शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धतीने बनवतात डाळ, योग्य पद्धत वापराल तर मिळेल जास्त फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 10:33 IST

डाळ सामान्यपणे रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते. सगळेच लोक डाळ एकाच पद्धतीने बनवतात. जसे की, डाळीमध्ये पाणी टाकून ती उकडतात आणि नंतर फोडणी दिली जाते.

भारतात रोजच्या आहारात डाळींचा खूप वापर केला जातो. डाळींची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच यातून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. वेगवेगळ्या डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पोषक तत्व भरपूर असतात. नियमितपणे डाळींचं सेवन केल्यास पचनक्रिया चांगली होते, हृदय निरोगी राहतं, बीपी आणि शुगर कंट्रोल होते, वजन कमी होतं आणि कॅन्सरपासूनही बचाव होऊ शकतो.

डाळ सामान्यपणे रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते. सगळेच लोक डाळ एकाच पद्धतीने बनवतात. जसे की, डाळीमध्ये पाणी टाकून ती उकडतात आणि नंतर फोडणी दिली जाते. मात्र, न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार डाळ बनवण्याची ही पद्धत चुकीची आहे. त्यांनी डाळ बनवण्याची योग्य पद्धत सांगितली आहे आणि त्याची काही कारणेही सांगितली आहेत. 

जर तुम्हाला डाळीपासून जास्त फायदे मिळवायचे असतील किंवा पचन आणि पोषणाचं अवशोषण अधिक चांगलं करायचं असेल तर डाळ आधी पाण्यात भिजवून ठेवली पाहिजे. याने डाळ जास्त पौष्टिक आणि टेस्टी बनते. अशात आज आम्ही तुम्हाला डाळ भिजवून खाण्याचे फायदे काय होतात हे सांगणार आहोत. 

पोषक तत्वांचं अवशोषण

डाळीमध्ये काही तत्व असतात जसे की, टॅनिन आणि पॉलीफेनोल्स जे पचन आणि पोषक तत्वांच्या अवशोषणात अडचण निर्माण करतात. डाळ भिजवली तर हे तत्व कमी करण्यास मदत मिळते. डाळ भिजवून ठेवल्याने फायटिक अॅसिडचं प्रमाणही कमी होतं. फायटिक अॅसिडमुळे आयर्न, झिंक आणि कॅल्शिअमसारख्या पोषक तत्वाचं अवशोषण रोखलं जातं. 

पचनक्रिया सुधारते

डाळ भिजवून ठेवल्यास ऑलिगोसॅकराइड सारख्या कठोर शुगरला तोडण्यास मदत मिळते, ज्यामुळे पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होत नाही. याने डाळीचं पचन सहज होतं. डाळ भिजवून खाल्ल्यास लेक्टिन कमी होतं, ज्याने आतड्या जळण्याची भिती असते. 

डाळ बनवण्याची योग्य वेळ

डाळ भिजवून ठेवल्याने ती मुलायम होते आणि लवकर शिजते. याने वेळही वाचतो आणि ऊर्जाही कमी लागते. भिजवलेली डाळ लवकर शिजते त्यामुळे डाळ बनवताना तुम्हाला पाणीही कमी लागतं. 

दूषित तत्व कमी होतात

डाळ भिजवून ठेवल्याने त्यातील धूळ आणि माती निघून जाते. तसेच त्यातील कीटकही दूर होतात. इतकंच नाही तर त्यावर काही केमिकल्स असतील तर तेही दूर होतात. 

टेस्ट सुधारते

भिजवलेली डाळ समान रूपात शिजण्यास मदत मिळते. तसेच भिजवलेल्या डाळीची टेस्टही अधिक वाढते. म्हणजे काय तर कोणतीही डाळ शिजवण्याआधी पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर बनवा. याने शरीराला अनेक फायदे मिळतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य