शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदानुसार काय आणि कधी खावं? फॉलो कराल नियम तर डॉक्टरकडे जावं लागणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 16:01 IST

Health Tips : यात सांगण्यात आलेले खाण्या-पिण्याचे नियम फॉलो करून तुम्ही एक निरोगी आणि ऊर्जापूर्ण आयुष्य जगू शकता. चला जाणून घेऊ काय आहेत हे नियम...

Health Tips : आयुर्वेदातील अनेक गोष्टींचं पालन करून आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. फार पूर्वीपासून आयुर्वेदाचा वापर वेगवेगळे आजार दूर करण्यासाठी केला जातो. आयुर्वेद ही एक निरोगी जीवन जगण्याची कला आहे. ही कला जर तुम्ही अवगत केली तर जीवन निरोगी जगणंही शक्य आहे. आणि तुम्हाला कधी डॉक्टरकडे जाण्याचीही गरज पडण्याची शक्यता कमी राहते. यात सांगण्यात आलेले खाण्या-पिण्याचे नियम फॉलो करून तुम्ही एक निरोगी आणि ऊर्जापूर्ण आयुष्य जगू शकता. चला जाणून घेऊ काय आहेत हे नियम...

काय आणि कधी खावं?

आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हाच जेवण केलं पाहिजे. कोणतेही पदार्थ एकत्र करून खाणे किंवा ओव्हरइटिंग टाळलं पाहिजे. तिन्ही वेळचं जेवण नियमितपणे आणि योग्य वेळेवर केलं पाहिजे. तुम्हाला जेवण झाल्यावर अवेळी भूक लागली तर फळं खाऊ शकता. फळं आणि हिरव्या भाज्यांचं अधिकाधिक सेवन करावं. 

याचा होतो अधिक फायदा

भूक लागल्यावरच जेवण केल्याने अधिक फायदे होतात. आयुर्वेदानुसार, जेव्हा आपण भूक लागल्यावरच जेवण करतो, तेव्हा आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्सचं प्रमाण वाढतं आणि आपला मूड चांगला राहतो. भूक लागल्यावरच जेवण केल्याने अन्न पचन चांगलं होतं आणि आपलं शरीर मजबूत राहतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आयुर्वेदानुसार, खाण्या-पिण्याचे नियम फॉलो केल्यास आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याने नुकसानकारक बॅक्टेरिया आणि कीटाणू आपल्या शरीराला नुकसान पोहोचवू शकत नाही. आणि आपण कमी आजारी पडतो.

सौंदर्य वाढतं

आपण सर्वच आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय आणि ट्रिटमेंट करत असतो. पण जर केवळ आयुर्वेदानुसार खाणं-पिणं सुरू कराल तर सुंदर त्वचा आणि आकर्षक शरीर कोणत्याही मेहनतीशिवाय मिळवता येऊ शकतं.

मानसिक आरोग्य राहतं चांगलं

जर आपण दिवसातील तिन्ही वेळी योग्य वेळेवर ताजं जेवणं अन्न खाल्लं तर आपल्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. आपली स्मरणशक्ती चांगली होते आणि रागावरही कंट्रोल ठेवता येतो. अस्वस्थता, चिंता आणि घाबरणं यांसारख्या समस्या आपल्यापासून दोन हात दूर राहतात.

कधी जास्त खावं?

आयुर्वेदानुसार, आपण भूकेपेक्षा जास्त अन्न खाऊ नये. जेवढी भूक आहे, त्यापेक्षा थोडं कमीच खावं. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित व्हावी. पण जर तुम्हाला कधी जास्त खाण्याचं मन झालं तर दुपारच्या वेळी खावं. सकाळी आणि सायंकाळी हलकं खावं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य