शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

दररोज गरम पाण्याने आंघोळ करणं Diabetes रुग्णांना पडू शकतं महागात, अशी काळजी घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 17:53 IST

मधुमेहाचे बहुतेक रुग्ण खाण्यापिण्याची काळजी घेतात, पण या सगळ्यामध्ये ते आपल्या त्वचेची काळजी घेणे विसरतात.

मधुमेह हा असा आजार आहे की, एकदा तो झाल्यास पीडित व्यक्तीला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. यासोबतच आपली जीवनशैली आणि आहार यावर विशेष लक्ष द्यावे लागते. मधुमेहासोबत इतरही अनेक समस्या येतात. त्यामुळे रुग्णाची दृष्टी कमी होण्याचा धोका, किडनीशी संबंधित समस्या, हृदयविकाराचा झटका आणि इतर अनेक गंभीर आजार वाढू शकतात. मधुमेहावर आजपर्यंत कायमस्वरूपी इलाज नाही. यामुळेच हा आजार होणे ही चिंतेची बाब आहे. मात्र तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करून तुम्ही नक्कीच मधुमेहावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकता.

मधुमेहाचे बहुतेक रुग्ण खाण्यापिण्याची काळजी घेतात, पण या सगळ्यामध्ये ते आपल्या त्वचेची काळजी घेणे विसरतात. थंडीत प्रत्येकाची त्वचा कोरडी पडते. तसेच प्रचंड थंडी असल्याने प्रत्येक हिवाळ्यात सर्वजण अधिक गरम पाण्याने आंघाळ करतात. त्यामुळे आपल्या त्वचेची आर्द्रता नष्ट होते. अनेकदा लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मात्र मधुमेह असणाऱ्या लोकांना याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

अनेक वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते. त्वचेशी संबंधित समस्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये नैराश्य आणि तणाव वाढवू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांनी गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेवर सूज येऊ शकते. गरम पाण्यामुळे त्वचेला निस्तेजपणा, खाज सुटणे आणि लालसरपणा येण्याची शक्यता आहे.

दररोज गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील ओलावा कमी होतो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक तेल, प्रथिने आवश्यक असतात. परंतु गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्यांचे संतुलन बिघडू लागते. म्हणूनच तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास या समस्या टाळता येतील. मात्र अधिक तपशिलांसाठी तुम्ही नेहमी एखाद्या तज्ञाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या...

टॅग्स :diabetesमधुमेहSkin Care Tipsत्वचेची काळजीHealthआरोग्यWaterपाणी