शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोज एक फळ ठेवेल आयुष्य निरोगी आणि सुंदर! बघा हिवाळ्यात कोणत्या फळांचा घेता येईल आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 12:40 IST

कोणत्याही आजारापासून आणि डॉक्टरांपासून चार हात लांबच राहायचे असेल तर फळे खाण्याशिवाय पर्याय नाही. ज्या ऋतूत जी जी फळे येतात ती खाल्ल्याने तुम्ही निरोगी आणि प्रसन्न राहू शकता.

निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगायचे असेल तर तसा नियमित आहारही हवा. आजकाल वेळेची कारणे देत अनेक जण केवळ जंक फूड खाण्याकडे वळले आहेत. हे शरिरासाठी घातक आहेच मात्र फक्त बाहेरचे अन्नपदार्थ खाऊन उपयोग नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तसा समतोल राखणेही आवश्यक आहे. हा समतोल राखण्यासाठी रोज किमान एक तरी फळ खाणे गरजेचे आहे. कोणत्याही आजारापासून आणि डॉक्टरांपासून चार हात लांबच राहायचे असेल तर फळे खाण्याशिवाय पर्याय नाही. ज्या ऋतूत जी जी फळे येतात ती खाल्ल्याने तुम्ही निरोगी आणि प्रसन्न राहू शकता. फळांमध्ये अॅंटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. फळांमुळे रोगप्रतिकारकशक्ती तर वाढतेच सोबतच डोळे निरोगी राहतात आणि पचनक्रियाही सुधारते. 

फळ खाण्यापुर्वी हे लक्षात घ्या

कोणतेही फळ हे स्वयंपूर्ण असा आहार आहे. त्यामुळे फळ खाण्यापुर्वी आणि खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास जेवण करु नये. फळामध्ये असलेले सर्व जीवनसत्वे शरिराला मिळणे गरजेचे आहे. म्हणून रिकाम्या पोटी फळ खाणे कधीही चांगले.

हिवाळ्यात खावी अशी फळे कोणती ?

थंडीत फ्लू तसेच इतर आजार लगेच पसरतात. अशावेळी फळांमुळे जीवनसत्वे जास्तीत जास्त मिळतात. कधीही आजारी पडल्यावर डॉक्टरही नेहमी फळे खाण्याचाच सल्ला देतात. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यासाठी फळे खाणे रामबाण उपाय आहे.

सफरचंद 

सफरचंदाचा हंगाम हिवाळ्यात येतो. ताजी ताजी आणि रसरशीत सफरचंद हिवाळ्यात येतात. सफरचंदात भरपूर फायबर, जीवनसत्वे सी आणि के असतात. यामुळे शरीर आजारांपासून दूर राहते. सफरचंदाचा रस पिणेही शरिरासाठी उत्तम आहे. 

सीताफळ 

सीताफळ अनेकांना आवडत नाही. मात्र थंडीत सीताफळ आवर्जुन खावे. सीताफळमध्ये व्हिटॅमिन ६ चे प्रमाण अधिक असते. विशेषकरुन लहान मुलांसाठी सीताफळ अत्यंत गुणकारी आहे.

डाळिंब 

थंडीच्या दिवसात डाळिंबाचाही हंगाम असतो. डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. डाळिंब रक्त पातळ करते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते. थंडीत त्वचा कोरडी पडते यासाठी डाळिंब गुणकारी आहे. 

पेरु

गोड, रसरशीत पेरु बघितलेच की तोंडाला पाणी सुटते. पेरुमध्येही व्हिटॅमिन सी आणि अॅंटिऑक्सीडंटचे घटक आढळतात. पेरुमुळे शरीर कोणत्याही संसर्गाशी सामना करण्यास तयार होते.

संत्री 

संत्री हा व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. संत्री ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाभदायक ठरते. त्यातच डिसेंबर मध्ये येणारी संत्री ही चवीला अत्यंत गोड असतात. मात्र सर्दी, खोकला झाला असल्यास शक्यतो संत्री खाणे टाळावे.

टॅग्स :fruitsफळे