शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

कंपन्यांचे पोट भरण्यासाठी पीक विमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:26 AM

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, यानंतरही ...

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, यानंतरही पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. परिणामी, यंदा पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ देऊनसुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे. मागील वर्षी ५६६४० शेतकऱ्यांनी पीक काढला होता तर यंदा केवळ १२०६८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या निम्म्यावर आली असून केवळ विमा कंपन्यांचे पोट भरण्यासाठी पीक विमा काढायचा का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

.........

यंदा केवळ २१.३० टक्के पीक विमा

- मागील वर्षी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान होऊनदेखील पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे यंदा केवळ २१.३० टक्के म्हणजे १२०६८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.

- पीक विमा कंपन्यांकडून नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण केले जात नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहतो.

- इतर पिकांच्या तुलनेत धान पिकाच्या नुकसान भरपाईसाठी वेगळे निकष लावले जात आहेत. त्यामुळे परतावा मिळण्यास अडचण होत आहे.

........

कोट

गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र आहे. तर धान पिकाच्या नुकसानीसाठी विमा कंपन्याकडून वेगळे निकष लावले जात आहेत. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास वंचित राहत आहेत. त्यामुळेच यंदा विमा कंपन्यांना नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.

- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

......

जिल्ह्यातील एकूण शेतकरी : २ लाख ७२ हजार,

मागील वर्षी पीक विमा काढलेले शेतकरी : ५६६४०

यावर्षी पीक विमा काढलेले शेतकरी : १२०६८

एकूण खरीप क्षेत्र : २ लाख १० हजार २४२

......................................

तालुकानिहाय पीक विमा काढणारे शेतकरी

आमगाव : ६३३

अर्जुनी मोरगाव : ६३३

देवरी : ९३१

गोंदिया :१५६३

गोरेगाव : १४३७

सडक अर्जुनी : २८२१

सालेकसा : ७४८

तिरोडा : ३२७२

..............................

पीकनिहाय लागवड क्षेत्र

धान : १ लाख ८१ हजार हेक्टर

तूर : ४ हजार हेक्टर

ऊस : १५ हजार हेक्टर

इतर पिके : १० हजार हेक्टर

.................

यामुळेच फिरविली पाठ

जिल्ह्यात एकूण २ लाख ७२ हजार खातेधारक शेतकरी आहेत. यापैकी मागील वर्षी ५६६४० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. विमा हप्त्यापोटी शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकार यांनी एकूण १६ कोटी रुपये भरले होते. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पूरपरिस्थिती निर्माण हाेऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने केवळ ४३३३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवीत २ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली. नुकसान हाेऊनदेखील लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे.

............

मागील वर्षीचा अनुभव वाईट

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा परतावा मिळावा यासाठी पीक विमा काढला होता. मात्र, मागील वर्षी नुकसान होऊनसुद्धा परतावा मिळाला नाही. त्यामुळे यंदा पीक विमा काढलाच नाही.

- रामदास बोरकर, शेतकरी, नवेगावबांध

............

पीक विमा कंपन्याकडून दरवर्षी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. मागील वर्षी पूर आणि अतिवृष्टी हाेऊनसुद्धा विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे आता पीक विमा न काढण्याचा निर्णय घेतला आहे.

- देवीदास जमाईवार, शेतकरी

.........