शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अरे व्वा! सकाळी उठल्यानंतर नेमकं किती पाणी प्यावं, गरम की थंड?; फायदे ऐकून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:42 IST

सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचे शरीराला कोणते फायदे होतात आणि किती प्रमाणात पाणी प्यावे जाणून घेऊया...

सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणं ही सवय अनेक जण अंगीकारतात. पण असे करण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचे शरीराला कोणते फायदे होतात आणि किती प्रमाणात पाणी प्यावे.

सकाळी पाणी का प्यावं?

पचनक्रिया सुधारते 

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

शरीराला ऊर्जा मिळते 

सकाळी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि दिवसभर तुम्हाला ऊर्जा मिळते.

त्वचेसाठी फायदेशीर

पाणी त्वचेला हायड्रेट ठेवते आणि ती चमकदार बनवते.

वजन कमी करण्यात उपयुक्त 

पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.

किडनी निरोगी ठेवते 

 पाणी किडनी डिटॉक्स करण्यास मदत करते.

किती पाणी प्यावं?

सकाळी उठल्यानंतर किती पाणी प्यावे हे प्रत्येक व्यक्तीनुसार आणि ऋतूनुसार बदलतं. साधारणपणे, सकाळी उठल्यानंतर तुम्ही किमान २-३ ग्लास पाणी पिऊ शकता. जर तुम्ही सुरुवातीला इतके पाणी पिऊ शकत नसाल तर एका ग्लासने सुरुवात करा आणि हळूहळू वाढवा.

कोमट की साधं पाणी?

तुम्ही सकाळी कोमट किंवा साधं पाणी पिऊ शकता. कोमट पाणी पचनक्रिया नॉर्मल करते आणि मेटाबॉलिज्म वाढवते. तसेच साध्या पाण्याने शरीराला ताजेतवाने वाटते.

सकाळी पाणी पिण्याचे इतर फायदे

स्नायू दुखणे कमी होते 

व्यायामानंतर पाणी प्यायल्याने स्नायू दुखणे कमी होते.

डोकेदुखीपासून मिळतो आराम

पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.

मूड चांगला होतो 

डिहायड्रेशनमुळे मूड खराब होऊ शकतो. पाणी प्यायल्याने मूड चांगला होतो. 

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स