शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

छोटीशी चुकही ठरू शकते लठ्ठपणाचं कारण, जाणून घ्या आयुर्वेदातील पाणी पिण्याची योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:22 IST

Drinking Water Tips: काही लोक जेवणाआधी पाणी पितात, तर काही लोक जेवणानंतर पाणी पितात. पण असं करणं योग्य आहे का? याबाबत आयुर्वेदात काही खास नियम आहेत. चला जाणून घेऊ हे नियम...

Drinking Water Tips: आपल्या शरीराला दिवसभर अॅक्टिव राहण्यासाठी जेवण आणि भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असते. यांच्याशिवाय किंवा चुकीच्या पद्धतीने यांचं सेवन केलं तर शरीरात कमजोरीसोबत अनेक आजार जन्म घेतात. रूटीन आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे. तसेच काही छोटे मोठे बदल करून अनेक आजार आपण दूर ठेवू शकतो. ज्यातील एक सवय आहे दिवसभर पाणी पिऊन हायड्रेटेड राहणं. अशात जेव्हा जेवणासोबत पाणी पिण्याचा विषय येतो तेव्हा आपण सगळेच वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करतो. काही लोक जेवणाआधी पाणी पितात, तर काही लोक जेवणानंतर पाणी पितात. पण असं करणं योग्य आहे का? याबाबत आयुर्वेदात काही खास नियम आहेत. चला जाणून घेऊ हे नियम...

काय आहे आयुर्वेदात पाणी पिण्याचा नियम?

आयुर्वेदिक डॉक्टर एश्वर्या संतोष सांगतात की, जेवणासोबत पाणी पिताना आयुर्वेदात सांगण्यात आलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असं करून पचनासंबंधी अनेक समस्यांपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. आयुर्वेदात जेवणाआधी किंवा जेवणानंतर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात नाही. तर काही वेळाच्या गॅपने जेवण करताना थोडं थोडं पाणी पिणं फायदेशीर मानलं आहे.

जेवणाआधी पाणी प्यावं का?

बरेच लोक जेवणाआधी एक ग्लास पाणी पिणं पसंत करतात. जेणेकरून आपण जेव्हा जेवण करून तेव्हा कमी कॅलरीचं सेवन करू. पण प्रत्यक्षात जेवणाआधी पाणी प्यायल्याने आपलं पोट भरतं आणि जेवण कमी जातं. अशात आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळत नाहीत. त्यामुळे आयुर्वेदानुसार जेवणाआधी पाणी पिणं चुकीचं आहे. असं करून शरीरात कमजोरी आणि तुम्ही बारीक होण्याची शक्यता असते.

जेवण केल्यावर पाणी पिण्याचं काय?

अनेक लोक जेवण केल्यानंतर पाणी पिण्याचा सल्ला देतात. याचं लॉजिक हे सांगतं की, जेवण केल्यावर पाणी प्यायल्याने आपण चांगल्याप्रकारे अन्न पचवू शकतो. पण असं नसतं. आयुर्वेदानुसार जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने लठ्ठपणा येतो.

मग कसं प्यावं पाणी?

आयुर्वेद डॉक्टर सांगतात की, जेवण करताना एक एक घोट पाणी पिणं सर्वात चांगलं असतं. याने अन्नाचे मोठे मोठे घास तोडण्यास मदत मिळते. ज्याने पचनक्रिया चांगल्या प्रकारे होते. त्याशिवाय जेवणादरम्यान तुम्ही पाणी प्यायल्याने तुम्ही ओव्हरइटिंगपासून वाचू शकता. जे अनेकदा वजन वाढण्याचं कारण असतं.

थंड की गरम पाणी?

डॉक्टर सांगतात की, पचनक्रिया चांगली होण्यासाठी आणि पचनतंत्र चांगलं राहण्यासाठी आयुर्वेदात नेहमीच कोमट पाण्यासोबत जेवण करण्याचा सल्ला दिला जातो. कोमट पाणी शरीरातील रक्तप्रवाह योग्यप्रकारे व्हावा यासाठीही पिण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य