शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जिप शाळेची दुरवस्था.. दरवाजे, खिडक्या तुटक्या, खर्च भलतीकडेच; पैसे असुनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 13:30 IST

या शाळेला वर्षभरात प्रवेशापासून, शाळा अनुदान, शाळा सोडण्याचे दाखले व सांस्कृतिक भवनाचे भाडे यापासून साधारणतः चार लाखांचे उत्पन्न होते. मात्र, हा सर्व पैसा फस्त केला जातो.

अर्जुनी-मोरगाव (गोंदिया) : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये अनेक वर्गखोल्यांतील दरवाजे, खिडक्या जीर्ण झाल्या आहेत. काही वर्गांत तर सहजरीत्या प्रवेश करता येतो. या अत्यावश्यक दुरुस्तीसाठी खर्च करण्याऐवजी अवांतर खर्च करण्यात शाळा प्रशासन धन्यता मानते. या वर्गखोल्यांत डेस्क-बेंच आहेत. ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शाळा इमारती जीर्ण झाल्या. खुल्या आवारात असल्याने पटांगणावर खेळण्यासाठी मुलांची गर्दी होते. सायंकाळी तर मोकळेच रान असते. शाळेत रात्रपाळीला कुणीही नसतो. मुख्याध्यापक ४५ किमी वरून ये-जा करतात. मुळीच देखरेख कुणाचीही नाही. अनेक वर्गखोल्यांचे दरवाजे, खिडक्या तुटक्या आहेत. सहजरीत्या कुणीही आत प्रवेश करू शकतो. याची दुरुस्ती करण्याची सवड शाळा प्रशासनाकडे नाही. दुरुस्तीसाठी पैसे नाहीत, असे शालेय प्रशासन म्हणूच शकत नाही. हल्ली शाळा सुधार फंडात ५० हजार रुपये आहेत. हा पैसा चहापान व कमिशन मिळेल, तिथे खर्ची घालण्यात शालेय प्रशासन धन्यता मानते.

या शाळेला वर्षभरात प्रवेशापासून, शाळा अनुदान, शाळा सोडण्याचे दाखले व सांस्कृतिक भवनाचे भाडे यापासून साधारणतः चार लाखांचे उत्पन्न होते. मात्र, हा सर्व पैसा फस्त केला जातो. याचे कुठलेही नियोजन नाही. एवढे उत्पन्न असूनही शाळेची अशी दैनावस्था दिसून येते. यावर यंत्रणेचे अजिबात नियंत्रण नाही. शाळेत पैसा असूनही यावर वर्षभरात किती खर्च करण्यात आला व चहापानावर किती झाला, याचे परीक्षण झाले पाहिजे. शाळेच्या हिताकडे कमी अन् स्वहिताकडेच अधिक लक्ष असते.

स्टॉक बुकच नाही

- शाळेत काय वस्तू उपलब्ध आहेत अन् किती मात्रेत आहेत, याची साधी स्टॉक बुक शाळेत उपलब्ध नाही. मुख्याध्यापक आधीच्या मुख्याध्यापकांकडे बोट दाखवतात, पण तेव्हा नसले, तरी आता का नाही, यावर बोलायलाच तयार नाहीत. ही परंपरा सुधारणार तरी केव्हा, हा खरा प्रश्न आहे. खिडक्या, दरवाजे तुटके असल्याने डेस्क-बेंच चोरीला गेलेले असू शकतात, पण शाळेत स्टॉक बुक नसल्याने नेमकी मालमत्ता किती? याचा बोध मुख्याध्यापकांना होऊ शकत नाही. या विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्याची तमा नाही. याचा स्पष्ट अर्थ असा की, आजतागायत अधिकाऱ्यांनी शाळेची स्टॉक बुक कधी बघितलाच नाही.

परीक्षा फी परत मिळालीच नाही.

- कोरोनाच्या काळात मार्च २०२१ ची दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा झालीच नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कासह फॉर्म भरले होते. या काळातील परीक्षा शुल्क परतीचा निर्णय घेण्यात आला. नागपूर परीक्षा मंडळाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या याद्या प्रत्येक शाळेला मागविल्या. या शाळेने विद्यार्थ्यांच्या याद्याच पाठविल्या नाहीत. हा मुद्दा शाळा समितीच्या सभेत उपस्थित झाला, तेव्हा कुठे मुख्याध्यापकांना जाग आली. वर्षभरानंतर याद्या पाठविण्यात आल्या. यावरून येथील शालेय प्रशासन किती कार्यतत्पर आहे, याची प्रचिती येते. शाळेच्या दुर्लक्षितपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. बिचारे विद्यार्थी परीक्षा शुल्क परतीपासून वंचित राहिले.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाzpजिल्हा परिषदgondiya-acगोंदियाSchoolशाळा