शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णाच्या शरीरातून काढली ७.४ किलोची किडनी, भारतातील पहिली सर्वात जास्त वजनी किडनी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 11:39 IST

दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या एका टीमने एका रूग्णाच्या शरीरातून देशातील सर्वात वजनी किडनी काढली.

(Image Credit : health.harvard.edu)

दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या एका टीमने एका रूग्णाच्या शरीरातून देशातील सर्वात वजनी किडनी काढली. या किडनीचं वजन तब्बल ७.४ किलो इतकं आहे. ही किडनी जगातली तिसरी सर्वात मोठी किडनी आहे. तब्बल दोन तासांच्या सर्जरीनंतर डॉ. सचिन शर्मा, डॉ. सचिन कथूरिया आणि डॉ. जुहील नानावटी यांनी ही किडनी काढली.

काय झालं होतं?

डॉ. सचिन कथूरिया यांनी सांगितले की, ५६ वर्षीय रूग्ण दिल्लीचा राहणारा आहे. तो ऑटोसोमल डोमिनन्ट पॉलिसिस्टीक किडनी डिजीज नावाच्या जेनेटिक डिसऑर्डरने पीडित होता. पॉलिसिस्टीक किडनी हा आजार एक आनुवांशिक आजार आहे. यात दोन्ही किडनींमध्ये द्रव्याने भरलेले सिस्ट विकसित होतात. ज्यात आतून सूज येते. या रूग्णावर २००६ पासून आमच्याकडे उपचार सुरू होते. पण यात असलेल्या धोक्यामुळे आधी सर्जरीसाठी ते तयार नव्हते.

याआधीही झाल्या अशा सर्जरी

आतापर्यंत जगभरात अशाप्रकारच्या दोन सर्जरी झाल्या आहेत. पहिली सर्जरी अमेरिकेत झाली. त्यावेळी एका रूग्णाच्या शरीरातून ९ किलोची किडनी काढण्यात आली होती. त्यानंतर नेदरलॅंडमध्ये एका रूग्णाच्या शरीरातून ८.७ किलो वजनाची किडनी काढली होती. 

किडनी खराब होण्याची काही कारणे

1. पेनकिलरचा जास्त वापर करणं 

(Image Credit : hopkinsmedicine.org)

सतत घेण्यात येणारी औषधं म्हणजेच, 'नॉनस्टेरॉइड अॅन्टी-इफ्लेमेटरी ड्रग्स' तुमचं दुखणं कमी करू शकतात. पण याचा किडनीवर परिणाम होत असतो. त्यामुळे औषधांचं सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

2. जास्त वेळ लघवी रोखून धरणं 

तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल कामाच्या ताणामुळे किंवा अन्य कारणांमुळे बराच वेळ लघवी रोखून ठेवतात. जर तुम्हीही असचं काही करत असाल तर वेळीच सावध व्हा. लोकमत न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एक्सपर्ट्सच्या मते, लघवी रोखून धरल्याने किडनीवर परिणाम होत असतो. असं केल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात आणि यामुळे यूटीआयसारखे आजार होण्याचा धोका संभवतो. 

3. प्रोसेस्ड फूड 

प्रोसेस्ड फूड सोडियम आणि फॉस्फरसचे महत्त्वाचे स्त्रोत आहेत. अनेक लोकं ज्यांना आतड्याचे आजार असतात. त्यांनी आहारातील फॉस्फरस कमी करणं आवश्यक असतं. काही संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, फॉस्फरसयुक्त प्रोसेस्ड पदार्थांचं अधिक सेवन आतडी आणि हाडांसाठी अत्यंत घातक ठरतं. 

4. जास्त मिठाचं सेवन 

मीठामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि आतड्यांना नुकसान पोहोचचं. मीठाऐवजी आयुर्वेदिक पदार्थ आणि मसाल्यांचा वापर करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. वेळेसोबतच तुम्हाला अतिरिक्त मीठ खाणं टाळणं गरेजंचं आहे. 

5. पाणी कमी पिणं 

शरीर हायड्रेट असेल तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणं सहज शक्य होतं. तसेच किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणं उत्तम उपाय आहे. तुम्हाला दररोज 1ते 2 लीटर पाणी पिणं गरजेचं असतं. 

6. झोप पूर्ण न होणं 

(Image Credit : ptsdupdate.com)

रात्री शांतपणे झोपणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 24 तासांची झोप घेणं आवश्यक असतं. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स