शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

हातात धरून पुस्तक- पेपर वाचल्यानं होतात 8 फायदे. वाचनानं अल्झायमरसारखे आजार राहतात दहा हात दूर.

By admin | Updated: June 8, 2017 18:21 IST

संशोधन सांगतंय तुम्हाला तुमचा विकास व्हावा असं वाटत असेल तर वाचनाची सवय गंभीरतेने लावा आणि असली तर वाढवा.

-माधुरी पेठकरकाही वर्षांपूर्वी जर कोणाला ‘तुमची आवड काय आहे?’ ‘तुम्हाला काय आवडतं? असं विचारलं की बहुतेकजण ‘मला वाचनाची आवड आहे’ म्हणून सांगायचे. पण आता हाच प्रश्न विचारला तर उत्तरं अनेक येतात. पण त्यात वाचनाची आवड असलेले खूप कमीजण आढळतात. स्मार्ट फोन, कम्प्युटर, गुगल, यू ट्यूब यामुळे वाचन संस्कृती थोडी मागे पडली आहे.पूर्वी ‘वाचाल तर वाचाल’ या नियमाप्रमाणे घरातले मोठे मुलांना वाचायलाच सांगायचे. दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना भरपूर वाचायला मिळावं यासाठी वाचनालय लावून द्यायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना वाचा वाचा म्हणून सांगणारे मोठे स्वत:ही दिवसभरात हातात पुस्तक, मासिक नाहीच काही तर पेपर तरी पूर्ण वाचायचे. पण हल्ली वाचनाची आवड कमी झालीये. काहींच्या बाबतीत त्यांना वाचनाची आवड आहे पण सवड मिळेनाशी झाली आहे. तर कोणाला हातात पुस्तक आणि पेपर धरून वाचायला आवडत नाही. अनेकजण धावतपळत संगणकावर गुगलवरून जेवढं वाचतात तेवढंच वाचण्यात आनंद मानत आहे. हे असं जरी असलं तरी संशोधन मात्र वाचत राहा या सल्ल्यावर ठाम आहे. वाचनाच्या संदर्भात गेल्या काही दिवसात जगभरात जे संशोधन झालं ते हेच सांगतं की तुम्हाला तुमचा विकास व्हावा असं वाटत असेल तर वाचनाची सवय गंभीरतेने लावा आणि असली तर वाढवा. आणि वाचन म्हणजे एका जागी निवांत बसून हातात पुस्तक धरून वाचणं संशोधनाला अभिप्रेत आहे. वाचनाच्या सवयीवर विविधअंगांनी जे संशोधन झालं आहे ते वाचनाचे शरीर आणि मनावर कसे चांगले आणि सकारात्मक परिणाम होतात हेचं सांगतं. जगण्याच्या दिशेपासून जगण्याच्या समाधानापर्यंत सर्व काही वाचनातून मिळू शकतं असा अभ्यास सांगतो.

 

    वाचल्यानं नेमकं काय होतं?1. हुशारी वाढते.संशोधक याबद्दल सांगतात की जेवढं तुम्ही वाचाल तितक्या अधिक विषयांची माहिती तुम्हाला होईल. पुस्तकाच्या माध्यमातून अख्खं जग समजून घेता येतं. लहान मुलांच्या हुशारीच्या बाबतीत तर वाचन खूप फायदेशीर ठरतं. मुलं भाषा ऐकून आणि वाचूनच शिकतात. पण उत्तमरित्या भाषा शिकण्याचं माध्यम म्हणजे त्या भाषेतलं पुस्तक वाचन. वाचण्यामुळे वाचणाऱ्याची शब्दसंपदा वाढते. वाचनाची ही सवय लहान वयातच विकसित झाली तर मोठेपणी वाचणारी व्यक्ती हुशार असण्याचीच पूर्ण शक्यता असते असं संशोधकांनी म्हटलंय. 2. मेंदूची क्षमता वाढते. वाचनामुळे अनेकविध विषयांची माहिती मिळून वाचणारा स्मार्ट तर होतोच. पण वाचनाच्या नियमित सवयीमुळे मेंदूची क्षमताही वाढते. ज्याप्रमाणे जॉगिंग, व्यायाम याचा फायदा शरीर आणि हदय सक्षम होण्यास होतो तसाच वाचनामुळे मेंदूचाही व्यायाम होवून मेंदू कार्यक्षम होत असतो. वाचनामुळे मेंदू कामाला लागतो आणि त्यातून स्मरणशक्ती वाढते. वयोमानानं स्मरणशक्ती कमी होते, मेंदूची कार्यक्षमताही कमी होते. पण नियमित वाचनाची सवय असेल तर वयोमानाचे स्मरणशक्तीवर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामाची तीवता खूपच कमी असते. वाचनामुळे मेंदू, बुध्दी आणि स्मरणशक्ती दीर्घकाळापर्यंत टोकदार राहू शकते.

