शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

दोस्तीची ताकद... मित्र जेवढे जास्त, तेवढी जास्त टिकते स्मरणशक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 17:22 IST

जसजसं वय वाढत जातं, तसतशी मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. वृद्धापकाळात विस्मृतीचा आजार जडतो. तो आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर भरपूर मित्र जोडा.

जसजसं वय वाढत जातं, तसतशी मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. वृद्धापकाळात विस्मृतीचा आजार जडतो. तो आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर भरपूर मित्र जोडा. कारण, मित्रमंडळ जेवढं मोठं, सामाजिक बांधिलकी जेवढी अधिक तेवढी तुमच्या मेंदूची क्षमता, स्मरणशक्ती जास्त काळ टिकून राहते, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

भावना आणि प्रेरणा यांना जागृत करणारा मेंदूचा भाग वयासोबत प्रभावित होतो. लोकांच्या मेंदूच्या या भागांमध्ये त्यांचे सामाजिक संबंध सुरक्षित राहतात. 

अमेरिकेच्या कोलंबसमध्ये 'ओहियो स्टेट युनिवर्सिटी'च्या 'न्यूरोलॉजिकल इंस्टीट्यूट'मधील मुख्य संशोधक एलिझाबेथ किर्बी यांनी सांगितले की, 'आम्ही केलेल्या संशोधनातून असे निष्पन्न झाले की, सामाजिक बांधिलकी असलेल्या लोकांच्या मेंदूवर वयाचा प्रभाव पडतो.'

जनरल 'फ्रंटियर इन एजिंग न्यूरोसायन्स' यांनी प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, संशोधकांनी 15 ते 18 महिने उंदरांच्या दोन समूहांवर अभ्यास केला. उंदरांना एक खेळणं देऊन त्यांची स्मरणशक्ती तपासण्यात आली. परिणामी संशोधनातून असे सिद्ध झाले की, समूहाने राहणाऱ्या उंदरांची स्मरणशक्ती चांगली होती. 

किर्बी यांनी सांगितले की, ज्या उंदरांना एकाच सहकाऱ्यासोबत ठेवण्यात आलं होतं ते खेळणं ओळखू शकले नाहीत. तर जे उंदीर समूहात होते, ते नवीन खेळण्याकडे दुर्लक्ष करून जुन्या खेळण्याकडे गेले. भविष्यात यामध्ये आणखी संशोधन करण्यात येणर आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य