शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रोज एक फळ ठेवेल आयुष्य निरोगी आणि सुंदर! बघा हिवाळ्यात कोणत्या फळांचा घेता येईल आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 12:40 IST

कोणत्याही आजारापासून आणि डॉक्टरांपासून चार हात लांबच राहायचे असेल तर फळे खाण्याशिवाय पर्याय नाही. ज्या ऋतूत जी जी फळे येतात ती खाल्ल्याने तुम्ही निरोगी आणि प्रसन्न राहू शकता.

निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगायचे असेल तर तसा नियमित आहारही हवा. आजकाल वेळेची कारणे देत अनेक जण केवळ जंक फूड खाण्याकडे वळले आहेत. हे शरिरासाठी घातक आहेच मात्र फक्त बाहेरचे अन्नपदार्थ खाऊन उपयोग नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तसा समतोल राखणेही आवश्यक आहे. हा समतोल राखण्यासाठी रोज किमान एक तरी फळ खाणे गरजेचे आहे. कोणत्याही आजारापासून आणि डॉक्टरांपासून चार हात लांबच राहायचे असेल तर फळे खाण्याशिवाय पर्याय नाही. ज्या ऋतूत जी जी फळे येतात ती खाल्ल्याने तुम्ही निरोगी आणि प्रसन्न राहू शकता. फळांमध्ये अॅंटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. फळांमुळे रोगप्रतिकारकशक्ती तर वाढतेच सोबतच डोळे निरोगी राहतात आणि पचनक्रियाही सुधारते. 

फळ खाण्यापुर्वी हे लक्षात घ्या

कोणतेही फळ हे स्वयंपूर्ण असा आहार आहे. त्यामुळे फळ खाण्यापुर्वी आणि खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास जेवण करु नये. फळामध्ये असलेले सर्व जीवनसत्वे शरिराला मिळणे गरजेचे आहे. म्हणून रिकाम्या पोटी फळ खाणे कधीही चांगले.

हिवाळ्यात खावी अशी फळे कोणती ?

थंडीत फ्लू तसेच इतर आजार लगेच पसरतात. अशावेळी फळांमुळे जीवनसत्वे जास्तीत जास्त मिळतात. कधीही आजारी पडल्यावर डॉक्टरही नेहमी फळे खाण्याचाच सल्ला देतात. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यासाठी फळे खाणे रामबाण उपाय आहे.

सफरचंद 

सफरचंदाचा हंगाम हिवाळ्यात येतो. ताजी ताजी आणि रसरशीत सफरचंद हिवाळ्यात येतात. सफरचंदात भरपूर फायबर, जीवनसत्वे सी आणि के असतात. यामुळे शरीर आजारांपासून दूर राहते. सफरचंदाचा रस पिणेही शरिरासाठी उत्तम आहे. 

सीताफळ 

सीताफळ अनेकांना आवडत नाही. मात्र थंडीत सीताफळ आवर्जुन खावे. सीताफळमध्ये व्हिटॅमिन ६ चे प्रमाण अधिक असते. विशेषकरुन लहान मुलांसाठी सीताफळ अत्यंत गुणकारी आहे.

डाळिंब 

थंडीच्या दिवसात डाळिंबाचाही हंगाम असतो. डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. डाळिंब रक्त पातळ करते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते. थंडीत त्वचा कोरडी पडते यासाठी डाळिंब गुणकारी आहे. 

पेरु

गोड, रसरशीत पेरु बघितलेच की तोंडाला पाणी सुटते. पेरुमध्येही व्हिटॅमिन सी आणि अॅंटिऑक्सीडंटचे घटक आढळतात. पेरुमुळे शरीर कोणत्याही संसर्गाशी सामना करण्यास तयार होते.

संत्री 

संत्री हा व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. संत्री ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाभदायक ठरते. त्यातच डिसेंबर मध्ये येणारी संत्री ही चवीला अत्यंत गोड असतात. मात्र सर्दी, खोकला झाला असल्यास शक्यतो संत्री खाणे टाळावे.

टॅग्स :fruitsफळे