शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धतीने बनवतात डाळ, योग्य पद्धत वापराल तर मिळेल जास्त फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 10:33 IST

डाळ सामान्यपणे रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते. सगळेच लोक डाळ एकाच पद्धतीने बनवतात. जसे की, डाळीमध्ये पाणी टाकून ती उकडतात आणि नंतर फोडणी दिली जाते.

भारतात रोजच्या आहारात डाळींचा खूप वापर केला जातो. डाळींची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच यातून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. वेगवेगळ्या डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पोषक तत्व भरपूर असतात. नियमितपणे डाळींचं सेवन केल्यास पचनक्रिया चांगली होते, हृदय निरोगी राहतं, बीपी आणि शुगर कंट्रोल होते, वजन कमी होतं आणि कॅन्सरपासूनही बचाव होऊ शकतो.

डाळ सामान्यपणे रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते. सगळेच लोक डाळ एकाच पद्धतीने बनवतात. जसे की, डाळीमध्ये पाणी टाकून ती उकडतात आणि नंतर फोडणी दिली जाते. मात्र, न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार डाळ बनवण्याची ही पद्धत चुकीची आहे. त्यांनी डाळ बनवण्याची योग्य पद्धत सांगितली आहे आणि त्याची काही कारणेही सांगितली आहेत. 

जर तुम्हाला डाळीपासून जास्त फायदे मिळवायचे असतील किंवा पचन आणि पोषणाचं अवशोषण अधिक चांगलं करायचं असेल तर डाळ आधी पाण्यात भिजवून ठेवली पाहिजे. याने डाळ जास्त पौष्टिक आणि टेस्टी बनते. अशात आज आम्ही तुम्हाला डाळ भिजवून खाण्याचे फायदे काय होतात हे सांगणार आहोत. 

पोषक तत्वांचं अवशोषण

डाळीमध्ये काही तत्व असतात जसे की, टॅनिन आणि पॉलीफेनोल्स जे पचन आणि पोषक तत्वांच्या अवशोषणात अडचण निर्माण करतात. डाळ भिजवली तर हे तत्व कमी करण्यास मदत मिळते. डाळ भिजवून ठेवल्याने फायटिक अॅसिडचं प्रमाणही कमी होतं. फायटिक अॅसिडमुळे आयर्न, झिंक आणि कॅल्शिअमसारख्या पोषक तत्वाचं अवशोषण रोखलं जातं. 

पचनक्रिया सुधारते

डाळ भिजवून ठेवल्यास ऑलिगोसॅकराइड सारख्या कठोर शुगरला तोडण्यास मदत मिळते, ज्यामुळे पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होत नाही. याने डाळीचं पचन सहज होतं. डाळ भिजवून खाल्ल्यास लेक्टिन कमी होतं, ज्याने आतड्या जळण्याची भिती असते. 

डाळ बनवण्याची योग्य वेळ

डाळ भिजवून ठेवल्याने ती मुलायम होते आणि लवकर शिजते. याने वेळही वाचतो आणि ऊर्जाही कमी लागते. भिजवलेली डाळ लवकर शिजते त्यामुळे डाळ बनवताना तुम्हाला पाणीही कमी लागतं. 

दूषित तत्व कमी होतात

डाळ भिजवून ठेवल्याने त्यातील धूळ आणि माती निघून जाते. तसेच त्यातील कीटकही दूर होतात. इतकंच नाही तर त्यावर काही केमिकल्स असतील तर तेही दूर होतात. 

टेस्ट सुधारते

भिजवलेली डाळ समान रूपात शिजण्यास मदत मिळते. तसेच भिजवलेल्या डाळीची टेस्टही अधिक वाढते. म्हणजे काय तर कोणतीही डाळ शिजवण्याआधी पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर बनवा. याने शरीराला अनेक फायदे मिळतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य