चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या
By Admin | Updated: May 3, 2015 01:22 IST2015-05-03T01:22:25+5:302015-05-03T01:22:25+5:30
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूड्या पतीने अंगावर रॉकेल टाकून २७ एप्रिल रोजी जाळलेल्या पत्नीचा ३० एप्रिल रोजी नागपूरच्या शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या
बोंडगावदेवी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूड्या पतीने अंगावर रॉकेल टाकून २७ एप्रिल रोजी जाळलेल्या पत्नीचा ३० एप्रिल रोजी नागपूरच्या शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत चान्ना-बाक्टी येथे ही घटना घडली. मृत महिलेचे नाव सविता नितीन रामटेके असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, येथील यशवंत ठवरे यांची मुलगी सविता हिचे चान्ना/बाक्टी येथील नितीन रामदास रामटेके याच्याशी १८ वर्षापूर्वी लग्न झाले होते. सविताला नितीन पासून दोन मुलं झाले. लग्नानंतर ४-५ वर्ष नितीन सविता सोबत चांगला नांदू लागला. नंतर मात्र त्याने सविताला शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली. पतीच्या त्रासाला कंटाळून ती अनेकदा आपल्या माहेरी राहायची. यावर मात्र नितीन तिची समजूत घालून सोबत घेवून जायचा. मागील काही महिन्यांपासून तो सविताला चारित्र्याच्या संशयातून बेदम मारहाण करून लागला होता.
घटनेच्या दिवशी २७ एप्रिल रोजी सविता रात्री ८ वाजता स्वयंपाक करीत असताना नितीनने डबकी भरुन रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला लायटरने पेटवून दिले. घरासमोरील नातलगांनी हे बघून आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र ती मोठ्याप्रमाणआत भाजली होती. तिला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून लगेच अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने गंभीर अवस्थेत सविताला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तर तेथून २९ एप्रिल रोजी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान सविताने ३० एप्रिल रोजी रात्री ८.१५ वाजता अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, नितीन बाहेरख्याली असल्याची गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)