शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

'ही' आहे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याची योेग्य पद्धत, या पद्धतीने न प्यायल्यास परीणाम होतील गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 19:20 IST

आपण ऐकत आलो आहोत की, तांब्याच्या भांड्यात (Copper Vessels)  पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायची योग्य पद्धतही आहे. ती जाणून घेतल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायचे तुम्हाला जास्त फायदे होतील.

आपण ऐकत आलो आहोत की, तांब्याच्या भांड्यात (Copper Vessels)  पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायची योग्य पद्धतही आहे. ती जाणून घेतल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायचे तुम्हाला जास्त फायदे होतील.

तांबा हा एकमेव धातू आहे की, ज्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. तांब्याचा वापर जखमेवर (कापणे), डोकेदुखी आणि अगदी कॉलराच्या उपचारांमध्येही खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. आयुर्वेदातही या धातूचा वापर अत्यंत उपयुक्त मानला जातो. जर घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांसाठी, विशेषत: पाणी पिण्याची भांडी, ग्लासेस आणि बाटल्यांसाठी तांब्याचा वापर केला गेला तर ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.

फायदे काय आहेत- तांब्यामध्ये (कॉपर) अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे कर्करोगास कारणीभूत मुक्त रॅडिकल्स आणि त्यांचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात.

-  तांब्यामध्ये मेलेनिनचा घटक असतो जो आपल्या त्वचेचे अतिनीलपासून संरक्षण करतो आणि त्याचे नुकसान टाळतो.

- अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, तांबे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते.

-  तांब्याच्या भांड्यातून पाणी प्याल्याने थायरॉईड ग्रंथीचे काम सुरळीत चालण्यास मदत करते.

-  हे हिमोग्लोबिन तयार करण्यास आणि शरीरातील लोह शोषण्यास मदत करते. ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो.

- तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सांधेदुखीपासून मुक्त होण्यास मदत करतात.

- शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तांब्यातील पाणी प्रभावी आहे.

- हे रक्तपेशींमध्ये असलेल्या प्लेक्स काढून रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

- तांबे हे एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे.

- तांब्याचे पाणी प्यायल्याने कॉलरा किंवा दूषित पाण्यामुळे होणारे अनेक प्रकारचे संक्रमण टाळता येते. ते शरीराला डिटॉक्स करते.

तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी किती काळ ठेवावे?जर तुम्ही रात्री तांब्याच्या भांड्यात, बाटलीत पाणी ठेवले तर सकाळी हे पाणी प्या. ६ ते ८ तास तांब्याच्या भांड्यात राहिलेले पाणी पिण्यासाठी फायदेशीर असते. उपाशी पोटी हे पाणी पिणे सर्वात उपयोगी आहे.

याचा आरोग्यासाठी फायदा असला तरी सतत तांब्याच्याच भांड्यातील पाणी पिणं योग्य नाही. काही दिवस दुसऱ्या धातूच्या भांड्यातील पाणी प्यायला हवे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक महिना नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी पित असाल, तर पुढचे दोन महिने सामान्य पाणी प्या.

थंड नको, नॉर्मल तापमानाचे पाणी वापरागरम किंवा खूप थंड पाणी कधीही तांब्याच्या भांड्यातून किंवा बाटलीत घेऊ नका. नेहमी नॉर्मल टेंम्परेचरचे पाणी प्यावे. ऑक्सिजन आणि द्रव पदार्थांच्या संपर्कात आल्यावर तांब्याची भांडी काळी होतात. अशा परिस्थितीत, ते स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लिंबू आणि मीठाने घासणे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स