कमी करण्यासाठी काही खास उपाय करणंही गरजेचं असतं.

बदलती जीवनशैली, बैठं काम, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, अनुवंशिकता आणि काही आजारांमुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत आहे. सध्याच्या काळात अनेक तरुण वाढत्या वजनाच्या (Weight Gain) समस्येमुळे त्रस्त आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार (Heart Disease), डायबेटिस (Diabetes) सारखे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. परंतु, पोट आणि कमरेच्या भागात चरबी वाढू लागली तर ती कमी करणं मोठं अवघड काम असतं. अशावेळी लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात. पण यामुळे देखील वजनात लगेच फरक दिसतोच असं नाही. वजन कमी करण्यासाठी काही खास उपाय करणंही गरजेचं असतं.

नारळाचं अर्थात शहाळ्याचं पाणी (Coconut Water) हा वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे. ``लठ्ठपणा ही आजच्या काळातली सर्वात गंभीर समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी आहारमध्ये काही बदल करणं आवश्यक असतं. रोज पोषक आहारासोबत नारळाचं पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते,`` असं ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस रुग्णालयातील प्रसिद्ध डाएटिशियन डॉ. आयुषी यादव यांनी सांगितलं.

नारळाच्या पाण्यात कॅलरीज (Calories) कमी असतात. तसंच पोटॅशियम आणि नैसर्गिक एंझाइम्स (Natural Enzyme) मुबलक असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा नारळ पाणी पिऊ शकता. परंतु, वजन कमी करण्याच्या उद्देशानं तुम्ही हे नैसर्गिक पेय (Natural Drink) सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी पिणं अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे मॉर्निंग सीकनेस आणि हार्टबर्नसारख्या समस्या दूर होतात. नारळाच्या पाण्यात लॉरिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

नारळ पाणी रोजच्या आहारात समाविष्ट करणं आवश्यक आहे. पोटाच्या आरोग्यासाठी हे पेय फायदेशीर ठरतं. यातील बायोअ‍ॅक्टिव्ह एंजाइम्समुळं पचन आणि मेटाबॉलिझम (Metabolism) उत्तम राहतं. नारळ पाणी प्यायल्यानं लवकर भूक लागत नाही. त्यामुळे जेवण कमी जातं आणि हळूहळू वजन कमी होतं.

``रोज नारळ पाणी प्यायल्यानं तुम्हाला ऊर्जादायी वाटेल. खरंतर दिवसभरात कोणत्याही वेळी हे पाणी तुम्ही पिऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळ पाण्यामुळं त्वचेचं आरोग्य सुधारतं. वजन कमी करण्यासाठी योग्य वेळी हे पाणी प्यायल्यास उत्तम परिणाम दिसून येतात,`` असं डॉ. यादव यांनी सांगितलं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स