शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पावसाळ्यात उकडलेलं पाणी पिण्याचे फायदे, जाणून घ्या काय म्हणाले एक्सपर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 10:31 IST

Drinking Boiled Water : पाऊस आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येत असतो. अशात दुषित पाण्यापासून बचाव करण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. 

Drinking Boiled Water :  असह्य उष्णतेनंतर पावसाच्या खूप दिलासा देणाऱ्या असतात. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस आल्यावर सगळ्यांनाच चांगलं वाटतं, पण हेही खरं आहे की, पाऊस आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येत असतो. अशात दुषित पाण्यापासून बचाव करण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. 

पावसाच्या दिवसांमध्ये पाणी उकडून पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना गंभीर आजारांचा धोका होतो. पण याचं कारण अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊ...

पाण्यात घातक तत्व

नळांमध्ये येणारं पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. पण हे पाणी लोकांच्या घरात पोहोचेपर्यंत त्यात अनेक घातक विषाणू मिसळतात. नळातील पाण्यामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कणही आढळतात. जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. 

काय सांगतो रिसर्च

चीनच्या जिनान यूनिवर्सिटी अभ्यासकांना एका रिसर्चमध्ये आढळलं की, नळातून येणाऱ्या पाण्यामध्ये मायक्रोप्लास्टिक जास्त असतं. नळाच्या पाण्यात एन-मिथाइल-2-पायरोलिडोन नावाचं तत्व असतं. हे मायक्रोप्लास्टिकचे कण पोटात पोहोचून गंभीर आजारांचा धोका वाढवतात. जर पाणी शुद्ध केलं गेलं किंवा काही मिनिटांसाठी उकडून घेतलं तर याने मायक्रोप्लास्टिकचा प्रभाव ८०% कमी केला जाऊ शकतो.

पाणी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

पाणी शुद्ध करण्यासाठी सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे ते उकडून घ्यावं. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार पाणी ५ मिनिटांसाठी जरी उकडलं तरी शुद्ध होऊ शकतं. पावसाळ्यात वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे या दिवसात पाणी उकडूनच प्यावे. 

पाणी उकडून पिण्याचे फायदे

पाणी उकडून प्यायल्याने डायजेस्टिव सिस्टीम चांगलं काम करतं. तसेच कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. पावसात भिजल्यावर जर तुम्हा सर्दी-खोकला, घशात खवखव होत असेल तर कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य