शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

दररोज गरम पाण्याने आंघोळ करणं Diabetes रुग्णांना पडू शकतं महागात, अशी काळजी घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 17:53 IST

मधुमेहाचे बहुतेक रुग्ण खाण्यापिण्याची काळजी घेतात, पण या सगळ्यामध्ये ते आपल्या त्वचेची काळजी घेणे विसरतात.

मधुमेह हा असा आजार आहे की, एकदा तो झाल्यास पीडित व्यक्तीला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. यासोबतच आपली जीवनशैली आणि आहार यावर विशेष लक्ष द्यावे लागते. मधुमेहासोबत इतरही अनेक समस्या येतात. त्यामुळे रुग्णाची दृष्टी कमी होण्याचा धोका, किडनीशी संबंधित समस्या, हृदयविकाराचा झटका आणि इतर अनेक गंभीर आजार वाढू शकतात. मधुमेहावर आजपर्यंत कायमस्वरूपी इलाज नाही. यामुळेच हा आजार होणे ही चिंतेची बाब आहे. मात्र तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करून तुम्ही नक्कीच मधुमेहावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकता.

मधुमेहाचे बहुतेक रुग्ण खाण्यापिण्याची काळजी घेतात, पण या सगळ्यामध्ये ते आपल्या त्वचेची काळजी घेणे विसरतात. थंडीत प्रत्येकाची त्वचा कोरडी पडते. तसेच प्रचंड थंडी असल्याने प्रत्येक हिवाळ्यात सर्वजण अधिक गरम पाण्याने आंघाळ करतात. त्यामुळे आपल्या त्वचेची आर्द्रता नष्ट होते. अनेकदा लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मात्र मधुमेह असणाऱ्या लोकांना याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

अनेक वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते. त्वचेशी संबंधित समस्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये नैराश्य आणि तणाव वाढवू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांनी गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेवर सूज येऊ शकते. गरम पाण्यामुळे त्वचेला निस्तेजपणा, खाज सुटणे आणि लालसरपणा येण्याची शक्यता आहे.

दररोज गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील ओलावा कमी होतो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक तेल, प्रथिने आवश्यक असतात. परंतु गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्यांचे संतुलन बिघडू लागते. म्हणूनच तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास या समस्या टाळता येतील. मात्र अधिक तपशिलांसाठी तुम्ही नेहमी एखाद्या तज्ञाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या...

टॅग्स :diabetesमधुमेहSkin Care Tipsत्वचेची काळजीHealthआरोग्यWaterपाणी