शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अरे व्वा! सकाळी उठल्यानंतर नेमकं किती पाणी प्यावं, गरम की थंड?; फायदे ऐकून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:42 IST

सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचे शरीराला कोणते फायदे होतात आणि किती प्रमाणात पाणी प्यावे जाणून घेऊया...

सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणं ही सवय अनेक जण अंगीकारतात. पण असे करण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचे शरीराला कोणते फायदे होतात आणि किती प्रमाणात पाणी प्यावे.

सकाळी पाणी का प्यावं?

पचनक्रिया सुधारते 

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

शरीराला ऊर्जा मिळते 

सकाळी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि दिवसभर तुम्हाला ऊर्जा मिळते.

त्वचेसाठी फायदेशीर

पाणी त्वचेला हायड्रेट ठेवते आणि ती चमकदार बनवते.

वजन कमी करण्यात उपयुक्त 

पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.

किडनी निरोगी ठेवते 

 पाणी किडनी डिटॉक्स करण्यास मदत करते.

किती पाणी प्यावं?

सकाळी उठल्यानंतर किती पाणी प्यावे हे प्रत्येक व्यक्तीनुसार आणि ऋतूनुसार बदलतं. साधारणपणे, सकाळी उठल्यानंतर तुम्ही किमान २-३ ग्लास पाणी पिऊ शकता. जर तुम्ही सुरुवातीला इतके पाणी पिऊ शकत नसाल तर एका ग्लासने सुरुवात करा आणि हळूहळू वाढवा.

कोमट की साधं पाणी?

तुम्ही सकाळी कोमट किंवा साधं पाणी पिऊ शकता. कोमट पाणी पचनक्रिया नॉर्मल करते आणि मेटाबॉलिज्म वाढवते. तसेच साध्या पाण्याने शरीराला ताजेतवाने वाटते.

सकाळी पाणी पिण्याचे इतर फायदे

स्नायू दुखणे कमी होते 

व्यायामानंतर पाणी प्यायल्याने स्नायू दुखणे कमी होते.

डोकेदुखीपासून मिळतो आराम

पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.

मूड चांगला होतो 

डिहायड्रेशनमुळे मूड खराब होऊ शकतो. पाणी प्यायल्याने मूड चांगला होतो. 

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स