रोहयो कामावर नियंत्रण कुणाचे?

By Admin | Updated: April 27, 2016 01:55 IST2016-04-27T01:55:22+5:302016-04-27T01:55:22+5:30

हिवाळा असतानाच रोजगार हमी योजनेची कामे सुरु असली पाहिजे. पण तालुक्याची परंपरा रोहयो काम उन्हाळ्यामध्ये मिळतो.

Who controls control? | रोहयो कामावर नियंत्रण कुणाचे?

रोहयो कामावर नियंत्रण कुणाचे?

प्रशासनाचे लक्ष नाही: वाऱ्यावर चालते काम
ुबाराभाटी : हिवाळा असतानाच रोजगार हमी योजनेची कामे सुरु असली पाहिजे. पण तालुक्याची परंपरा रोहयो काम उन्हाळ्यामध्ये मिळतो. शंभर दिवसही काम मिळत नाही. कामाचा मोबदला सुद्धा बरोबर नाही. यामध्ये मंजुरांचे नुकसान दिसते. तरी पण या रोहयोच्या कामावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही.
अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये अनेक गावात रोहयोची कामे सुरु आहेत. रखरखत्या उन्हाच्या चटक्यांना तोंड देत मजूर काम करतात. पण रोजगार हमी योजनेची कामे सुरळीत चालतात काय? कामावर योग्य प्रमाणात मजुर आहेत काय? अठरा वर्षांच्यावरील मजुर आहेत काय? किती काम करतात हे, ६० वर्षाच्या आतमधील मजुर आहे काय? रोहयो कामाच्या आढावा नोंदवही म्हणजेच संपूर्ण रेकार्डचा वेळोवेळी भरला जातो काय? रेकार्डनुसार मजुर असतात काय? मजुर वेळेवर कामावर उपस्थित होतात काय? अशा बऱ्याच प्रश्नांवर कोणत्याच अधिकारी व पदाधिकारी वर्गाचे लक्ष नाही. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायतचे सुद्धा नियंत्रण नाही. त्यामुळे संपूर्ण कारभार वाऱ्यावर दिसत असून अनागोंदी कारभार चालतो अशा चर्चांना ऊत आले आहे.
रोजगार हमी काम कमी, एक कुपण दिवसभर तपन, येतो बाबू देतो ढबू अशा म्हणी ही रोहयोच्या कामांना घेऊन प्रचलीत आहेत. पण या उलट काम होत आहे. कारण सध्या परिसरात वेळेवर मजुर हजर होत नसून उशीरा उपस्थित होतात. अरेरावीपणाने काम करतात. रोहयो काम पाहणाऱ्या रोजगार सेवकांवर दडपण आणतात. दडपण आणून अर्ध्याच वेळेत काम वरून घराकडे निघतात. कामावरून बाहेर काम करतात. हजेरी लावण्यास सांगतात. तर रोहयो कामावरील माती साहित्य बळजबरीने किंवा लालच पद्धतीने लंपास करुन स्वत:चे काम करतात. कामावरील माती कामावरच वापरत नाही तर बाहेर नेली जाते.असेही काम आजकाल होतात, पण याकडे लक्ष कुणाचे नाही.
संबंधित विभागाचे अधिकारी भेट देत नाही. तर उन्ह लागते म्हणून कार्यालयातच झोपा काढतात. कधी-कधी तर रोहयोची कामे, मंजूर करीत नाही. मजुरांना बाहेर रोजगारासाठी पलायन करावे लागते. तर काम पाहणाऱ्या कर्मचारी वर्गामुळे मजुरी बरोबर वेळेवर मिळत नाही. रोहयोसाठी लागणारे दस्तावेज नमुना क्रमांक-१ नमुना क्रमांक ४ व नमुना क्रमांक-८ न भरताच मजुरांना कामावर घेतल्या जाते. रोहयो कामाच्या यादीमध्ये घोळ करुन नावाची अफरातफर केली जाते. जेणे करुन तो मजुर कामावर येऊ नये. अशा अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाच्या अडचणी असतात. पण कुणाचे लक्ष नाही. रोहयोच्या कामावर होणाऱ्या संपूर्ण वाईट कामावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. यासाठी रोहयो अधिकारी रोहयो कार्यक्रम अधिकारी, तलाठी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील अशा अधिकारी व पदाधिकारी वर्गाने लक्ष घालून शासनाच्या रोजगार हमी योजनेचे कार्य व्यवस्थीत व्हावे म्हणून जातीने लक्ष घालावे अशी मजुरांची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Who controls control?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.