शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

कांदा-लसूण खाल्ल्यावर तोंडातून दुर्गंधी येते? करा हे सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 10:10 IST

लसूण आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर असतो. त्याचप्रमाणे कांद्याचे गुणही कुणापासून लपले नाहीयेत. तज्ज्ञ या दोन्हींचा आहारात समावेश करण्याचा आवर्जून सल्ला देतात.

(Image Credit : www.scienceabc.com)

लसूण आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर असतो. त्याचप्रमाणे कांद्याचे गुणही कुणापासून लपले नाहीयेत. तज्ज्ञ या दोन्हींचा आहारात समावेश करण्याचा आवर्जून सल्ला देतात. आयुर्वेदात तर यांना औषधी मानलं आहे. लसणाचा आणि कांद्याचा वेगवेगळे आजार दूर करण्यासाठी फायदा होतो. पण अनेकांना लसूण आणि कांदा खाल्ल्यावर तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीने त्रास होतो. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी आम्ही काही उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

करा हे उपाय...

ग्रीन टी - जर कांदा किंवा लसूण खाल्ल्यावर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी एक कप ग्रीन टी सेवन करा. याने तोंडाची दुर्गंधी दूर होईल. ग्रीन टी मध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, पॉलीफेनोल्स आणि फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. याने अनेक फायदेही होतात. ग्रीन टी मुळे तोंडाची दुर्गंधी तर दूर होतेच सोबतच याने हृदय निरोगी राहतं, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं, पचनक्रिया सुधारते. अनेक संशोधनातून ही बाब समोर आली आहे की, ग्रीन टी मुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. 

लिंबाचा रस - तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे लिंबाचा रस. लसूण खाल्ल्यानंतर जर तुमच्या तोंडातून दुर्गधी येत असेल तर लगेच लिंबाचा रस सेवन करा. लिंबाच्या रसात सिट्रिक अॅसिड अशतं, ज्याने लसणाचा वास दूर होतो. 

सफरचंद खा - जर तुम्ही लसूण किंवा कांदा खाल्ला असेल आणि याने तोंडातून दुर्गधी येत असेल हा सुद्धा एक सोपा उपाय आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सफरचंद खाऊ शकता. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, सफरचंदमध्ये असलेल्या केमिकल्समुळे तोंडाची दुर्गंधी दूर केली जाऊ शकते. 

टॅग्स :onionकांदाBeauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सAyurvedic Home Remediesघरगुती उपाय