शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवाताचा धोका अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 17:49 IST

पूर्वीच्या तुलनेत आता संधिवात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.  नियमित व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, मोबाईल व संगणकावर तासनतास चिकटून राहणे यासह बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवात होण्याचा धोका अधिक आहे

वाशिम: पूर्वीच्या तुलनेत आता संधिवात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.  नियमित व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, मोबाईल व संगणकावर तासनतास चिकटून राहणे यासह बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवात होण्याचा धोका अधिक आहे, असे स्पष्ट मत वाशिम येथे अस्थिरोग तथा संधिवात रोग तज्ज्ञ डॉ. सुनील राठोड यांनी व्यक्त केले. संधिवात निवारण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी केलेल्या खास बातचीतदरम्यान ते बोलत होते.प्रश्न : संधिवात म्हणजे काय?डॉ. राठोड - संधिवाताला सांधेदुखी असेही म्हटले जाते. आपल्या सांध्यामध्ये ‘कुर्चा’ नावाचा घटक असतो. या ‘कुर्चा’मुळे सांध्यांची हालचाल योग्यरित्या होत असते. जेव्हा याची झीज व्हायला सुरूवात होते, सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासतात, त्यामुळे सांध्यात वेदना आणि सूज येऊ लागते. या स्थितीस संधिवात असे म्हटले जाते.प्रश्न : संधिवाताची लक्षणे कोणती?डॉ. राठोड - सांधे दुखणे, सुजणे, सांधे जाम होणे, कडकपणा येणे, सकाळी झोपेतून उठल्यानंतर सांधे अवघडल्यासारखे होणे व चालता न येणे, अशक्तपणा जाणवणे ही संधिवाताची सुरूवातीचे लक्षणे आहेत. तीव्र स्वरुपाच्या संधिवातात सांधे वाकडे होऊ शकतात. सांध्याची वाकण्याची क्षमता कमी होते आणि रुग्णाला उठणे, बसणेही अशक्य होऊन जाते.प्रश्न : संधिवात प्रामुख्याने कोणत्या वयोगटात होण्याचा धोका अधिक संभवतो?डॉ. राठोड - संधिवात हा लहान मुलांपासून ते वयोवृद्धांना होऊ शकतो. वाढत्या वयानुसार याचे प्रमाण वाढते. पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये संधिवाताचे प्रमाण जास्त आढळते. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही संधिवाताचे प्रमाण वाढत चालले आहे. साधारणत: चाळीशीनंतर संधीवात होण्याचा धोका अधिक संभवतो.प्रश्न : संधिवाताची कारणे काय असू शकतात?डॉ. राठोड - बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, स्थूलपणा येणे, नियमित व्यायाम न करणे, समतोल आहाराची कमतरता, एकाच सांध्यावर नियमितपणे भार पडत राहणे, मोबाईल व संगणकावर तासनतास चिटकून राहणे, हाडांचे फ्रॅक्चर झाल्याने किंवा सांध्याच्या ठिकाणी आघात झाल्याने, अनुवंशिकतेमुळेही संधिवात होण्याचा धोका अधिक असतो. सांध्यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे सांधे खराब होऊ शकतात.प्रश्न : संधिवात होऊ नये म्हणून नागरिकांनी कोणती दक्षता घ्यायला हवी?डॉ. राठोड - नियमित व्यायाम करणे, आहाराचा योग्य समतोल राखणे, मोबाईल किंवा संगणकावर जास्त वेळ न राहणे, हाडांना इजा होणार नाही याची दक्षता घेणे, गुडघ्यांचा संधीवात असलेल्या रुग्णांनी खाली मांडी घालून न बसणे, पायरीवरून चढउतार कमी करणे आदी दक्षता घेता येतील. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स