शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा हीच चूक करत असाल; तर कितीही पौष्टीक खा, होणार नाही फायदा 

By manali.bagul | Updated: February 5, 2021 12:00 IST

Health Tips in Marathi : तुम्हीसुद्धा जेवणानंतर लगेचच पाणी पीत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं.  जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये हे अनेकांना माहीत असतं.

निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आजही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी  गंभीर आजारांचे कारण ठरतात. नेहमी फीट आणि निरोगी राहण्यासाठी जेवल्यानंतर लगेचच पाण्याचे सेवन करणं योग्य ठरत नाही. जर तुम्हीसुद्धा जेवणानंतर लगेचच पाणी पीत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं.  जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये हे अनेकांना माहीत असतं. पण प्यायल्यानं काही होत नाही असा गैरसमज ठेवल्यामुळे लोक वारंवार तिच चूक करतात.  लगेच पाणी प्यायल्यानं शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

पचनतंत्र व्यवस्थित काम करत नाही

जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यानं खाल्लेल्या अन्नाचं पचन लगेच होत नाही.  अन्न पचवण्यासाठी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अन्न खाल्ल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन केल्यास वजन वाढू शकते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, जेवणाच्या दोन तास आधी पाणी प्या. पाणी प्यायल्याने ही जठराग्नि समाप्त होते. ही जठराग्नि जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही, गळून जाते. असे केल्यास मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो. आयुर्वेदानुसार सकाळी अधिक पाणी पिणे, जेवल्यानंतर त्वरीत पाणी न पिणे हा उत्तम मार्ग आहे. यामुळे आजारांपासून दूर  राहण्यास मदत होते. 

गॅस अॅसिडीटी

खाल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं गॅस, अॅसिडीटीची समस्या उद्भवू शकते. गॅस आणि एसिडीटीच्या समस्येपासून लांब राहण्यासाठी लगेचच पाणी पिऊ नका.

डायबिटीसच्या रूग्णांसाठी धोकादायक

जेवणानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांना धोकादायक ठरू शकते. जेवणानंतर ताबडतोब पाणी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

अल्सर

जेवणानंतर लगेच पाण्याचे पाणी प्यायल्यानं अल्सर होण्याची शक्यता असते. खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे गॅस आणि आम्लतेची समस्या देखील उद्भवू शकते. आपण जे अन्न खातो ते बेंबीच्या डाव्या बाजूला असलेल्या जठारात जाऊन पचन क्रिया होते. जठराग्नि खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नि ही पचन क्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.

पाणी पिण्याची योग्य वेळ

सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानेतर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिडहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे.

(टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.) 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWaterपाणीfoodअन्न