शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

पाणी पिण्याबाबत तुमच्याही मनात असतील हे ६ गैरसमज; वेळीच जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

By manali.bagul | Updated: February 16, 2021 17:07 IST

Common myths about drinking water : स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे. पण आवश्यकता नसल्यास पाण्याचे अतिसेवन केले तर समस्या  निर्माण होऊ शकते. 

थंडीच्या दिवसात जास्त पाणी  प्यायची गरज नसते? रोज ८ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे? असे अनेक प्रश्न लोकांना पडतात. शरीराला पाण्याची आवश्यकता असतेच पण लोकांच्या मनात पाणी पिण्याबाबत अनेक गैरसमज असतात. आज आम्ही तुम्हाला पाण्याशी निगडीत गैरसमज आणि फॅक्ट सांगणार आहोत, लखनौतील केअर इंस्टीट्यूट ऑफ लाईन सायंसेजमधील एमडी फिजिशिनयन डॉ. सीमा यादव यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधित माहिती दिली आहे.

१) रोज आठ ग्लास पाणी प्यायला हवं

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात पाण्याची गरज वेगवेगळी  असते. माणसाचं वजन आणि शारिरीक हालचालींवर पाण्याची गरज अवलंबून असते. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे. पण आवश्यकता नसल्यास पाण्याचे अतिसेवन केले तर समस्या  निर्माण होऊ शकते. 

२) फक्त पाण्यानं शरीर हायड्रेट राहतं

फळं  आणि भाज्यांमध्येही पाण्याचं प्रमाण असतं. तुम्ही रोज जे अन्न खाता त्यात २० टक्के पदार्थ तरल असतात. नारळाचं पाणीसुद्धा एक चांगला पर्याय आहे. हे पाणी पिऊन तुम्ही आपली तहान भागवू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही काहीही खात असाल त्यात पाण्याचं प्रमाण असतं. 

३) हिवाळ्यात जास्त पाणी पिण्याची आवश्यकता नसते

थंडीच्या दिवसात तापमान कमी असतं. त्यामुळे लोकांना जास्त तहान लागत नाही. काही लोक कमी पाणी पितात कारण त्यांना वाटतं की थंडीच्या दिवसात जास्त पाणी पिण्याची गरज नसते.  त्यामुळे त्वचा आणि श्वासांमध्ये मॉईश्चर कमी होऊ लागते.  त्याला डिहायड्रेशनची समस्या असं म्हणतात. त्यामुळे ओठ फाटतात आणि त्वचा कोरडी पडते. त्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात स्वतःला डायड्रेट ठेवा.

कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा

४) पाणी प्यायल्यानं विषारी तत्व बाहेर निघतात

पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात असं अनेकजण म्हणतात. पाण्यानं शरीरातील सगळेच विषारी पदार्थ बाहेर निघत नाहीत. त्यासाठी औषधांची गरज असते. जास्त पाणी प्यायल्यानं युरीन तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊ शकते. म्हणून डॉक्टरांशी संपर्क साधून आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी प्या.

सायलेंट हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात ही लक्षणं; घाबरण्याआधीच जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

५) यू टीआयचे उपचार पाण्यानं होतात

हा देखिल एक गैरसमज आहे. लोकांना वाटतं की जास्त पाणी प्यायल्यानं शरीरातील बॅक्टेरिया निघून जातील आणि युटीआयची समस्या दूर होईल. पाणी प्यायल्यानं युटीआयच्या समस्येपासून आराम मिळतो पण त्याचे उपचार होऊ शकत नाहीत. तुम्हाला पोटाच्या खालच्या भागात वेदना होत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. 

६) जास्त पाणी प्यायल्यानं पचनक्रिया व्यवस्थित राहते

पाण्याविषयी अशी एक समज आहे की पाणी पिणे पचनसाठी चांगले आहे. अशा परिस्थितीत लोक अस्वस्थ पोटावर जास्त पाणी पितात, यामुळे रक्तदाब देखील वाढतो आणि अस्वस्थतेची समस्या देखील असते. जरी पाणी पिण्यामुळे पोटात जळजळ कमी होते, परंतु पचनशक्ती सुधारलेच असं नाही. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWaterपाणी