शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

जीवनाला दुसरी संधी: हाडांच्या कॅन्सरग्रस्त मुलांसाठी हात/पाय वाचवणारी शस्त्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 20:05 IST

हा आजार केवळ मुलासाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप थकवणारा असतो.

-डॉ. राज नगरकर (मॅनेजिंग डायरेक्टर, प्रमुख सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन, HCG मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक)

मुलांमध्ये हाडांचा कॅन्सर दुर्मिळ असतो, परंतु जेव्हा हा आजार होतो, तेव्हा तो अत्यंत आक्रमक आणि झपाट्याने पसरतो. हा प्रकार बहुतेक वेळा वाढत्या वयातील मुलांमध्ये विशेषतः गुडघ्याजवळ किंवा खांद्याजवळ दिसून येतो, जिथे हाडांची वाढ वेगाने होते.

हा आजार केवळ मुलासाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप थकवणारा असतो. उपचार, शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन यासारख्या कठीण निर्णयांचा सामना करावा लागतो.

पूर्वीची परिस्थिती

पूर्वी, जर मुलाच्या हातात किंवा पायात हाडांचा कॅन्सर झाला, तर वैद्यकीय उपचार हे खूप कठोर स्वरूपाचे असायचे. कॅन्सरग्रस्त हाडाचा संपूर्ण भाग काढून टाकावा लागे. जर ट्युमर मोठा असेल किंवा शरीरातील अत्यावश्यक रचनेच्या जवळ असेल, तर पाय किंवा हात कापणे (amputation) हाच एकमेव पर्याय होता. प्राधान्य हे फक्त जीवन वाचवणे असायचे जर त्यामुळे हालचाली गमवाव्या लागल्या तरी.

आता आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे बदल

आज, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अधिक चांगल्या नियोजनामुळे, अशा प्रकारचे शस्त्रक्रियेचे मार्ग तयार झाले आहेत जे कॅन्सर काढून टाकतात पण लिंब (हात/पाय) जपतात. यामधील एक पद्धत म्हणजे Extracorporeal Irradiation (ECI) हाड वाचवणारी शस्त्रक्रिया जी काही निवडक मुलांमध्ये यशस्वी ठरत आहे.

ही प्रक्रिया कशी असते?

ECI (एक्स्ट्रा कॉर्पोरियल इरॅडिएशन) प्रक्रियेमध्ये ट्युमर असलेला हाडाचा भाग शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला जातो. नंतर हा भाग शरीराबाहेर अत्यंत तीव्र रेडिएशनद्वारे उपचारित केला जातो. ज्यामुळे त्या भागातील सर्व कॅन्सर पेशी नष्ट होतात.

ही प्रक्रिया ऐकायला सरळ वाटते, पण प्रत्येक टप्प्यावर अचूकतेची गरज असते. उद्देश असा की एकही कॅन्सर पेशी उरू नये, पण हाडाच्या संरचनेला इजा होऊ नये.

एकदा हे हाड पूर्ण निर्जंतुक (sterilized) केल्यावर ते पुन्हा शरीरात मूळ जागी बसवले जाते आणि सर्जिकल हार्डवेअरद्वारे सुरक्षितरीत्या फिक्स केले जाते.

कारण मुलाचं स्वतःचं हाड वापरलं जातं, त्यामुळे कृत्रिम प्रत्यारोपणासारख्या अडचणी येत नाहीत. त्यामुळे डोनरची गरज राहत नाही, आणि शरीर त्या भागाला नाकारण्याचा धोका कमी होतो.

कोणासाठी योग्य?

ही उपचारपद्धती प्रत्येक मुलासाठी योग्य असेलच असे नाही. ही सर्वात चांगली तेव्हाच कार्यक्षम असते जेव्हा ट्युमर पसरलेला नसतो आणि मूल केमोथेरपीला चांगला प्रतिसाद देत असतो.

कॅन्सरची जागाही महत्त्वाची असते ती अशा ठिकाणी असावी जिथे स्वच्छपणे हाड काढून टाकता येईल आणि आजूबाजूच्या नसा किंवा महत्त्वाच्या रचना सुरक्षित राहतील.

अनुभवी सर्जन्सच्या हाती, ही पद्धत खूप प्रभावी ठरली आहे. अनेक मुलांनी शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांत चांगले पुनरुत्थान (functional recovery) दाखवले आहे आणि दीर्घकालीन तपासणीतही चांगले परिणाम दिसून आले आहेत. विशेषतः कॅन्सर लवकर आढळल्यास आणि वेळीच उपचार झाल्यास.

हे महत्त्वाचे का आहे?

एका मुलासाठी लिंब गमावणे हे फक्त शारीरिकच नव्हे तर भावनिक दृष्टिकोनातूनही आयुष्य बदलवणारे असते.त्याच्या हालचाली, खेळणे, आत्मविश्वास, आणि इतर लोक त्याच्याकडे कसे पाहतात या सर्व गोष्टी बदलतात.

ECI पद्धतीमुळे, मूल आपला हात/पाय जपू शकते, आणि त्यामुळे अनेक मानसिक आणि सामाजिक अडचणी टाळता येतात. शारीरिक पुनर्वसन अजूनही आवश्यक असते, पण मानसिकदृष्ट्या ही प्रक्रिया हलकी वाटते कारण मूल ‘आपलंच’ काहीतरी टिकवून ठेवू शकतं.

बहुतेक वेळा, मुले प्रौढांपेक्षा लवकर सावरतात. पुनर्वसन सुरू झाल्यानंतर त्यांचे दैनंदिन जीवन फारसे बदल न करता पूर्ववत होते.

पुढे काय?

ECI सारख्या लिंब जपणाऱ्या उपचारपद्धतींमध्ये वाढता रस ही बाल कर्करोग उपचारांच्या क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांची खूण आहे जिथे केवळ जिवंत राहणं नव्हे, तर चांगलं आयुष्य जगणं हेही उद्दिष्ट ठरत आहे.

आज डॉक्टर केवळ हे पाहत नाहीत की मूल कॅन्सरवर मात करू शकेल का, तर ते कॅन्सरनंतर कसं जीवन जगेल हेही तेवढंच महत्त्वाचं ठरत आहे.

अनेक रुग्णालयं आता ही पद्धत शिकण्यासाठी त्यांच्या सर्जिकल टीमला प्रशिक्षित करत आहेत. जसजशी ही कौशल्ये वाढत आहेत, तसतशी अधिकाधिक कुटुंबांना निदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ECI हा पर्याय दिला जातोय.

ही पद्धत सर्वांसाठी योग्य नाही, पण ज्या निवडक मुलांसाठी ती लागू होते. त्यांच्यासाठी ही केवळ वैद्यकीय प्रगती नाही, तर एक शांत पण सामर्थ्यवान आशेची किरण आहे.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdoctorडॉक्टर