शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर लहान मुलांमध्ये झाली 'या' गोष्टीची कमतरता, वेळीच करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:55 IST

कोरोना महामारीनंतर मागील दोन-अडीच वर्षांत लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वचजणांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पैसे कमवणं जितकं जरूरी आहे तितकंच तुमचं आरोग्य चांगलं राखणं हेही आवश्यक आहे. भारतात तर आरोग्याला संपत्तीच म्हटलं जातं. योग्य मार्गाने पैसे कमवणाऱ्या व्यक्तीला समाधान लाभतं तसं आरोग्य संपत्ती कमवण्यासाठीही योग्य प्रयत्न करावे लागतात. कोरोना महामारीनंतर मागील दोन-अडीच वर्षांत लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वचजणांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सतत आजारी पडत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे; पण आहार (Diet) आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power) वाढवण्यासाठी विविध उपाय करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषत: 2 ते 3 वर्षे वयोगटातील मुलं वारंवार आजारी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यांचं वजनही घटत असल्यानं पालकांना याची चिंता सतावत आहे. पण घरात छोटे-छोटे उपाय करून मुलांना निरोगी आयुष्य आपण देऊ शकतो. ‘न्यूज नेशन हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

जन्मानंतर जी मुलं पहिल्यांदा घराबाहेर पडली आहेत ती इतर मुलांच्या तुलनेत लवकर आजारी पडत असल्याची पालकांची तक्रार आहे. काही मुलांचं वजनही घटत आहे. या सर्व समस्येचं निराकारण करण्यासाठी महत्त्वाचे उपाय करता येतील. याचा फायदाही लवकर दिसून येईल. मुलांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देणं आवश्यक आहे. मुलांचं वजन कमी होत असेल तर मुलांना वजन वाढवणारा आहार द्यायला हवा. यात प्रामुख्याने त्या-त्या हंगामातील फळं (Seasonal Fruits), भाजीपाला, अंडी (Eggs), दूध, पनीर असा आहार देऊन मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. दैनंदिन जीवनात या आहाराची सवय लावल्यास सतत होणाऱ्या आजारांवर सहज मात करता येणं शक्य आहे.

जंक फूड टाळणं कधीही चांगलं-आजघडीला मुलांना जंक फूड (Junk Food) खाण्याची अधिक सवय लागलेली आहे. सजग पालक म्हणून आपण त्यांच्या आहारातील जंक फूड बंद करणं आवश्यक आहे. त्याऐवजी घरी केलेले जाणारे पोळी, विविध प्रकारच्या डाळी, अंडी, दही आदींचा त्यांच्या आहारात समावेश करायला हवा. मुलं टाळाटाळ करत असतील तरी दिवसांतून दोन वेळा त्यांना दूध द्यायला हवं. यातून त्यांचं आरोग्य चांगलं राहतं.

वारंवार सर्दी होत असल्यास इंजेक्शन द्यावं-वातावरण बदललं की बहुतांश जणांना सर्दी-पडसं होतं. मुलांमध्येही अशी समस्या पाहायला मिळते. त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे वैद्यकीय सल्ल्याने मुलांना ‘फ्लू’चं इंजेक्शन द्यायला हवं. यामुळे मुलं वारंवार आजारी पडणार नाहीत.

मुलांची चिडचिड वाढल्यास त्यांना जंतांचे औषध देणं उत्तम-अनेकदा मुलांच्या पोटात जंत वाढल्याने मुले अधिक चिडचिड करतात. शिवाय आजारीही पडत असतात. त्यांचं वजनही घटत असतं. अशा वेळी वैद्यकीय सल्ल्याने दर सहा महिन्यांनी त्यांना जंतांचं औषध द्यायला हवं. दरम्यान, मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी कुटुंबातील आहाराच्या सवयीही तितक्यात महत्त्वाच्या ठरतात. पालकांनी जंक फूडऐवजी घरात तयार केलेला साधा, सात्त्विक आहार घेतल्यास मुलांनाही त्याची सवय होते व आजारी पडण्याचं प्रमाणही आपोआप कमी होतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स