शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोरोनानंतर लहान मुलांमध्ये झाली 'या' गोष्टीची कमतरता, वेळीच करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:55 IST

कोरोना महामारीनंतर मागील दोन-अडीच वर्षांत लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वचजणांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पैसे कमवणं जितकं जरूरी आहे तितकंच तुमचं आरोग्य चांगलं राखणं हेही आवश्यक आहे. भारतात तर आरोग्याला संपत्तीच म्हटलं जातं. योग्य मार्गाने पैसे कमवणाऱ्या व्यक्तीला समाधान लाभतं तसं आरोग्य संपत्ती कमवण्यासाठीही योग्य प्रयत्न करावे लागतात. कोरोना महामारीनंतर मागील दोन-अडीच वर्षांत लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वचजणांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सतत आजारी पडत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे; पण आहार (Diet) आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power) वाढवण्यासाठी विविध उपाय करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषत: 2 ते 3 वर्षे वयोगटातील मुलं वारंवार आजारी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यांचं वजनही घटत असल्यानं पालकांना याची चिंता सतावत आहे. पण घरात छोटे-छोटे उपाय करून मुलांना निरोगी आयुष्य आपण देऊ शकतो. ‘न्यूज नेशन हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

जन्मानंतर जी मुलं पहिल्यांदा घराबाहेर पडली आहेत ती इतर मुलांच्या तुलनेत लवकर आजारी पडत असल्याची पालकांची तक्रार आहे. काही मुलांचं वजनही घटत आहे. या सर्व समस्येचं निराकारण करण्यासाठी महत्त्वाचे उपाय करता येतील. याचा फायदाही लवकर दिसून येईल. मुलांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देणं आवश्यक आहे. मुलांचं वजन कमी होत असेल तर मुलांना वजन वाढवणारा आहार द्यायला हवा. यात प्रामुख्याने त्या-त्या हंगामातील फळं (Seasonal Fruits), भाजीपाला, अंडी (Eggs), दूध, पनीर असा आहार देऊन मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. दैनंदिन जीवनात या आहाराची सवय लावल्यास सतत होणाऱ्या आजारांवर सहज मात करता येणं शक्य आहे.

जंक फूड टाळणं कधीही चांगलं-आजघडीला मुलांना जंक फूड (Junk Food) खाण्याची अधिक सवय लागलेली आहे. सजग पालक म्हणून आपण त्यांच्या आहारातील जंक फूड बंद करणं आवश्यक आहे. त्याऐवजी घरी केलेले जाणारे पोळी, विविध प्रकारच्या डाळी, अंडी, दही आदींचा त्यांच्या आहारात समावेश करायला हवा. मुलं टाळाटाळ करत असतील तरी दिवसांतून दोन वेळा त्यांना दूध द्यायला हवं. यातून त्यांचं आरोग्य चांगलं राहतं.

वारंवार सर्दी होत असल्यास इंजेक्शन द्यावं-वातावरण बदललं की बहुतांश जणांना सर्दी-पडसं होतं. मुलांमध्येही अशी समस्या पाहायला मिळते. त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे वैद्यकीय सल्ल्याने मुलांना ‘फ्लू’चं इंजेक्शन द्यायला हवं. यामुळे मुलं वारंवार आजारी पडणार नाहीत.

मुलांची चिडचिड वाढल्यास त्यांना जंतांचे औषध देणं उत्तम-अनेकदा मुलांच्या पोटात जंत वाढल्याने मुले अधिक चिडचिड करतात. शिवाय आजारीही पडत असतात. त्यांचं वजनही घटत असतं. अशा वेळी वैद्यकीय सल्ल्याने दर सहा महिन्यांनी त्यांना जंतांचं औषध द्यायला हवं. दरम्यान, मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी कुटुंबातील आहाराच्या सवयीही तितक्यात महत्त्वाच्या ठरतात. पालकांनी जंक फूडऐवजी घरात तयार केलेला साधा, सात्त्विक आहार घेतल्यास मुलांनाही त्याची सवय होते व आजारी पडण्याचं प्रमाणही आपोआप कमी होतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स