शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

छोटीशी चुकही ठरू शकते लठ्ठपणाचं कारण, जाणून घ्या आयुर्वेदातील पाणी पिण्याची योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:22 IST

Drinking Water Tips: काही लोक जेवणाआधी पाणी पितात, तर काही लोक जेवणानंतर पाणी पितात. पण असं करणं योग्य आहे का? याबाबत आयुर्वेदात काही खास नियम आहेत. चला जाणून घेऊ हे नियम...

Drinking Water Tips: आपल्या शरीराला दिवसभर अॅक्टिव राहण्यासाठी जेवण आणि भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असते. यांच्याशिवाय किंवा चुकीच्या पद्धतीने यांचं सेवन केलं तर शरीरात कमजोरीसोबत अनेक आजार जन्म घेतात. रूटीन आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे. तसेच काही छोटे मोठे बदल करून अनेक आजार आपण दूर ठेवू शकतो. ज्यातील एक सवय आहे दिवसभर पाणी पिऊन हायड्रेटेड राहणं. अशात जेव्हा जेवणासोबत पाणी पिण्याचा विषय येतो तेव्हा आपण सगळेच वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करतो. काही लोक जेवणाआधी पाणी पितात, तर काही लोक जेवणानंतर पाणी पितात. पण असं करणं योग्य आहे का? याबाबत आयुर्वेदात काही खास नियम आहेत. चला जाणून घेऊ हे नियम...

काय आहे आयुर्वेदात पाणी पिण्याचा नियम?

आयुर्वेदिक डॉक्टर एश्वर्या संतोष सांगतात की, जेवणासोबत पाणी पिताना आयुर्वेदात सांगण्यात आलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असं करून पचनासंबंधी अनेक समस्यांपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. आयुर्वेदात जेवणाआधी किंवा जेवणानंतर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात नाही. तर काही वेळाच्या गॅपने जेवण करताना थोडं थोडं पाणी पिणं फायदेशीर मानलं आहे.

जेवणाआधी पाणी प्यावं का?

बरेच लोक जेवणाआधी एक ग्लास पाणी पिणं पसंत करतात. जेणेकरून आपण जेव्हा जेवण करून तेव्हा कमी कॅलरीचं सेवन करू. पण प्रत्यक्षात जेवणाआधी पाणी प्यायल्याने आपलं पोट भरतं आणि जेवण कमी जातं. अशात आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळत नाहीत. त्यामुळे आयुर्वेदानुसार जेवणाआधी पाणी पिणं चुकीचं आहे. असं करून शरीरात कमजोरी आणि तुम्ही बारीक होण्याची शक्यता असते.

जेवण केल्यावर पाणी पिण्याचं काय?

अनेक लोक जेवण केल्यानंतर पाणी पिण्याचा सल्ला देतात. याचं लॉजिक हे सांगतं की, जेवण केल्यावर पाणी प्यायल्याने आपण चांगल्याप्रकारे अन्न पचवू शकतो. पण असं नसतं. आयुर्वेदानुसार जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने लठ्ठपणा येतो.

मग कसं प्यावं पाणी?

आयुर्वेद डॉक्टर सांगतात की, जेवण करताना एक एक घोट पाणी पिणं सर्वात चांगलं असतं. याने अन्नाचे मोठे मोठे घास तोडण्यास मदत मिळते. ज्याने पचनक्रिया चांगल्या प्रकारे होते. त्याशिवाय जेवणादरम्यान तुम्ही पाणी प्यायल्याने तुम्ही ओव्हरइटिंगपासून वाचू शकता. जे अनेकदा वजन वाढण्याचं कारण असतं.

थंड की गरम पाणी?

डॉक्टर सांगतात की, पचनक्रिया चांगली होण्यासाठी आणि पचनतंत्र चांगलं राहण्यासाठी आयुर्वेदात नेहमीच कोमट पाण्यासोबत जेवण करण्याचा सल्ला दिला जातो. कोमट पाणी शरीरातील रक्तप्रवाह योग्यप्रकारे व्हावा यासाठीही पिण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य