शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

बंधाऱ्यामुळे नेमके सिंचन कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे डांर्गोलीजवळ वैनंगगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. डांगोर्ली येथील गावकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी यंदा फेब्रुवारी महिन्यात वैनगंगा नदीच्या पात्रात सिमेंटच्या चुंगड्यामध्ये रेती भरुन बंधारा तयार केला. हा बंधारा तयार केल्यानंतर दुसरा बंधारा तयार करण्याची गरज ...

ठळक मुद्दे२ लाख २५ हजारांचा खर्च : पाणी असताना दाखविली टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे डांर्गोलीजवळ वैनंगगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. डांगोर्ली येथील गावकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी यंदा फेब्रुवारी महिन्यात वैनगंगा नदीच्या पात्रात सिमेंटच्या चुंगड्यामध्ये रेती भरुन बंधारा तयार केला. हा बंधारा तयार केल्यानंतर दुसरा बंधारा तयार करण्याची गरज नव्हती. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने बंधारा तयार २ लाख २५ हजार रुपयांचा विनाकारण खर्च केल्याचे डांर्गोली येथील गावकऱ्यांचे म्हणने आहे.मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येवू नये, यासाठी डांगोर्ली येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून ५ हजार सिमेंटच्या बॅगमध्ये रेती, माती भरुन बंधारा तयार केला.हा मजबूत बंधारा बांधल्यानंतर महिनाभरातच त्या बंधाऱ्याजवळ महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने दुसरा बंधारा बांधला. दुसºया बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी २ लाख २५ हजार रूपये खर्च झाल्याची कबुलीही मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी दिली. गावकऱ्यांनी तयार केलेल्या बंधाऱ्यामुळे फायदा झाला असताना मजीप्राला दुसरा बंधारा तयार करण्याची गरज का पडली? असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जाते. या बंधाऱ्याच्या निर्मितीमुळे नेमका लाभ कुणाचा झाला? टंचाईची कुणाची दूर झाली आदी प्रश्न निर्माण झाले आहे. डांगोर्ली येथील अबालवृध्दांनी व नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदानातून वैनगंगा नदीवर बंधारा बांधला. या बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडले. या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली. विहिरींच्या पाणी पातळीत सुध्दा समाधानकारक वाढ झाली. हा बंधारा ४० मीटर लांब व २ मीटर खोल आहे. या बंधाऱ्यामुळे बिरसोला संगमपर्यंत पाणी अडले. या बंधाऱ्याची लांबी व रूंदी पाहता नागरिकांना सिमेंटच्या खाली बॅगची गरज भासली. त्यांनी गोंदियातील मोठ्या कंत्राटदाराकडून त्या मागविल्या. गावकऱ्यानी मजीप्राच्या अभियंत्यांना सिमेंट बॅग उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. मात्र त्यांनी गावकऱ्याना सहकार्य केले नसल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी २ हजार सिमेंट बॅग उपलब्ध करून दिल्या. तर उर्वरित सिमेंटच्या खाली बॅग गावकऱ्यांनी इकडून तिकडून गोळा केल्या. त्यानंतर १ फेब्रुवारीला गावकऱ्यांनी श्रमदान करुन बंधारा तयार केला. या बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहते पाणी अडविण्यात आले.हा बंधारा मजबूत व टिकाऊ तयार झाला असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.तर हा बंधारा योग्य पध्दतीने बांधला नसल्याने बंधाऱ्यातून पाणी लिकेज होत असल्याने दुसरा बंधारा तयार करण्यात आल्याचा दावा मजीप्राकडून केला जात आहे.बंधाऱ्यात अद्यापही पाणीज्यावेळी हा मोठ्या बंधारा तयार करण्यात आला त्यावेळपासून आत्तापर्यंत त्या बंधाऱ्यात पाणी अडले आहे. परंतु मजीप्राने महिनाभरापूर्वीपासून पाणी नसल्याचे सांगून गोंदियाकरांना दिवसातून एकच वेळी पाणी देण्याचा फतवा काढला. दुसरा बंधारा निर्मीतीसाठी पाण्याची टंचाई तर दाखिण्यात आली नाही ना अशी चर्चा शहरात आहे.गावकऱ्यांनी बांधलेला बंधारा मोठाडांगोर्ली येथे दरवर्षी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत शासकीय निधीतून तयार करण्यात येणाºया बंधाऱ्यापेक्षा पाचपट मोठा बंधारा यंदा लोकसहभागातून नागरिकांनी तयार केला. हा बंधारा मजबूत व पाणी थांबेल असा तयार करण्यात आला. या बंधाऱ्याला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी भेट देवून पाहणी केली होता. हा बंधारा सुसज्ज व मजबूत असाताना मजीप्राने पुन्हा याच बंधाऱ्याजवळ २ लाख २५ हजार रूपये खर्च करून दुसरा बंधारा का बांधला हा मात्र संशोधनाचा विषय आहे.