 

 

 

           3. वाचनामुळे संवेदनशीलता वाढते.वाचनामुळे इतरांना समजून घेण्याची माणसातली शक्ती वाढते. वाचनामुळे इतर लोकांना काय वाटतं? हे समजून घेण्याची क्षमता वाढते. त्यातही तुम्हाला जर फिक्शन वाचण्याची सवय असेल तर हा परिणाम नॉन फिक्शन वाचण्याच्या तुलनेत जास्त दिसतो. 4. समजण्याच्या शक्तीमध्ये होते वाढ. बरेचजण वाचायचं म्हणून वाचत नाही. वाचताना अनेकांना नोटस काढून ठेवण्याची सवय असते.एखादी गोष्ट नीट समजली नसेल तर त्याची नोंद करून ठेवून नंतर ती समजून घेतात. वाचनामुळे समजून उमजून घेण्याची शक्ती वाढते.5. अल्झायमर आजाराशी लढण्याची ताकद मिळते. वाचन हे मेंदूला कामाला लावतं. जसं बुध्दीबळ खेळणं, कोडं सोडवणं हे करताना मेंदू जसा अ‍ॅक्टिव्ह होतो तसाच वाचन करताना मेंदू कामाला लागतो. मेंदूला सतत कामाला लावणं महत्त्वाचं असतं. मेंदूचं काम जर थंडावलं तर अल्झायमर सारख्या मानसिक आजारांची शक्यता वाढते. वाचनासारखी सवय मेंदूला कामात ठेवून या आजारापासूनही लांब ठेवते.6. मेंदू आणि मनाला आराम मिळतो. दिवसभरातल्या कामानं आलेला तणाव घालवायचा असेल तर सरळ दिवसाच्या शेवटी मस्त अर्धा तास वाचन करा. वाचनामुळे मनावरचा आणि मेंदूवरचा सर्व ताण निघून जातो. वाचन करताना पुस्तकात/ लेखात गुंतल्यानं मनातल्या सर्व चिंता काही काळ तरी गळून पडतात. म्हणूनच वाचन हे मनाला आराम मिळवण्याचं चांगलं माध्यम आहे.

 

 

 

              7. वाचनामुळे शांत झोप येते.झोपायला जाण्याआधीची चांगली सवय म्हणूनही वाचनाकडे बघता येतं. वाचनामुळे मन आणि बुध्दी शांत होते. हातात धरून पुस्तक वाचनामुळे मनाला खरी शांतता मिळते. मोबाइल किंवा संगणाकाच्या स्कीनवर वाचन करून डोळ्यांवर आणि बुध्दीवर ताणच येतो. हातात धरून वाचलेलं पुस्तकच मनाला हवी असलेली शांतता देवू शकतं. म्हणून झोपायला जाण्याआधी किमान वीस मीनिटं तरी हातात पुस्तक, पेपर धरून काहीतरी वाचायला हवं. 8. वाचनानं वाचन वाढतं.आज हातात पुस्तक, पेपर धरून वाचन कमी झालेलं असलं तरी बहुतांश पालकांना वाटतं की त्यांच्या मुलांनी पुस्तकं वाचावीत. असं वाटत असेल तर मुलांना रोज मोठ्यानं गोष्टी वाचायला सांगा. जसजशी मुलं वाढतील त्यांच्यातील वाचनाची सवय नुसती कायम राहात नाही तर ती वाढते. याउलट बहुतांश घरात मुलं मोठ्यानं वाचत असतील तर त्यांना टोकलं जातं आणि त्यांना मनातल्या मनात वाचण्याचा आग्रह केला जातो. पण त्यामुळे कदाचित त्यांची लहानपणाची वाचनाची सवय पुढे कॅरी होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मुलांना जर मोठयानं वाचण्याची सवय असेल तर त्यांना तसं वाचू द्या.