शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

घ्या दमानं... तीन दिवस आहेत तुमच्या हाती! ३ ऑगस्टपर्यंत भरा पीकविमा 

By कपिल केकत | Updated: July 31, 2023 23:41 IST

३ ऑगस्टपर्यंत पीकविमा भरता येणार असल्याने घाई करण्याची काहीच गरज राहिलेली नाही.

गोंदिया : ऑनलाइन पीकविमा भरताना येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे यापासून वंचित राहणार अशी धाकधूक शेतकऱ्यांना लागून होती. मात्र आता त्यांना चिंता करण्याची गरज नाही. कारण, शासनाने ऑनलाइन पीकविमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता दि. ३ ऑगस्टपर्यंत पीकविमा भरता येणार असल्याने घाई करण्याची काहीच गरज राहिलेली नाही.

नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊन पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्याकडे पाठ केली होती. ही बाब लक्षात येताच राज्य शासनाने १ रुपयांचा पीकविमा देण्याचा निर्णय घेतला. एक रुपयांचा पीकविमा या योजनेचे हे पहिले वर्ष असले तरी याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येत पुढे येत आहेत. मात्र यासाठी दि. ३१ जुलै ही शेवटची तारीख असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ वाढल्याचे दिसत आहे; तर जिल्ह्यातील १,८०,२३४ शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढल्याची माहिती आहे.

मात्र ऑनलाइन पद्धतीने एक रुपयांत पीकविमा काढत असताना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली होती. त्यातच दि. ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढता येणार असल्याने आणखीही कित्येक शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार होते. परिणामी शेतकऱ्यांकडून पीकविम्याची तारीख वाढवून देण्याची मागणी केली जात होती. शेतकऱ्यांच्या या हाकेला साद देत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मुदतवाढ करण्याची विनंती केली होती. परिणामी केंद्र शासनाने मुदतवाढ देण्यास हिरवी झेंडी दिल्याने आता पीकविमा काढण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना दि. ३ ऑगस्टपर्यंत पीकविमा काढता येणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना विनाकारण चिंता करण्याची गरज नसून तीन दिवसांत आरामात त्यांना पीकविमा काढता येणार असून, शेतकऱ्यांना संधी मिळाल्याने जिल्ह्यात पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढणार यात काही शंका वाटत नाही.

बापरे किती ही तफावत?मागील वर्षी खरिपात पीकविमासाठी ८७५ रुपये हेक्टरी भरावे लागले व तेव्हा जिल्ह्यातील फक्त १५ हजार ८११ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला होता. उधार उसनवारी व कर्ज घेऊन हंगाम पिकविणाऱ्या शेतकऱ्याला एवढी रक्कम भरणेही शक्य होत नव्हते. अशात निसर्गाचा लहरीपणा विमा न काढणाऱ्या शेतकऱ्यांना भोगावा लागत होता. यामुळेच एकही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने एक रुपयांत पीकविमा योजना काढली. त्याचे फलित असे की, यंदा दि. ३१ जुलैपर्यंत १,८०,२३४ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. त्यात आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने ही संख्या आणखी वाढणार असल्याचे दिसते.

तिरोडा तालुका आघाडीवर- ३१ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १,८०,२३४ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. यात तिरोडा तालुक्यातील शेतकरी आघाडीवर दिसत असून, तेथील ३८,४६० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. दुसऱ्या क्रमांकावर गोंदिया तालुका असून, येथील ३३,८९६ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे; तर तिसऱ्या क्रमांकावर अर्जुनी-मोरगाव तालुका असून, तेथील २१,९८३ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, तर नक्षलग्रस्त सालकेसा तालुक्यात सर्वात कमी ११,०८५ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतल्याचे दिसत आहे.

पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा तालुकानिहाय तक्तातालुका - शेतकरीआमगाव- १७,०४१अर्जुनी-मोरगाव- २१,९८३

देवरी- १८,७०५गोंदिया- ३३,८९६

गोरेगाव-२१,७८४सडक-अर्जुनी- १७,२८०

सालेकसा-११,०८५तिरोडा- ३८,४६०

एकूण-१,८९,२३४ 

टॅग्स :Farmerशेतकरी