शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

2050पर्यंत जवळपास 60 कोटी भारतीयांना होऊ शकतात 'हे' आजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 15:24 IST

भारतातील वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे 2050 पर्यंत कोट्यवधी लोकांच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता होण्याची शक्यता आहे.

भारतातील वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे 2050 पर्यंत कोट्यवधी लोकांच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता होण्याची शक्यता आहे. कारण एका नवीन संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, वातावरणातील वाढत्या प्रदुषणामुळे आणि कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे तांदूळ आणि गव्हासारख्या प्रमुख पिकांमधील पौष्टीक तत्व कमी होत चालली आहेत. 

अमेरिकेतील हार्वड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या आभ्यासकांनी केलेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं की, मानवनिर्मित वस्तूंमुळे कार्बन डायऑक्साइडच्या स्तरामध्ये वाढ होत असून जगभरामध्ये 17.5 कोटी लोकांमध्ये झिंकची कमतरता आढळून येत आहे. तर 12.2 कोटी लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आढळते. 

'नेचर क्लाइमेट चेंज' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, एक अब्जपेक्षा अधिक महिला आणि मुलांच्या खाण्यामध्ये आयर्न तत्वांची उपलब्धता फार कमी होते. यामुळे त्यांच्यामध्ये एनीमिया आणि इतर आजार होण्याचा धोका संभवतो.

संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची  लेव्हल वाढल्यामुळे भारताला इतर देशांच्या तुलनेत अधिक नुकसान भोगावे लागणार आहे. जवळपास 5 कोटी लोकांमध्ये झिंकचे प्रमाण कमी झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

संशोधकांनी सांगितल्यानुसार, भारतात 3.8 कोटी लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता होऊ शकते आणि आयर्नच्या कमतरतेमुळे 50.2 कोटी महिला आणि मुलांमध्ये यांसंबंधातील आजार बळावण्याची शक्यता आहे.

त्यांनी सांगितले की, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशिया, आफ्रिका आणि पश्चिम आशिया यांसारख्या देशांवरही याचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य