शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हाताची नखं एकमेकांवर घासल्याने होतात अनेक फायदे, 'या' आजारापासून मिळते सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 17:55 IST

केसांच्या समस्या कमी होण्यासाठी हातांच्या बोटांची नखं एकमेकांवर घासण्याचा हा उपाय तुम्ही अगदी सहजपणे करू शकता.

धावपळीची जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव आणि ताण-तणावांमुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे फिटनेसकडे लोकांचा कल वाढला आहे. फिटनेससाठी लोक डाएट, व्यायाम, योगासनं, मेडिटेशन आदी पर्याय निवडतात. सध्याच्या काळात काही कारणांमुळे लोकांमध्ये केसांविषयीच्या समस्या (Hair Problems) देखील वाढत आहेत.

अकाली टक्कल पडणं, केस पांढरे होणं, केस पातळ होणं अशा समस्यांचा यात समावेश आहे. केसांच्या समस्या रोखण्यासाठी बरेच लोक विविध प्रकारची तेलं, सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. काही लोक अगदी वैद्यकीय उपचार घेतात. पण त्यातून अपेक्षित फरक दिसतोच असं नाही. केसांच्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी अ‍ॅक्युप्रेशर थेरपी (Acupressure Therapy Hair) तसेच योगा थेरपीमध्ये नखांविषयीचा एक सोपा उपाय सांगितला गेला आहे. केसांच्या समस्या कमी होण्यासाठी हातांच्या बोटांची नखं एकमेकांवर घासण्याचा हा उपाय तुम्ही अगदी सहजपणे करू शकता.

जगभरातील योगगुरू केसांच्या समस्या कमी होण्यासाठी दोन्ही हातांची नखं एकमेकांवर घासण्याचा सल्ला देतात. याला बालायाम अर्थात केसांसाठी व्यायाम असंही म्हणतात. नखं एकमेकांवर घासण्याची पद्धत ही प्राचीन काळापासून चालत आली आहे. अ‍ॅक्युप्रेशर थेरपीमध्येही या पद्धतीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. चुकीचा आहार, दूषित पाणी आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे कमी वयातच केस गळणं (Hair Fall), केस पातळ होणं, टक्कल पडणं (Baldness) आणि अकाली केसं पांढरे होणं यांसारख्या समस्या निर्माण होताना दिसतात.

मात्र दोन्ही हातांची नखं एकमेकांवर घासल्यास या समस्या दूर होऊ शकतात. मात्र, गर्भवती महिलांना बालायाम करणं टाळावं कारण असं केल्यास गर्भाशयात आकुंचन निर्माण होऊ शकतं. तसेच हाय ब्लडप्रेशरचा (High Blood Pressure) त्रास असणाऱ्यांनी नखं एकमेकांवर घासणं टाळावं, असं तज्ज्ञ सांगतात.

बालायाम करताना तुम्ही दोन्ही हात छातीजवळ न्या आणि बोटं आतल्या बाजूस आणा. त्यानंतर नखं एकमेकांवर घासा. शक्य आहे तितका वेळ ही क्रिया करावी. अपेक्षित फरक पडावा यासाठी अंगठयाची नखं एकमेकांवर घासू नयेत. जर तुम्ही ही क्रिया रोज किमान 5 ते 10 मिनिटं केली तर त्यामुळे नक्कीच फायदा होईल.

बालायाम केल्यानं टक्कल पडणं, केस गळणं, केस पातळ आणि पांढरे होण्याच्या समस्या दूर होतात. नखं एकमेकांवर वारंवार घासल्यानं त्वचा विकार दूर होऊ शकतात. बालायाम केल्यानं शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. त्यामुळे चेहरा तजेलदार होतो आणि शरीरात ताकद येते. जरी तुमचे केस जास्त प्रमाणात गळाले असतील, तरी बालायामामुळे त्यांची पुन्हा वाढ होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स