शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

सौर कुंपण केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

प्राण्यांच्या  हैदोस  थांबविण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून सौर कुंपणाची योजना आखण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेतून अनुदानावर सौर कुंपण देण्यात आले होते.  सौर कुंपणच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची रोकथाम करण्यात आली. पण ते सौर कुंपण आता निकामी झाल्यामुळे पुन्हा वन्यप्राण्यांचा हैदोस वाढत आहे.

राजेश मुनीश्वरलोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी :  प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता वन्यप्राण्यांचा हैदोस वाढत असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशात प्राण्यांचा हैदोस थांबविण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून सौर कुंपणाची योजना आखण्यात आली आहे. मात्र, सौर कुंपन मिळत नसल्याने ते कधी मिळणार? असा सवाल शेतकरी करीत आहेत. तालुक्यातील शेंडा, पुतळी, बामणी, खडकी, दूग्गीपार,  मंदीटोला, मोगरा ,राजगुडा, बकी, मेंडकी, कोलारगाव, कोसमघाट कनेरी, मनेरी, चिखली, खोबा, परसोडी परिसरातील वन्यजीव क्षेत्राला लागून असलेल्या शेतात आता वन्यप्राण्यांचा हैदोस दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. प्राण्यांच्या  हैदोस  थांबविण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून सौर कुंपणाची योजना आखण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेतून अनुदानावर सौर कुंपण देण्यात आले होते.  सौर कुंपणच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची रोकथाम करण्यात आली. पण ते सौर कुंपण आता निकामी झाल्यामुळे पुन्हा वन्यप्राण्यांचा हैदोस वाढत आहे.वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान थांबविण्यासाठी  कोकणा, कोसमघाट, बकी, मेंडकी परिसरात जंगलाला लागून जाळीचे कुंपण लावण्याची तितकीच गरज आहे. शेंडा सहवनक्षेत्रात जवळजवळ ३ किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीला लागून वनविभागाचे जंगल असल्यामुळे वन्यप्राणी शेतमालावर ताव मारताना दिसतात.  वन्यप्राण्यांचा हैदोस खूप जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक होत नाही. पीक नुकसानीची भरपाई शासनाकडून अत्यल्प असल्यामुळे ते शेतकऱ्यांना परवडण्याजोगे नाही.सडक-अर्जुनी वनपरिक्षेत्र १८४०६ हेक्टर आहे. त्यात ७११४  हेक्टर क्षेत्र राखीव वन आहे.  त्यापैकी काही परिसर हा शेतकऱ्यांच्या शेतीला लागून असल्यामुळे वन्यप्राणी शेतकऱ्यांचे नुकसान करतात.

ज्या शेतकऱ्यांना शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून सौर कुंपण पाहिजे आहे, त्यांनी वन विभागाकडे लेखी मागणी करावी. शासन अनुदानावर सौर कुंपण देण्याची योजना शासनाने केली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन सौर कुंपण लावावे.सचिन डोंगरवार वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव, नवेगावबांध

सडक-अर्जुनी वनपरिक्षेत्रात ज्या शेतकऱ्यांनी सौर कुंपण घेतले होते, त्यांनी आपल्या शेताला सुरक्षित ठेवण्यासाठी लावावे. जेणेकरून शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाले आहे, त्यांनी संबंधित वनरक्षक व क्षेत्र सहायकांच्या सहकार्याने पीक नुकसानीचे दावे सादर करावे. त्यांना पीक नुकसानीची भरपाई शासनाच्या माध्यमातून दिली जात आहे.सुनील मडावी वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक-अर्जुनी

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती