शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
3
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
4
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
5
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
6
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
7
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
8
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
9
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
10
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
11
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
12
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
13
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
14
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
15
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
16
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
17
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
18
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
19
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
20
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

2050पर्यंत जवळपास 60 कोटी भारतीयांना होऊ शकतात 'हे' आजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 15:24 IST

भारतातील वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे 2050 पर्यंत कोट्यवधी लोकांच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता होण्याची शक्यता आहे.

भारतातील वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे 2050 पर्यंत कोट्यवधी लोकांच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता होण्याची शक्यता आहे. कारण एका नवीन संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, वातावरणातील वाढत्या प्रदुषणामुळे आणि कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे तांदूळ आणि गव्हासारख्या प्रमुख पिकांमधील पौष्टीक तत्व कमी होत चालली आहेत. 

अमेरिकेतील हार्वड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या आभ्यासकांनी केलेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं की, मानवनिर्मित वस्तूंमुळे कार्बन डायऑक्साइडच्या स्तरामध्ये वाढ होत असून जगभरामध्ये 17.5 कोटी लोकांमध्ये झिंकची कमतरता आढळून येत आहे. तर 12.2 कोटी लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आढळते. 

'नेचर क्लाइमेट चेंज' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, एक अब्जपेक्षा अधिक महिला आणि मुलांच्या खाण्यामध्ये आयर्न तत्वांची उपलब्धता फार कमी होते. यामुळे त्यांच्यामध्ये एनीमिया आणि इतर आजार होण्याचा धोका संभवतो.

संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची  लेव्हल वाढल्यामुळे भारताला इतर देशांच्या तुलनेत अधिक नुकसान भोगावे लागणार आहे. जवळपास 5 कोटी लोकांमध्ये झिंकचे प्रमाण कमी झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

संशोधकांनी सांगितल्यानुसार, भारतात 3.8 कोटी लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता होऊ शकते आणि आयर्नच्या कमतरतेमुळे 50.2 कोटी महिला आणि मुलांमध्ये यांसंबंधातील आजार बळावण्याची शक्यता आहे.

त्यांनी सांगितले की, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशिया, आफ्रिका आणि पश्चिम आशिया यांसारख्या देशांवरही याचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य